शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

कचराकोंडी फुटणार पुढच्या वर्षी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 12:30 AM

शहरातील कचराप्रश्नी महापालिकेने कालबद्ध कार्यक्रम राबविण्यासाठी सुरुवात केली आहे. शहरातील कचऱ्यावर शंभर टक्के प्रक्रिया करण्यासाठी आणखी सहा महिने लागणार असल्याची कबुली सोमवारी महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक, महापौर नंदकुमार घोडेले यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देऔरंगाबाद मनपा आयुक्त : कालबद्ध कार्यक्रम राबविण्यास वेळ लागणार

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील कचराप्रश्नी महापालिकेने कालबद्ध कार्यक्रम राबविण्यासाठी सुरुवात केली आहे. शहरातील कचऱ्यावर शंभर टक्के प्रक्रिया करण्यासाठी आणखी सहा महिने लागणार असल्याची कबुली सोमवारी महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक, महापौर नंदकुमार घोडेले यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली. न्यायालयाला दिलेल्या शपथपत्रानुसार मागील ९० दिवसांमध्ये महापालिकेला काहीच काम करता आले नाही. याबद्दल पुन्हा एकदा न्यायालयाची दिलगिरी व्यक्त करण्यात येणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.शहरातील कचरा उचलणे आणि त्यावर प्रक्रिया करण्यासाठी एकच निविदा काढण्यात येत आहे. कचरा उचलणे म्हणजे चौकाचौकातील कचरा उचलणे नव्हे, तर डोअर टू डोअर कलेक्शनची जबाबदारी कंत्राटदारावर राहणार आहे. या कामासाठी त्याने सुचविलेल्या दरानुसार पैसे देण्यात येतील. कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी कंत्राटदाराला कोणत्या मशीन हव्यात त्या महापालिका खरेदी करून देईल. कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी मनपा एक रुपयाही देणार नाही. दीडशे मेट्रिक टनचे तीन प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. सध्या महापालिका खाजगी रिक्षा, चालक, डिझेल आदींसाठी २० ते २५ कोटी रुपये खर्च करीत आहे. यातील एक टप्पाही विस्कळीत झाल्यास शहरात कचºयाची ओरड होते. या सर्व बाबींचा अत्यंत बारकाईने अभ्यास करून ठोस निर्णय घेण्यात आले आहेत. डिसेंबरअखेरपर्यंत शंभर टक्के प्रक्रिया होईल.शहरात ठिकठिकाणी कचºयावर प्रक्रिया करण्यासाठीही प्रयत्न केले जातील. सध्या शहरातील प्रमुख रस्त्यांवर पडून असलेल्या कचºयाचे वर्गीकरण करून तो उचलण्यात येईल. यासाठी किमान आठ दिवसांचा वेळ लागेल.या कामासाठी कचरा वेचकांची मदत घेतली जाईल. नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे कामही सुरू करण्यात येणार आहे. प्रत्येक वॉर्डातील कचरा तेथेच जिरावा यादृष्टीनेही प्रयत्न होतील. शासनाने सुचविलेल्या डीपीआरमध्ये काही बदल करायचे असतील तर ते शासनाला सांगून बदल केले जातील.नागरिकांनी विश्वास का ठेवावा?मागील तीन महिन्यांपासून महापालिका प्रशासन आणि पदाधिकारी कचरा प्रश्नात निव्वळ घोषणा करीत आहेत. आता तरी नागरिकांनी मनपावर का विश्वास ठेवावा, या प्रश्नावर महापौर, आयुक्त यांनी नमूद केले की, न्यायालयाला दिलेल्या शपथपत्रानुसारच काम होत आहे. या कामात विलंब झाला, हे आम्हाला मान्य आहे. रमजाननिमित्त बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होत आहे. व्यापाºयांना नोटिसा देण्याचे आदेशही महापौरांनी दिले.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबादCourtन्यायालय