शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

लढायचं की पाडायचं? मनोज जरांगेंनी २० तारखेला बोलावली अंतिम बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 17:06 IST

फडणवीसांची राज्यातील पूर्ण प्लॅनिंग फेल करणार; मनोज जरांगे यांचा इशारा

वडीगोद्री( जालना):मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका करत राज्यातील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारवर गंभीर आरोप केले. उपमुख्यमंत्री  फडणवीस यांची राज्यातील विधानसभेची प्लॅनिंग पूर्ण अपयशी करणार असा इशारा मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांनी आज दिला. “मला मोठ्या डाकूला खेटायचं आहे” असे जाहीर करत २० ऑक्टोबर रोजी मराठा समाजाची अंतिम निर्णय बैठक आयोजित केली असल्याची माहिती जरांगे यांनी दिली. 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे कोणती भूमिका घेणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे. आज सकाळी महायुती सरकारमधील सर्व पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. त्यानंतर मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी संवाद साधला. जरांगे पुढे म्हणाले की, २० तारेखेच्या बैठकीत विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभा करायचे की सरकारविरोधात लढायचे याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. जरांगे यांनी इच्छुक उमेदवारांसोबत चर्चेसाठी उद्या अंतरवाली सराटी येथे बैठक बोलावली आहे. त्यांनी आवाहन केले की, ज्यांना शक्य आहे त्यांनी या बैठकीत उपस्थित राहावे आणि मराठा समाजाच्या भविष्यातील दिशा ठरवण्यात आपला सहभाग द्यावा. 

दरम्यान, मनोज जरांगे यांनी सरकारवर टीका केली मात्र, एकमात्र एकनाथ शिंदेच मराठ्यांना आरक्षण देऊ शकतात, असे सांगितले. शिंदे यांच्या धाडसी भूमिकेचे समर्थन करत जरांगे म्हणाले की, “तुम्हाला कोण काम करून देत नाही हे आम्हाला माहित नाही. मी सहा कोटी मराठ्यांना सांगितलं होतं की शिंदे साहेब आरक्षण देतील, पण अजूनही ते मिळालेलं नाही.”

देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत त्यांनी म्हटले की, “फडणवीस यांनी ओबीसींमध्ये १५ जातींचा समावेश करून मराठ्यांचे प्रमाणपत्र रोखले. केसेस केल्या, ज्यामुळे मराठा युवकांना नोकऱ्यांमध्ये प्रवेश मिळवणे कठीण झाले. फडणवीस यांनी दिलेले आश्वासन फसवे ठरले.”  जरांगे यांनी शेतकरी कर्जमाफी आणि नुकसानीच्या भरपाईच्या मुद्द्यांवरही सरकारवर टीका केली. शेतकऱ्यांना मिळालेल्या वाईट वागणुकीबद्दल त्यांनी सरकारला धारेवर धरले. “तुम्हाला आमचे मुडदे बघायची सवय लागली आहे,” असे म्हणत त्यांनी सरकारविरोधातील असंतोष व्यक्त केला.

निर्णय झाल्यास मागे हटणार नाही२० ऑक्टोबर रोजी अंतरवाली सराटीत होणाऱ्या बैठकीत मराठा समाजाचा पुढील राजकीय निर्णय ठरवला जाईल, आणि जर एकदा निर्णय झाला तर तो मागे घेतला जाणार नाही, असे जरांगे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस