शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

आग्या मोहोळाच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू; गतिमंद आई-वडिलांचा  एकमेव आधार हिरावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2023 17:38 IST

या हल्ल्यात चिमुकल्याची आई देखील गंभीर जखमी झाली होती

सिल्लोड: शेतात काम करत असताना आग्या मोहोळच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या चिमुकल्याचा १० दिवसांनंतर उपचारादरम्यान शुक्रवारी ( दि. ३१) मृत्यू झाला. रुद्र शेषराव शिंदे (५  रा.धावडा) असे मृत मुलाचे नाव आहे. हा हल्ला २१ मार्च रोजी धावडा येथे झाला होता. 

२१ मार्च रोजी दुपारी १२ वाजता शांताबाई शेषराव शिंदे ( ४० ) या आपला मुलगा रुद्रला सोबत घेऊन धावडा येथील एका शेतात मजुरीचे काम करत होत्या. कापूस वेचत असताना अचानक झाडातून बाहेर आलेल्या आग्या मोहोळाच्या माश्यांनी शांताबाई आणि रुद्रवर हल्ला केला. गंभीर जखमी आई आणि मुलास सिल्लोड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील एका खाजगी रुग्णालयात दोघांवर अधिक उपचार सुरु होते. दरम्यान, शांताबाई यांची प्रकृतीमध्ये सुधारणा झाली. मात्र, ३१ मार्च रोजी दुपारी १२ वाजता रुद्रचा मृत्यू झाला.

गतिमंद आई-वडिलांचा एकमेव आधारशांताबाई आणि त्यांचे पती गतिमंद आहेत. लग्नाच्या १५ वर्षानंतर रुद्रचा जन्म झाला होता. तोच त्यांचा एकमेव आधार होता. त्याच्या मृत्यूने हतबल आई-वडिलांचा आधार हिरावला गेला आहे. रुद्रच्या मृत्यूचा मोठा धक्का त्याच्या आईवडिलांना बसल्याची माहिती आत्या मीराबाई सोनवणे यांनी दिली. या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी १ एप्रिल रोजी दुपारी अकस्मात मृत्यू दाखल केला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीDeathमृत्यू