शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
3
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
4
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
5
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
6
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
7
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
8
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
9
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
10
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
11
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
12
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
13
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
14
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
15
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
16
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
17
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
18
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
19
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
20
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप

औट्रम घाटात बोगदा हाच पर्याय, नवीन डीपीआरची तयारी; वाहतूक कोंडी फुटण्याची आशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2024 12:51 IST

आज समिती करणार पाहणी,आयुक्तालयात झाली बैठक

छत्रपती संभाजीनगर : औट्रम घाटप्रकरणी नियुक्त केलेल्या समितीची गुरुवारी विभागीय आयुक्तालयात बैठक होऊन शुक्रवारी (दि.४) ही समिती प्रत्यक्ष औट्रम घाटाला भेट देणार आहे. या समितीचे सेवानिवृत्त न्या. सुनील देशमुख, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, एनएचएआयचे प्रकल्प संचालक रवींद्र इंगाले, पोलिस अधिकारी बैठकीस उपस्थित होते.

छत्रपती संभाजीनगर ते धुळे या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ वरील कन्नड व चाळीसगावच्या मधोमध असलेल्या औट्रम घाटातील बोगद्याचे काम आता रद्द होऊन दोन वर्षे झाली, तर घाट जड वाहतुकीला बंद करून एक वर्ष झाले. परिणामी, शेकडो कि.मी.चा वळसा घालून जड वाहतूक सुरू आहे. यामुळे अर्थकारणाला ब्रेक लागला आहे. गेल्या पंधरवड्यात ‘एनएचएआय’ने न्यायालयात बोगद्याच्या कामाबाबत बाजू मांडली. ‘यूपीए’ सरकारच्या काळात सोलापूर-धुळे महामार्गाचे काम सुरू झाले. त्यात ३ हजार कोटींच्या औट्रम बोगद्याचा समावेश होता. सध्या सात हजार कोटींवर बोगद्याचे काम गेले आहे.

नव्याने तयारी सुरू...बोगद्याबाबत एनएचएआय मुख्यालयाकडून ज्या सूचना आल्या, त्या न्यायालयासमेार मांडल्या आहेत. परत नव्याने डीपीआर करावा लागणार आहे. डीपीआर तयार झाल्यानंतरच बोगद्याला किती खर्च लागणार हे समोर येईल. डीपीआरसाठी संस्था नेमण्याची तयारी एनएचएआयच्या प्रकल्प संचालक कार्यालयाने सुरू केली आहे.--एनएचएआय, प्रकल्प विभाग

आता पाचव्यांदा डीपीआर...पहिल्या डीपीआरमध्ये २३ हजार मीटर डोंगर कापून त्यातील दगड बाहेर काढणे प्रस्तावित होते. त्यानंतर पुन्हा दुसऱ्या डीपीआरने केला. त्यात मशीनच्या साह्याने १४ हजार मीटर डोंगर फोडण्यासह काँक्रिटीकरण करणे, वरील भाग अर्धचंद्राकारात कापणे, बोगद्यातील इलेक्ट्रीसिटीचे काम करणे, व्हेंटिलेशन सुविधेसह हॉस्पिटल बांधण्याच्या कामांचा समावेश होता. पुन्हा दोन डीपीआर तयार केले. आता हा पाचवा डीपीआर होतो आहे.

वनविभागाची परवानगी अवघड...वनविभागाच्या परवानगीचा मुद्दा आहे. सहजासहजी परवानगी मिळेल असे वाटत नाही. तीन महिन्यांत वनविभागाकडून परवानगी मिळावी, अशी अपेक्षा गृहीत धरून पुढील काम सुरू होत आहे. वनविभागाची परवानगी वेळेत मिळाली नाहीतर बोगद्याच्या कामाला विलंब लागू शकतो.

बोगदा बांधण्याविना पर्याय नाहीऔट्रम घाटात बोगदा बांधण्याविना पर्याय नाही. घाटाचे चौपदरीकरण करण्यात वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होईल. अभयारण्यालाही बाधा होईल. त्यामुळे घाटात बोगदाच बांधावा लागेल, अशी परिस्थिती सध्या आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादhighwayमहामार्ग