तीन टक्केच पेरण्या

By Admin | Updated: June 23, 2014 00:20 IST2014-06-22T23:27:19+5:302014-06-23T00:20:13+5:30

परभणी: पावसाळा सुरु होऊन तब्बल तीन आठवडे उलटले तरी अद्यापही पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत.

Three percent sown | तीन टक्केच पेरण्या

तीन टक्केच पेरण्या

परभणी: पावसाळा सुरु होऊन तब्बल तीन आठवडे उलटले तरी अद्यापही पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. काही बागायतदार शेतकऱ्यांनी कापूस व हळदीची लागवड केली आहे. जिल्ह्यात केवळ ३ टक्केच पेरणी झाल्याचे कृषी विभागाने सांगितले.
जिल्ह्यात खरीप लागवडीचे क्षेत्र ५ लाख ५९ हजार ५०० हेक्टर एवढे असून पिकाखालील सर्वसाधारण क्षेत्र ५ लाख ३८ हजार २१० हेक्टर एवढे आहे. त्यापैकी केवळ तीन टक्के म्हणजे ९ हजार हेक्टरवर केवळ बागातदार शेतकऱ्यांनी कपाशी व हळदीची लागवड केली आहे. यंदा खरीप हंगामात १ लाख ९० हजार हेक्टवर कपाशीची लागवड होणार आहे. तसेच सोयाबीन पिकाची १ लाख ८० हजार हेक्टवर लागवड होण्याची शक्यता आहे. परंतु, जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत पाऊस न पडल्याने जिल्ह्यातील खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. (प्रतिनिधी)
जिल्ह्यात पेरण्या खोळंबल्या
गतवर्षी जूनच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने जूनच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत ५० ते ६० टक्के खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. परंतु, यंदा मात्र २२ जून उलटला तरी पावसाने दमदार हजेरी लावली नाही. त्यामुळे अद्यापही खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. शेतकरी आता मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. काही शेतकऱ्यांनी पेरणीची पूर्ण तयारी करुन ठेवली आहे.

Web Title: Three percent sown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.