शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

करमाड येथे भरधाव ट्रक बाजारात शिरला; तिघे गंभीर जखमी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 14:43 IST

जालना महामार्गावर करमाड येथील पोलीस स्टेशन जवळ सकाळी ११. ३० वाजेच्या सुमारास एक भरधाव ट्रक अनियंत्रित होत रस्त्यावरील बाजारात शिरला.

औरंगाबाद : जालना महामार्गावर करमाड येथील पोलीस स्टेशन जवळ सकाळी ११. ३० वाजेच्या सुमारास एक भरधाव ट्रक अनियंत्रित होत रस्त्यावरील बाजारात शिरला. या भीषण अपघातात ३० नागरिक जखमी झाले असून त्यातील तिघांची प्रकृती गंभीर आहे. अपघातात ट्रकने धडकदेत फरफटत नेल्याने एक ट्रक्टर, ८ दुचाकी, बाजारातील काही दुकानांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले.

या बाबत करमाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ११. ३० वाजेच्या सुमारास एक ५० फुटी लांब ट्रेलर ट्रक (एमएच ४३ -वाय - २२६५ ) अवजड मशीनला घेऊन औरंगाबादहून जालन्याच्या दिशेला जात होता. करमाड येथील पोलीस स्टेशनच्याजवळ हा ट्रक अचानक अनियंत्रीत झाला व त्याने रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या ट्रॅक्टरला धडक दिली. यानंतर ट्रकने ट्रक्टरला जवळपास 50 फूट दूर फरपटत नेले. ट्रक आणि ट्रक्टर पुढे तसाच फरफटत जात रस्त्यावरील बाजारात असलेली एक रसवंती, एक टरबूज विक्रीचे दुकान, शेतकऱ्यांची कापसाची तीन छोटी वाहने, ७ ते ८ दुचाकी यांना धडकला. ट्रक थांबताच नागरिकांनी मोठ्याप्रमाणावर मदत कार्य सुरु केले व जखमींना तत्काळ बाहेर काढले. यात जवळपास ३० नागरिक जखमी झाले असून यातील १० नागरिकांना छोट्या इजा तर इतरांना मोठ्यास्वरुपाची दुखापत आहे. जखमींपैकी तिघांची प्रकृती अधिक गंभीर आहे त्यांच्यावर औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालय घाटी व खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ट्रकने ट्रक्टरला दूरवर फरफटत नेल्याने मोठा आवाज झाला. या आवाजामुळे रस्त्यामधील नागरिक दूर जाण्यात यशस्वी झाली. 

जखमींची नावे : सतिष आहेर, कुंडलिक आहेर, तुकाराम सरोदे, काकासाहेब जाधव, संदीप व्यवहारे, सचिन खरात, सुनील डांगे, डिगंबर हजारे, मधुकर हजारे, नामदेव रंगभरे, माधव रंगभरे

टॅग्स :Accidentअपघातgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीAurangabadऔरंगाबाद