शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

शहरातील नाले तुंबले; पहिल्याच पावसात भंबेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 16:44 IST

नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याचा धोका कायम

ठळक मुद्देशेतकरी बाजार संकुलाचे साईडचे शेड कोसळले मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सहा महिन्यांपूर्वीच झाले उद्घाटनसुदैवाने जीवितहानी नाही 

औरंगाबाद : शेतकऱ्यांना २४ तास भाजीपाला विकता यावा यासाठी जाधववाडीत कृषी उत्पन्न बाजार समितीने बांधलेले शेतकरी बाजार संकुलाच्या साईडचे शेड कोसळले. वादळी वाऱ्याने समोरील व पाठीमागील बाजूला असलेले टीनचे शेड खाली कोसळले तेव्हा जोराचा आवाज झाला. सुदैवाने दुपारची वेळ असल्याने या परिसरात कोणी नव्हते, यामुळे जीवितहानी टळली.

उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीने भाजीपाला अडत मार्केटमध्ये शेतकरी बाजार संकुल उभारले. ३५ हजार २३२ चौरस फूट एवढ्या जागेवर दोन मोठे डोम उभारण्यात आले. त्यांची उंची २५ फूट आहे. हे बाजार संकुल उभारण्यास अडीच कोटी रुपये खर्च आला आहे. ३ जानेवारी रोजी या संकुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले होते. मात्र, तेव्हापासून शेतकरी बाजार या संकुलात भरलाच नाही. बाजार संकुलात दोन डोम तयार करण्यात आले. या डोमच्या दर्शनी बाजूला व पाठीमागील बाजूला टीनचे शेड उभारण्यात आले. रविवारी दुपारी जोरदार वादळी वाऱ्यामुळे हे वरील बाजूला लावण्यात आलेले टीनचे शेड खाली कोसळले. वादळी वाऱ्याने सिमेंट काँक्रीटचे खांब उखडून शेड खाली कोसळले, तसेच पाठीमागील बाजूचेही शेड कोसळले. यामुळे बांधकामाची शंका निर्माण झाली.  

सातारा देवळाई परिसरात पावसाने नुकसानरविवारी दुपारी वादळी वाऱ्यासह मृगाच्या पावसाचे आगमन झाले; परंतु अनेकांच्या घरावरील पत्रे उडाले, तर झाडांच्या फांद्या तुटून पडल्याने अडसर निर्माण झाला. सोसाट्याच्या वाऱ्यासह पडलेल्या पहिल्याच पावसात महावितरणचे पितळ उघडे पडले.  दुपारी चार ते रात्री ९ वाजेपर्यंतही वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता.महावितरणच्या फ्यूज कॉल सेंटरवर सतत नागरिकांच्या तक्रारीचे फोन खणखणत होते. सातारा, देवळाईत शासकीय व निमशासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने वास्तव्यास असून, रविवार असल्याने शक्यतो बहुतांश अधिकारी व कर्मचारी घरीच होते; परंतु दुपारी ४ वाजेदरम्यान सोसाट्याच्या वाऱ्याने परिसरात दाणादाण उडवून टाकली. 

पावसाळापूर्व कामात दिरंगाईदरवर्षी मान्सूनपूर्व धोकादायक झाडांची कटिंग करण्यात येते. पावसात स्पार्किंग होऊन वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार होऊ नयेत म्हणून खबरदारी घेतली जाते. यंदा पावसाळा सुरू झाला तरीदेखील धोकादायक झाडांच्या फांद्या कापण्यात आलेल्या नाहीत, परिणामी नागरिकांना रात्रीपर्यंत अंधारात राहावे लागले. मान्सूनपूर्व कामात दिरंगाई करण्यात आल्यानेच वीज गुल झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. 

नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याचा धोका कायम- महापालिकेने यंदा वेळेत मान्सूनपूर्व सफाईची कामे केली नाहीत. त्याचा परिणाम शहरात रविवारी झालेल्या केवळ ५.३ मि.मी. पावसात दिसून आला. नेहरूनगरातील ऐतिहासिक कटकटगेटसमोरील नाला तुंबल्यामुळे पुराच्या पाण्याने कटकट दरवाजालाच वेढा घातला. - नाल्याचे पाणी वाढून नजीकच्या घरात शिरण्याची भीती निर्माण झाल्यामुळे नागरिक रस्त्यावर आले व त्यांनीच हातात बांबू घेत, तुंबलेले नाले मोकळे करून घेतले. त्यामुळे पाणी वाहून गेले. - शहरात ठिकठिकाणी अशीच अवस्था आहे. यापेक्षा अधिक पाऊस झाला तर नाल्याच्या काठावरील अनेक वासाहतीमध्ये पाणी शिरण्याची भीती आहे. - गतवर्षी नारेगावातील  वसाहतीत पाणी शिरल्याने अनेकांचे संसार पुरात वाहून गेले होते. - नाला तुंबल्यानंतर पालिकेने तात्काळ जेसीबी पाठवून तेथे सफाई सुरू केली.

टॅग्स :RainपाऊसAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी