शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
4
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
5
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
6
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
7
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
8
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
9
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
10
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
11
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
12
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
13
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
14
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
15
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
16
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
17
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
18
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
20
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...

प्रवाशांना मिळणार दिलासा,औरंगाबाद - जळगाव महामार्ग डिसेंबरअखेरपर्यंत सुसाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 5:53 PM

औरंगाबाद ते सिल्लोड हा महामार्ग मार्चअखेरपर्यंत पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर कामे हाती घेण्यात आली आहेत

ठळक मुद्देकार्यकारी अभियंत्यांचा विश्वास मार्चअखेरपर्यंत एक लेन पूर्ण करण्याचा मानस

- विजय सरवदे

औरंगाबाद : मागील दोन वर्षांपासून प्रतीक्षेत असलेला औरंगाबाद- सिल्लोड- जळगाव चारपदरी राष्ट्रीय महामार्ग डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. तत्पूर्वी, औरंगाबाद ते सिल्लोड हा महामार्ग मार्चअखेरपर्यंत पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर कामे हाती घेण्यात आली आहेत, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता तथा औरंगाबाद -सिल्लोड या चारपदरी महामार्गाचे नियंत्रक जयंत चिव्हाणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

पर्यटन आणि दळणवळणासाठी महत्त्वाचा असलेल्या औरंगाबाद- सिल्लोड- अजिंठा- जळगाव या रस्त्याचे चौपदरी करण्याची दोन-अडीच वर्षांपूर्वी केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी घोषणा केली होती. २९ जुलै २०१७ रोजी नितीन गडकरी यांच्या हस्ते या रस्त्याच्या कोनशिलेचे अनावरण झाले. त्यानंतर भूसंपादन व सपाटीकरणाच्या कामाला सुरुवात झाली. मात्र, निधी थकल्यामुळे या रस्त्याच्या कामासाठी नेमलेल्या हैदराबाद येथील ऋत्विक या कंत्राटदार कंपनीने काम अर्धवट सोडून दिले. ही बाब सजग नागरिकांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना टिष्ट्वटरच्या माध्यमातून निदर्शनास आणून दिले. तेव्हा त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेऊन लवकरात लवकर हा रस्ता पूर्ण करण्याचे आदेश दिले. त्याच वेळी औरंगाबाद खंडपीठानेही या रस्त्याच्या कामाची स्वत:हून दखल घेतली. त्यामुळे न्यायालयाला कामाच्या प्रगतीचा आढावा अधिकाऱ्यांमार्फत दिला जात आहे.पहिल्या कंत्राटदाराने अर्धवट काम सोडल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या कामासाठी तीन कंत्राटदार नेमले. यामध्ये औरंगाबाद ते सिल्लोडपर्यंतच्या रस्त्यासाठी आर. के. चव्हाण, सिल्लोड ते फर्दापूरपर्यंत आर. एस. कामटे, तर फर्दापूर ते जळगावपर्यंत स्पायरा इन्फ्रा भटनागर या कंत्राटदारांचा समावेश आहे. 

या महामार्गासाठी ४३१ कोटी रुपयांचा निधीसध्या औरंगाबाद- सिल्लोड रस्त्याच्या एका बाजूचे (लेन) काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. साधारणपणे ६० किलोमीटर लांबीच्या या रस्त्याचे काँक्रिटीकरणासाठी सध्या दोन पेव्हर मशीन कार्यरत आहेत. साधारणपणे मोठे पेव्हर मशीन दिवसाला ५०० मीटर, तर लहान पेव्हर मशीन ३०० मीटर एवढे काँक्रिटीकरणाचे काम करत आहे.४एक लवकर पूर्ण होईल व त्यावरून वाहतूक सुरू होईल. त्यामुळे दुसऱ्या लेनच्या कामासाठी फारसे अडथळे येणार नाहीत. मार्चअखेरपर्यंत दोन्ही लेनची कामे पूर्ण होतील. यासोबतच सिल्लोड-फर्दापूर व फर्दापूर-जळगाव या टप्प्याची कामे पूर्ण होतील. या रस्त्यावर चार मोठे पूल व लहान-मोठ्या कामांसाठी साधारणपणे डिसेंबरअखेरपर्यंतचा कालावधी लागेल. त्यानंतर हा रस्ता सर्वार्थाने वाहतुकीसाठी परिपूर्ण होईल. या रस्त्यासाठी सुरुवातीला ३२१ कोटी रुपयांचा निधी जाहीर केला. आता कामांमध्ये वाढ झाली असून, निधीमध्ये ११० कोटी रुपयांची भर पडली आहे, असे कार्यकारी अभियंता चिव्हाणे यांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादroad safetyरस्ते सुरक्षाhighwayमहामार्गtourismपर्यटन