शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

तीन जलवाहिन्या, तरी पाणीप्रश्न कायम; उन्हाळ्यातही पाणीटंचाईच्या झळा राहणार

By मुजीब देवणीकर | Updated: April 13, 2024 19:23 IST

प्रत्येक वसाहतीला कमी दाबाने आणि एक ते दोन दिवस उशिराने पाणीपुरवठा होतोय.

छत्रपती संभाजीनगर : शहराची तहान भागविण्यासाठी पूर्वी दोन जुन्या जीर्ण जलवाहिन्या होत्या. आता तिसरी नवीन जलवाहनीही सुरू झाली. त्यानंतरही यंदाच्या उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या झळा कायम राहणार आहेत. शहरवासीयांना उन्हाळ्यात मनपाकडून कोणताही दिलासा मिळण्याची शक्यता नाही.

शहरासाठी जायकवाडीहून नक्षत्रवाडीपर्यंत ७०० आणि १२०० मिमी व्यासाच्या दोन जलवाहिन्या टाकण्यात आलेल्या आहेत. या दोन्ही जलवाहिन्यांचे आयुष्य संपले आहे. त्यामुळे २५०० मिमी व्यासाच्या नवीन पाणी पुरवठा योजनेचे काम सध्या सुरू आहे. ७०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीच्या बाजूलाच ९०० मिमी व्यासाची नवीन जलवाहिनी जायकवाडी ते नक्षत्रवाडी दरम्यान टाकण्यात आली. त्यामुळे आता शहरासाठी ७००, ९०० आणि १२०० मिमी व्यासाच्या अशा तीन योजनांमधून शहराला पाणी पुरवठा केला जात आहे. ९०० मिमी व्यासाच्या योजनेमुळे २० एमएलडी पाणी वाढले असा मनपाचा दावा आहे. प्रत्यक्षात एवढे पाणी वाढलेलेच नाही. पाणी वाढले असते तर शहरात किंचित प्रमाणात तरी त्याचा प्रभाव दिसून आला असता. शहरात कुठेच याचा प्रभाव दिसून येत नाही. प्रत्येक वसाहतीला कमी दाबाने आणि एक ते दोन दिवस उशिराने पाणीपुरवठा होतोय.

पाणी वाढले असा मनपाचा दावा असला तरी जिन्सी, दिल्लीगेट, शहागंज, मरीमाता या ठिकाणच्या जलकुंभांमधून शहराच्या ज्या ज्या भागात पाणीपुरवठा केला जातो त्या त्या भागात सातव्या ते दहाव्या दिवशी पाणीपुरवठा होत आहे. हा पाणीपुरवठा पाचव्या दिवशी करण्यात पालिकेच्या यंत्रणेला अद्याप यश आलेले नाही. उन्हाळा संपेपर्यंत तरी त्यात यश येणार नाही असे मानले जात आहे. त्याला पालिकेच्या अधिकाऱ्यांनीदेखील दुजोरा दिला आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी