शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

औट्रम घाटात बोगदा हाच पर्याय, नवीन डीपीआरची तयारी; वाहतूक कोंडी फुटण्याची आशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2024 12:51 IST

आज समिती करणार पाहणी,आयुक्तालयात झाली बैठक

छत्रपती संभाजीनगर : औट्रम घाटप्रकरणी नियुक्त केलेल्या समितीची गुरुवारी विभागीय आयुक्तालयात बैठक होऊन शुक्रवारी (दि.४) ही समिती प्रत्यक्ष औट्रम घाटाला भेट देणार आहे. या समितीचे सेवानिवृत्त न्या. सुनील देशमुख, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, एनएचएआयचे प्रकल्प संचालक रवींद्र इंगाले, पोलिस अधिकारी बैठकीस उपस्थित होते.

छत्रपती संभाजीनगर ते धुळे या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ वरील कन्नड व चाळीसगावच्या मधोमध असलेल्या औट्रम घाटातील बोगद्याचे काम आता रद्द होऊन दोन वर्षे झाली, तर घाट जड वाहतुकीला बंद करून एक वर्ष झाले. परिणामी, शेकडो कि.मी.चा वळसा घालून जड वाहतूक सुरू आहे. यामुळे अर्थकारणाला ब्रेक लागला आहे. गेल्या पंधरवड्यात ‘एनएचएआय’ने न्यायालयात बोगद्याच्या कामाबाबत बाजू मांडली. ‘यूपीए’ सरकारच्या काळात सोलापूर-धुळे महामार्गाचे काम सुरू झाले. त्यात ३ हजार कोटींच्या औट्रम बोगद्याचा समावेश होता. सध्या सात हजार कोटींवर बोगद्याचे काम गेले आहे.

नव्याने तयारी सुरू...बोगद्याबाबत एनएचएआय मुख्यालयाकडून ज्या सूचना आल्या, त्या न्यायालयासमेार मांडल्या आहेत. परत नव्याने डीपीआर करावा लागणार आहे. डीपीआर तयार झाल्यानंतरच बोगद्याला किती खर्च लागणार हे समोर येईल. डीपीआरसाठी संस्था नेमण्याची तयारी एनएचएआयच्या प्रकल्प संचालक कार्यालयाने सुरू केली आहे.--एनएचएआय, प्रकल्प विभाग

आता पाचव्यांदा डीपीआर...पहिल्या डीपीआरमध्ये २३ हजार मीटर डोंगर कापून त्यातील दगड बाहेर काढणे प्रस्तावित होते. त्यानंतर पुन्हा दुसऱ्या डीपीआरने केला. त्यात मशीनच्या साह्याने १४ हजार मीटर डोंगर फोडण्यासह काँक्रिटीकरण करणे, वरील भाग अर्धचंद्राकारात कापणे, बोगद्यातील इलेक्ट्रीसिटीचे काम करणे, व्हेंटिलेशन सुविधेसह हॉस्पिटल बांधण्याच्या कामांचा समावेश होता. पुन्हा दोन डीपीआर तयार केले. आता हा पाचवा डीपीआर होतो आहे.

वनविभागाची परवानगी अवघड...वनविभागाच्या परवानगीचा मुद्दा आहे. सहजासहजी परवानगी मिळेल असे वाटत नाही. तीन महिन्यांत वनविभागाकडून परवानगी मिळावी, अशी अपेक्षा गृहीत धरून पुढील काम सुरू होत आहे. वनविभागाची परवानगी वेळेत मिळाली नाहीतर बोगद्याच्या कामाला विलंब लागू शकतो.

बोगदा बांधण्याविना पर्याय नाहीऔट्रम घाटात बोगदा बांधण्याविना पर्याय नाही. घाटाचे चौपदरीकरण करण्यात वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होईल. अभयारण्यालाही बाधा होईल. त्यामुळे घाटात बोगदाच बांधावा लागेल, अशी परिस्थिती सध्या आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादhighwayमहामार्ग