शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

सरकारच्या डोक्याला ‘शॉक’ देण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 23:15 IST

माथाडी कामगारांना सामाजिक सुरक्षा मिळवून देणाºया माथाडी कायद्याच्या अंमलबजावणीला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. आता हा कायदा संपूर्ण भारतात लागू करण्याचा प्रयत्न केला जात आहे; मात्र दुसरीकडे मूठभर भांडवलदारांच्या हितासाठी राज्य शासनाने हा कायदाच संपविण्याचा घाट घातला आहे. वेड्या झालेल्या या सरकारच्या डोक्याला ‘शॉक’ देण्याची वेळ आली आहे, असा संतप्त इशारा महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी दिला.

ठळक मुद्देबाबा आढाव : कष्टकऱ्यांच्या जाहीरनामा परिषदेला चांगला प्रतिसाद

औरंगाबाद : माथाडी कामगारांना सामाजिक सुरक्षा मिळवून देणाºया माथाडी कायद्याच्या अंमलबजावणीला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. आता हा कायदा संपूर्ण भारतात लागू करण्याचा प्रयत्न केला जात आहे; मात्र दुसरीकडे मूठभर भांडवलदारांच्या हितासाठी राज्य शासनाने हा कायदाच संपविण्याचा घाट घातला आहे. वेड्या झालेल्या या सरकारच्या डोक्याला ‘शॉक’ देण्याची वेळ आली आहे, असा संतप्त इशारा महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी दिला.शेतकºयांसह सर्व अंगमेहनती कष्टकºयांना सन्मानाने जगता येईल अशा मागण्यांचा जाहीरनामा तयार करण्याचा एक भाग म्हणून बाबा आढाव यांनी संपूर्ण राज्याचा दौरा सुरू केला आहे. याअंतर्गत शनिवारी जाधववाडी येथील शेतकरी भवनात कष्टकºयांची परिषद आयोजित करण्यात आली होती. बाबा आढाव यांनी सांगितले की, महाराष्ट्राने रोजगार हमी योजना आणली. हा कायदा संपूर्ण देशभरात राबविला जात आहे. देशात आजघडीला ५० कोटी कष्टकरी आहेत. फक्त २० टक्के भांडवलदारांच्या हिताचे निर्णय केंद्र सरकार घेत आहे. राज्य शासनाने तर राज्यातील ३६ माथाडी मंडळे संपवून एकच महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेत आहे. आम्ही आंदोलन केले; पण सरकारच्या डोक्यातून एकच महामंडळ स्थापन करण्याचे भूत जात नाही. राज्यातील जनता दुष्काळ भोगत असताना मुख्यमंत्र्यांना दुष्काळसदृश परिस्थिती असल्यासारखे वाटत आहे. सरकारने दुष्काळ जाहीर करून रोजगार हमीची कामे उपलब्ध करून द्यावीत, आदी मागण्यांचा जाहीरनामा तयार करण्यात येत असल्याचेही त्यांनी नमूद केले. परिषदेत हमाल मापाडी महामंडळाचे सरचिटणीस सुभाष लोमटे, तसेच अर्थतज्ज्ञ प्रा. एच.एम. देसरडा, अ‍ॅड. विष्णू ढोबळे, अण्णा खंदारे, अ‍ॅड. बुद्धिनाथ बºहाळ, राजकुमार घायाळ, विकास मुगदूम, गोरख मेनगडे, मराठवाडा लेबर युनियनचे अध्यक्ष डॉ. सुधीर देशमुख, कृउबाचे संचालक देवीदास कीर्तिशाही आदींची उपस्थिती होती.चौकटआमदारांऐवजी कष्टकºयांना पेन्शन द्याडॉ. बाबा आढाव यांनी सांगितले की, आजी-माजी सर्व आमदारांना प्रत्येकी ५० हजार रुपये पेन्शन मिळते. एखाद्याने आपल्या बायकोचा खून केला, तर त्यास जन्मठेप होते. त्या प्रत्येक कैद्यावर सरकार महिन्याकाठी १५ हजार रुपये खर्च करते. मात्र, जे प्रामाणिकपणे, अंगमेहनतीची कामे करतात त्या कष्टकºयांना ३ हजार रुपये पेन्शन देण्यासाठी सरकार नकार देते. सर्वप्रथम आमदारांचे पेन्शन बंद करा व कष्टकºयांना पेन्शन लागू करा, हीच जाहीरनाम्याची मुख्य मागणी असल्याचे त्यांनी नमूद केले.

टॅग्स :Baba Adhavबाबा आढावagitationआंदोलन