शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

तीन जलवाहिन्या, तरी पाणीप्रश्न कायम; उन्हाळ्यातही पाणीटंचाईच्या झळा राहणार

By मुजीब देवणीकर | Updated: April 13, 2024 19:23 IST

प्रत्येक वसाहतीला कमी दाबाने आणि एक ते दोन दिवस उशिराने पाणीपुरवठा होतोय.

छत्रपती संभाजीनगर : शहराची तहान भागविण्यासाठी पूर्वी दोन जुन्या जीर्ण जलवाहिन्या होत्या. आता तिसरी नवीन जलवाहनीही सुरू झाली. त्यानंतरही यंदाच्या उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या झळा कायम राहणार आहेत. शहरवासीयांना उन्हाळ्यात मनपाकडून कोणताही दिलासा मिळण्याची शक्यता नाही.

शहरासाठी जायकवाडीहून नक्षत्रवाडीपर्यंत ७०० आणि १२०० मिमी व्यासाच्या दोन जलवाहिन्या टाकण्यात आलेल्या आहेत. या दोन्ही जलवाहिन्यांचे आयुष्य संपले आहे. त्यामुळे २५०० मिमी व्यासाच्या नवीन पाणी पुरवठा योजनेचे काम सध्या सुरू आहे. ७०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीच्या बाजूलाच ९०० मिमी व्यासाची नवीन जलवाहिनी जायकवाडी ते नक्षत्रवाडी दरम्यान टाकण्यात आली. त्यामुळे आता शहरासाठी ७००, ९०० आणि १२०० मिमी व्यासाच्या अशा तीन योजनांमधून शहराला पाणी पुरवठा केला जात आहे. ९०० मिमी व्यासाच्या योजनेमुळे २० एमएलडी पाणी वाढले असा मनपाचा दावा आहे. प्रत्यक्षात एवढे पाणी वाढलेलेच नाही. पाणी वाढले असते तर शहरात किंचित प्रमाणात तरी त्याचा प्रभाव दिसून आला असता. शहरात कुठेच याचा प्रभाव दिसून येत नाही. प्रत्येक वसाहतीला कमी दाबाने आणि एक ते दोन दिवस उशिराने पाणीपुरवठा होतोय.

पाणी वाढले असा मनपाचा दावा असला तरी जिन्सी, दिल्लीगेट, शहागंज, मरीमाता या ठिकाणच्या जलकुंभांमधून शहराच्या ज्या ज्या भागात पाणीपुरवठा केला जातो त्या त्या भागात सातव्या ते दहाव्या दिवशी पाणीपुरवठा होत आहे. हा पाणीपुरवठा पाचव्या दिवशी करण्यात पालिकेच्या यंत्रणेला अद्याप यश आलेले नाही. उन्हाळा संपेपर्यंत तरी त्यात यश येणार नाही असे मानले जात आहे. त्याला पालिकेच्या अधिकाऱ्यांनीदेखील दुजोरा दिला आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी