शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

अंत्ययात्रेला निघालेले ट्रॅक्टर पाण्यात कलंडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 17:26 IST

नादरपूरच्या अंजना नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत  असल्याने  नागरिकांना  स्मशानभूमीपर्यंत जाण्यास  अनेक अडचणी  येत  आहेत.  पाच ते दहा फुट पाणी असल्याने अंत्ययात्रेसाठी येणाऱ्या नागरिकांना वाहनातूनच स्मशानभूमीपर्यंत आणावे लागत आहे.

पिशोर : नादरपूर शिवारात २१ वर्षीय तरूणाने गुरूवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. या तरूणाच्या अंत्ययात्रेसाठी निघालेल्या महिलांचे ट्रॅक्टर सायंकाळच्या सुमारास स्मशानभूमीजवळच कलंडल्याची घटना गुरूवारी घडली. या अपघातात कोणतीही जिवीत हानी झाली नाही.

अंजना नदीवरील पूल विधानसभा निवडणूकीदरम्यान घाई गडबडीत तोडण्यात आला होता. तो अद्यापही दुरूस्त झाला नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. नादरपूरच्या अंजना नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत  असल्याने  नागरिकांना  स्मशानभूमीपर्यंत जाण्यास अनेक अडचणी येत आहेत. पाच ते दहा फुट पाणी असल्याने अंत्ययात्रेसाठी येणाऱ्या नागरिकांना वाहनातूनच स्मशानभूमीपर्यंत आणावे लागत आहे.

सदरील ट्रॅक्टरही नदीत मधोमध आल्यानंतर त्याची चाके वाळूत रूतल्याने ट्राॅली अर्धी कलंडली. हे पाहताच पायी गेलेल्या नगारिकांनी ट्रॅक्टरकडे धाव घेत पाण्यात पडलेल्या महिलांना बाहेर काढले. हा नेहमीचाच झालेला प्रश्न लवकरच सोडवावा, अशी मागणी काही नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAccidentअपघातriverनदी