शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

देवीच्या दर्शनाला जाताना भरधाव ट्रॅक्टरने उडवले; दुचाकीवरील तीन मंजुरांनी प्राण गमावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 12:56 IST

सिल्लोड तालुक्यातील घटना; अपघातानंतर ट्रॅक्टर चालक गेला पळून

सिल्लोड : भोकरदन तालुक्यातील अन्वा येथे नवरात्रीनिमित्त निघणाऱ्या आजूबाईच्या स्वारीला जाणाऱ्या दुचाकीवरील मजुरांना भरधाव ट्रॅक्टरने चिरडल्याने दोन मित्रांचा जागेवरच तर एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात सिल्लोड ते छत्रपती संभाजीनगर मार्गावरील लिहाखेडी फाट्याजवळ शनिवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडला. समाधान अवचितराव आघाडे (वय ४१), काशिनाथ गोविंदा पांढरे (वय ४५, दोघे रा. उपळी, ता. सिल्लोड), विकास रामभाऊ सोनवणे (वय २५, रा. अन्वा, ह. मु. उपळी) अशी मृतांची नावे आहेत.

उपळी येथील समाधान आघाडे, काशिनाथ पांढरे व विकास सोनवणे हे तीन मित्र शनिवारी रात्री आठ वाजता दुचाकीने (एमएच. २०, एआर. ७०२५) अन्वा येथे आजूबाई देवीच्या स्वारीसाठी जात होते. रात्री ९ वाजता लिहाखेडी फाट्याजवळ समोरून आलेल्या ट्रॅक्टरने दुचाकीला जोराची धडक दिली. यात समाधान आणि विकास यांचा जागीच मृत्यू झाला. तर काशिनाथ हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर चालक ट्रॅक्टर घेऊन पळून गेला. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत तिघांनाही तातडीने सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासणी केली असता समाधान व विकास यांना मृत घोषित केले तर काशिनाथचा सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना रात्री ११:३० वाजता मृत्यू झाला. या अपघाताची अजिंठा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अमोल ढाकणे करत आहेत.

मयत तिघेही मजूरया घटनेतील तिन्ही मयत मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. काशिनाथ यांच्याकडे एक एकर जमीन आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा, एक भाऊ असा परिवार आहे. तर समाधान यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आहेत. त्यांच्या आईचे दोन महिन्यांपूर्वी निधन झाले आहे. विकास हा अविवाहित होता. त्याच्या पश्चात वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. काशिनाथ यांच्या पार्थिवावर रविवारी दुपारी दीड वाजता पूर्णा नदी तिरावरील स्मशानभुमीत तर समाधान व विकास यांच्या पार्थिवावर दुपारी दोन वाजता अंजना नदी तिरावरील स्माशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :Accidentअपघातchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर