शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

अडत व्यवहार पुन्हा बेमुदत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 15:20 IST

मराठवाड्यातील सर्व कृउबामध्ये ई-नाम लागू करा, मगच जाधववाडीत ई-हर्राशी होईल, तोपर्यंत अडत व्यवहार बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा व्यापाऱ्यांनी घेतला. यामुळे मंगळवारी अडत व्यवहार पूर्णपणे बंद होते.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जाधववाडीतील कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील २२ दिवसांपासून राष्ट्रीय कृषी बाजार ‘ई-नाम’ योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. मात्र, यात शेतीमाल विकल्यावर रोख रक्कम मिळत नसल्याने शेतकरी अन्य कृउबामध्ये जाऊन माल विकत आहेत. या योजनेत अनेक त्रुटी असून, मराठवाड्यातील सर्व कृउबामध्ये ई-नाम लागू करा, मगच जाधववाडीत ई-हर्राशी होईल, तोपर्यंत अडत व्यवहार बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा व्यापाऱ्यांनी घेतला. यामुळे मंगळवारी अडत व्यवहार पूर्णपणे बंद होते. मात्र, परपेठेतील शेतीमाल व होलसेल व्यवहार सुरू होते.शेतक-यांच्या शेतीमालास जास्त भाव मिळावा, यासाठी केंद्र सरकारने देशातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये ‘ई-नाम’ योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला. राज्यात पहिल्या टप्प्यात औरंगाबादेतील कृउबाचा समावेश करण्यात आला. मागील २२ दिवसांपासून येथील जाधववाडीत धान्य खरेदी-विक्रीची ‘ई-नाम’ योजना सुरू आहे. बाजार समितींतर्गत ‘ई-हर्राशी’ केली जात आहे. १२ मार्चपासून शेतक-यांनी आणलेला सर्व शेतीमाल सेल हॉल क्र. २ येथे उतरवून घेतला जात होता व ‘ई-हर्राशी’ करण्यात येत होती. आठ दिवसांनंतर अडत्याच्या दुकानासमोर ‘ई-हर्राशी’ करण्याचा निर्णय घेण्यात आला. येथे काही दिवस ‘ई-हर्राशी’ झाली. मात्र, शेतकरी रोख रक्कम मागत असल्याचे अडत्यांचे म्हणणे आहे. तसेच हर्राशीसाठी अवघ्या दीड मिनिटाचा वेळ देण्यात आला तोही अपुरा आहे, असेही अडत्यांनी सांगितले. तसेच ई-नाम पोर्टलवर ई-हर्राशीला उशीर लागत असून, दररोज १५० ते २०० पोत्यांचीच हर्राशी होत असल्याचा आरोप अडत्यांनी केला. यासंदर्भात अडत असोसिएशनच्या वतीने बाजार समितीचे सभापती व सचिवांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, शेतकरी जालना, लासूर स्टेशन आदी कृउबामध्ये ‘ई-नाम’ सुरू नसल्याने तिकडे शेतीमाल घेऊन जात आहेत. याचा मोठा फटका जाधववाडीतील आवकीला बसला आहे. जोपर्यंत अन्य कृउबामध्ये ई-नाम सुरू होत नाही तोपर्यंत अडत व्यवहार बंद ठेवण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. यामुळे दिवसभरात अडत व्यवहार झालेच नाहीत.शेंद्र्यातील शेतकरी गणेश काकडे यांनी ट्रॅक्टरमध्ये १०० पोती ज्वारी विक्रीसाठी आणली होती. मात्र, जाधववाडीत आल्यावर येथे अडत्यांचा बंद असल्याचे त्यांना कळले. ज्वारी उतरवून घेण्यास अडते व बाजार समितीनेही नकार दिला. यामुळे संतापलेल्या काकडे यांनी सांगितले की, बेमुदत बंद असल्याची शेतक-यांना पूर्वसूचना देणे आवश्यक होते. आता ट्रॅक्टरचे भाडे कोण देणार, असा सवालही त्यांनी विचारला.अडत्यांचे परवानेरद्द करणार‘ई-नाम’ ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. ती शेतक-यांच्या फायद्याची आहे. मात्र, अडत व्यापारी सतत व्यवहार बंद ठेवून अंमलबजावणीत अडथळे आणत आहेत. जीवनावश्यक वस्तूंची बाजारपेठ बंद ठेवता येत नाही. अडत्यांनी कितीही विरोध केला तरीही ‘ई-नाम’ योजनेनुसारच आता बाजार समितीमध्ये धान्याचे व्यवहार होणार आहेत. अडत्यांनी शेतकºयांची अडवणूक करू नये व आपले व्यवहार सुरू करावेत, नसता अडत्यांचे परवाने रद्द करण्याची कठोर कारवाई बाजार समितीला करावी लागेल.-राधाकिसन पठाडेसभापती, जाधववाडी बाजार समिती

टॅग्स :businessव्यवसायgovernment schemeसरकारी योजनाFarmerशेतकरीmarket yardमार्केट यार्डMarathwadaमराठवाडा