शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

देवीच्या दर्शनाला जाताना भरधाव ट्रॅक्टरने उडवले; दुचाकीवरील तीन मंजुरांनी प्राण गमावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 12:56 IST

सिल्लोड तालुक्यातील घटना; अपघातानंतर ट्रॅक्टर चालक गेला पळून

सिल्लोड : भोकरदन तालुक्यातील अन्वा येथे नवरात्रीनिमित्त निघणाऱ्या आजूबाईच्या स्वारीला जाणाऱ्या दुचाकीवरील मजुरांना भरधाव ट्रॅक्टरने चिरडल्याने दोन मित्रांचा जागेवरच तर एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात सिल्लोड ते छत्रपती संभाजीनगर मार्गावरील लिहाखेडी फाट्याजवळ शनिवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडला. समाधान अवचितराव आघाडे (वय ४१), काशिनाथ गोविंदा पांढरे (वय ४५, दोघे रा. उपळी, ता. सिल्लोड), विकास रामभाऊ सोनवणे (वय २५, रा. अन्वा, ह. मु. उपळी) अशी मृतांची नावे आहेत.

उपळी येथील समाधान आघाडे, काशिनाथ पांढरे व विकास सोनवणे हे तीन मित्र शनिवारी रात्री आठ वाजता दुचाकीने (एमएच. २०, एआर. ७०२५) अन्वा येथे आजूबाई देवीच्या स्वारीसाठी जात होते. रात्री ९ वाजता लिहाखेडी फाट्याजवळ समोरून आलेल्या ट्रॅक्टरने दुचाकीला जोराची धडक दिली. यात समाधान आणि विकास यांचा जागीच मृत्यू झाला. तर काशिनाथ हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर चालक ट्रॅक्टर घेऊन पळून गेला. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत तिघांनाही तातडीने सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासणी केली असता समाधान व विकास यांना मृत घोषित केले तर काशिनाथचा सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना रात्री ११:३० वाजता मृत्यू झाला. या अपघाताची अजिंठा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अमोल ढाकणे करत आहेत.

मयत तिघेही मजूरया घटनेतील तिन्ही मयत मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. काशिनाथ यांच्याकडे एक एकर जमीन आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा, एक भाऊ असा परिवार आहे. तर समाधान यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आहेत. त्यांच्या आईचे दोन महिन्यांपूर्वी निधन झाले आहे. विकास हा अविवाहित होता. त्याच्या पश्चात वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. काशिनाथ यांच्या पार्थिवावर रविवारी दुपारी दीड वाजता पूर्णा नदी तिरावरील स्मशानभुमीत तर समाधान व विकास यांच्या पार्थिवावर दुपारी दोन वाजता अंजना नदी तिरावरील स्माशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :Accidentअपघातchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर