शहरं
Join us  
Trending Stories
1
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
2
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
3
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
4
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
5
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
6
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
7
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
8
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
9
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
10
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
11
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
12
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
13
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
14
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
15
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
16
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
17
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
18
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
19
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
20
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

तीन जलवाहिन्या, तरी पाणीप्रश्न कायम; उन्हाळ्यातही पाणीटंचाईच्या झळा राहणार

By मुजीब देवणीकर | Updated: April 13, 2024 19:23 IST

प्रत्येक वसाहतीला कमी दाबाने आणि एक ते दोन दिवस उशिराने पाणीपुरवठा होतोय.

छत्रपती संभाजीनगर : शहराची तहान भागविण्यासाठी पूर्वी दोन जुन्या जीर्ण जलवाहिन्या होत्या. आता तिसरी नवीन जलवाहनीही सुरू झाली. त्यानंतरही यंदाच्या उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या झळा कायम राहणार आहेत. शहरवासीयांना उन्हाळ्यात मनपाकडून कोणताही दिलासा मिळण्याची शक्यता नाही.

शहरासाठी जायकवाडीहून नक्षत्रवाडीपर्यंत ७०० आणि १२०० मिमी व्यासाच्या दोन जलवाहिन्या टाकण्यात आलेल्या आहेत. या दोन्ही जलवाहिन्यांचे आयुष्य संपले आहे. त्यामुळे २५०० मिमी व्यासाच्या नवीन पाणी पुरवठा योजनेचे काम सध्या सुरू आहे. ७०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीच्या बाजूलाच ९०० मिमी व्यासाची नवीन जलवाहिनी जायकवाडी ते नक्षत्रवाडी दरम्यान टाकण्यात आली. त्यामुळे आता शहरासाठी ७००, ९०० आणि १२०० मिमी व्यासाच्या अशा तीन योजनांमधून शहराला पाणी पुरवठा केला जात आहे. ९०० मिमी व्यासाच्या योजनेमुळे २० एमएलडी पाणी वाढले असा मनपाचा दावा आहे. प्रत्यक्षात एवढे पाणी वाढलेलेच नाही. पाणी वाढले असते तर शहरात किंचित प्रमाणात तरी त्याचा प्रभाव दिसून आला असता. शहरात कुठेच याचा प्रभाव दिसून येत नाही. प्रत्येक वसाहतीला कमी दाबाने आणि एक ते दोन दिवस उशिराने पाणीपुरवठा होतोय.

पाणी वाढले असा मनपाचा दावा असला तरी जिन्सी, दिल्लीगेट, शहागंज, मरीमाता या ठिकाणच्या जलकुंभांमधून शहराच्या ज्या ज्या भागात पाणीपुरवठा केला जातो त्या त्या भागात सातव्या ते दहाव्या दिवशी पाणीपुरवठा होत आहे. हा पाणीपुरवठा पाचव्या दिवशी करण्यात पालिकेच्या यंत्रणेला अद्याप यश आलेले नाही. उन्हाळा संपेपर्यंत तरी त्यात यश येणार नाही असे मानले जात आहे. त्याला पालिकेच्या अधिकाऱ्यांनीदेखील दुजोरा दिला आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी