शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

भीषण अपघातात दोन जिवलग मित्र ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 16:50 IST

पैठण तालुक्यातील तोंडोळी येथून औरंगाबादला येणाऱ्या दुचाकीस्वार मित्रांना भरधाव ट्रकने चिरडल्याची घटना नक्षत्रवाडी येथे शुक्रवारी सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास घडली. या अपघातानंतर ट्रक चालकाला पोलिसांनी अटक केली.

औरंगाबाद: पैठण तालुक्यातील तोंडोळी येथून औरंगाबादला येणाऱ्या दुचाकीस्वार मित्रांना भरधाव ट्रकने चिरडल्याची घटना नक्षत्रवाडी येथे शुक्रवारी सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास घडली. या अपघातानंतर ट्रक चालकाला पोलिसांनी अटक केली.

नवनाथ तुकाराम शेजुळ (३८) आणि एकनाथ किसन खैरे (३२, दोघे रा. तोंडोळी, ता. पैठण) या दोन मित्रांचा या घटनेत  अंत झाला.  नवनाथ हे  चितेगाव येथील स्टोन क्रेशरमध्ये काम करायचे तर एकनाथ हे ट्रॅक्टर चालक होते. नवनाथ यांना कामानिमित्त औरंगाबादला यायचे असल्याने त्यांनी जिवलग मित्र एकनाथला दुचाकीवर सोबत घेतले. तोंडोळी येथून औरंगाबादला येत असताना नक्षत्रवाडी येथे त्यांच्यामागून वेगात आलेल्या मालवाहू ट्रकने (यूपी ) त्यांना ओव्हरटेक करून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. यामध्ये ट्रकचा दुचाकीला धक्का लागला आणि मोटारसायकलसह दोन्ही मित्र खाली पडले आणि ट्रकच्या चाकाखाली आले. 

या अपघातात एकनाथ यांच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने ते घटनास्थळीच ठार झाले. तर पालथे पडलेल्या नवनाथ यांच्या पाठीवरून ट्रक गेल्याने ते गंभीर जखमी झाले. नवनाथ यांना घाटीत दाखल केले असता तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. यावेळी घटना स्थळावरून पळून गेलेल्या ट्रकचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. या अपघाताची माहिती मिळताच सातारा पोलीस ठाण्याचे निरीक्षक  सुरेंद्र माळाळे  आणि शहर  वाहतूक विभागाचे निरीक्षक मुकुंद देशमुख आणि अन्य अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAccidentअपघातDeathमृत्यू