शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

औरंगाबादच्या वाहतूक पोलिसांना मुंबईत प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 14:09 IST

तंत्रशुद्ध पद्धतीने वाहतूक नियमन कसे करावे, सामान्य वाहनचालकांशी सुसंवाद करून कटू प्रसंग कसे टाळावेत, यासाठी शहरातील २५० वाहतूक पोलीस कर्मचारी आणि अधिकार्‍यांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय शहराचे प्रभारी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी घेतला.

औरंगाबाद : तंत्रशुद्ध पद्धतीने वाहतूक नियमन कसे करावे, सामान्य वाहनचालकांशी सुसंवाद करून कटू प्रसंग कसे टाळावेत, यासाठी शहरातील २५० वाहतूक पोलीस कर्मचारी आणि अधिकार्‍यांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय शहराचे प्रभारी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी घेतला. हे प्रशिक्षण मुंबईतील भायखळा येथील ट्रॅफिक मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये दिले जाणार आहे.

याविषयी अधिक माहिती देताना पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे म्हणाल्या की, पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी मुंबईतील वाहतूक व्यवस्था सांभाळलेली आहे. त्यांनी शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे. शहर, सिडको, छावणी आणि वाळूज या चार डिव्हिजनअंतर्गत शहरातील वाहतूक व्यवस्थेचा कारभार पाहिला जातो. प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र पोलीस निरीक्षक कार्यरत असून, सहायक पोलीस आयुक्त सी.डी. शेवगण वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्याचे काम करीत आहेत.

वाहतूक विभागात सुमारे २५० पोलीस कर्मचारी आहेत. या सर्व वाहतूक पोलिसांना आणि पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षकांना मूलभूत वाहतूक नियमन कसे करावे, वाहतूक नियमनासंदर्भात नव्याने आलेल्या आधुनिक उपकरणाचा वापर कसा करावा, सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन कॅमेरे, स्पीड गण यासह अन्य उपकरणे कशी हाताळावीत, वाहनचालकांसोबतचे होणारे वाद टाळण्यासाठी कसे संभाषण करावे, यासंदर्भात त्यांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यमान वाहतूक पोलिसांना भायखळा येथील ट्रॅफिक मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट येथे हे प्रशिक्षण देण्यात येईल. येथील कर्मचार्‍यांपैकी प्रत्येकी ५० कर्मचार्‍यांच्या पाच बॅच एकानंतर एक भायखळा येथे पाठविण्यात येणार आहेत. ५० कर्मचारी प्रशिक्षणासाठी गेल्यानंतर कर्मचार्‍यांचा निर्माण होणारा तुटवडा भरून काढण्यासाठी मुख्यालयातील कर्मचार्‍यांची मदत घेतली जाईल, असे डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांनी सांगितले. 

टॅग्स :PoliceपोलिसTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीसCommissioner Of Police Aurangabadपोलीस आयुक्त औरंगाबादMilind Bharambeमिलिंद भारंबे