शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंसोबत रात्री बैठक, सकाळी पत्रकार परिषद; महायुतीबाबत रवींद्र चव्हाणांचं मोठं विधान
2
परदेशी लोकांच्या हातात जाणार का सरकारी IDBI बँक? कॅनडाची दिग्गज कंपनीही खरेदीसाठी रेसमध्ये
3
कॉम्पॅक्ट एसयूव्ही बाजारात ब्रेझाची विक्री घटली; या चार कारना ग्राहक देतायत पसंती...
4
ITR रिफंड मिळाला नाही? लाखो करदाते चिंतेत, विलंबाचं खरं कारण काय? अजून किती वाट पाहावी लागणार?
5
नवीन कायद्यामुळे कर्मचाऱ्यांना लागेल कमी कर; कर्मचाऱ्यांच्या वेतनाची रचना बदलणार असल्याचा फायदा
6
Dog Attack Mumbai: बिबट्यासारखी उडी आणि खांदा पकडला जबड्यात; मुंबईत भटक्या कुत्र्याचा सुरक्षारक्षकावर हल्ला, Video पहा
7
जपान पुन्हा हादरला: ६.७ तीव्रतेचा जोरदार भूकंप, पॅसिफिक किनारपट्टीसाठी त्सुनामीचा इशारा जारी
8
रिस्क घेतली अन् गुंतवणूक वाढली! इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीत २१ टक्क्यांनी वाढ; सलग तीन महिन्यांच्या घसरणीला ब्रेक
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना काळाचा घाला, बस खोल दरीत कोसळली, ९ जण ठार झाल्याची भिती
10
भविष्यातील भारतात अदानी ग्रुपचं काय योगदान असेल?; प्रणव अदानींनी सांगितला संपूर्ण 'प्लॅन'
11
"घरी ये, लग्नाची बोलणी करू..."; तरुणाला घरी बोलावलं अन् गर्लफ्रेंडच्या कुटुंबाने मिळून संपवलं!
12
Samruddhi Mahamarg Accident: साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला निघाले, मृत्युने समृद्धी महामार्गावरच गाठले; दोघे ठार, तर...
13
अपमान सहन होईना! बांगलादेशचे राष्ट्रपती शहाबुद्दीन निवडणुकीनंतर पद सोडणार, युनूस सरकारवर गंभीर आरोप
14
मराठवाड्यातील ७० हजार कुटुंबांना आता हक्काचे घर; ‘मदत माश’ जमिनीवरील घरे नियमित होणार
15
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
16
लुथरा बंधूंना पोलिसांनी पकडलं, पण थायलंडमधून भारतात आणण्यास आणखी उशीर होणार! कारण काय?
17
NPS, UPS आणि अटल पेन्शनच्या नियमांमध्ये मोठा बदल; कोणाला होणार किती फायदा?
18
केंद्रीय प्राधिकरणावरील अधिकारी लोकायुक्त कक्षेत; महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयक मंजूर
19
Leopard Spotted in Pune Airport: अखेर सापडला! पुणे विमानतळ परिसरात लपलेला बिबट्या ७ महिन्यांनी अडकला पिंजऱ्यात
20
Shivraj Patil Death: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 
Daily Top 2Weekly Top 5

लढायचं की पाडायचं? मनोज जरांगेंनी २० तारखेला बोलावली अंतिम बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 17:06 IST

फडणवीसांची राज्यातील पूर्ण प्लॅनिंग फेल करणार; मनोज जरांगे यांचा इशारा

वडीगोद्री( जालना):मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका करत राज्यातील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारवर गंभीर आरोप केले. उपमुख्यमंत्री  फडणवीस यांची राज्यातील विधानसभेची प्लॅनिंग पूर्ण अपयशी करणार असा इशारा मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांनी आज दिला. “मला मोठ्या डाकूला खेटायचं आहे” असे जाहीर करत २० ऑक्टोबर रोजी मराठा समाजाची अंतिम निर्णय बैठक आयोजित केली असल्याची माहिती जरांगे यांनी दिली. 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे कोणती भूमिका घेणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे. आज सकाळी महायुती सरकारमधील सर्व पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. त्यानंतर मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी संवाद साधला. जरांगे पुढे म्हणाले की, २० तारेखेच्या बैठकीत विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभा करायचे की सरकारविरोधात लढायचे याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. जरांगे यांनी इच्छुक उमेदवारांसोबत चर्चेसाठी उद्या अंतरवाली सराटी येथे बैठक बोलावली आहे. त्यांनी आवाहन केले की, ज्यांना शक्य आहे त्यांनी या बैठकीत उपस्थित राहावे आणि मराठा समाजाच्या भविष्यातील दिशा ठरवण्यात आपला सहभाग द्यावा. 

दरम्यान, मनोज जरांगे यांनी सरकारवर टीका केली मात्र, एकमात्र एकनाथ शिंदेच मराठ्यांना आरक्षण देऊ शकतात, असे सांगितले. शिंदे यांच्या धाडसी भूमिकेचे समर्थन करत जरांगे म्हणाले की, “तुम्हाला कोण काम करून देत नाही हे आम्हाला माहित नाही. मी सहा कोटी मराठ्यांना सांगितलं होतं की शिंदे साहेब आरक्षण देतील, पण अजूनही ते मिळालेलं नाही.”

देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत त्यांनी म्हटले की, “फडणवीस यांनी ओबीसींमध्ये १५ जातींचा समावेश करून मराठ्यांचे प्रमाणपत्र रोखले. केसेस केल्या, ज्यामुळे मराठा युवकांना नोकऱ्यांमध्ये प्रवेश मिळवणे कठीण झाले. फडणवीस यांनी दिलेले आश्वासन फसवे ठरले.”  जरांगे यांनी शेतकरी कर्जमाफी आणि नुकसानीच्या भरपाईच्या मुद्द्यांवरही सरकारवर टीका केली. शेतकऱ्यांना मिळालेल्या वाईट वागणुकीबद्दल त्यांनी सरकारला धारेवर धरले. “तुम्हाला आमचे मुडदे बघायची सवय लागली आहे,” असे म्हणत त्यांनी सरकारविरोधातील असंतोष व्यक्त केला.

निर्णय झाल्यास मागे हटणार नाही२० ऑक्टोबर रोजी अंतरवाली सराटीत होणाऱ्या बैठकीत मराठा समाजाचा पुढील राजकीय निर्णय ठरवला जाईल, आणि जर एकदा निर्णय झाला तर तो मागे घेतला जाणार नाही, असे जरांगे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस