शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

तीन ऐतिहासिक पुलांना ‘बायपास’ची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 19:22 IST

दहा वर्षांपासून निव्वळ घोषणांचा पाऊस, तिन्ही पुलांवरून वाहतूक सुरूच

औरंगाबाद : खाम नदीच्या पायथ्याशी असलेल्या मकाईगेट, महेमूदगेट, बारापुल्लागेट येथील पुलांचे आयुष्य संपले आहे. स्ट्रक्चरल आॅडिटनंतर हे तिन्ही पूल धोकादायक असल्याचा निर्वाळा देण्यात आला आहे. यानंतरही मागील दहा वर्षांपासून तिन्ही पुलांवरून वाहतूक सुरू आहे.

राज्य शासनाने पुलांच्या डागडुजीसाठी आणि गेट सुरक्षित करून बायपास रस्ता तयार करण्याची घोषणा केली. मात्र, आजपर्यंत औरंगाबादपर्यंतनिधीच पोहोचला नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छावणी, नंदनवन कॉलनी, बेगमपुरा, मकबरा परिसरातील विविध वसाहतींना ये-जाकरण्यासाठी मकाईगेट, महेमूदगेट, बारापुल्लागेटचा वापर करावा लागतो. या भागात ये-जा करण्यासाठी दुसरा पर्यायी रस्ताच नाही.

छावणीतून ये-जा करणे कोणालाही सोयीचे नाही. दहा वर्षांपूर्वी राज्य शासनाने तिन्ही पुलांच्या डागडुजीसाठी आणि बायपास रस्ता तयार करण्यासाठी १७ कोटींच्या निधीची घोषणा केली होती. हा निधी महापालिकेपर्यंत पोहोचलाच नाही. अलीकडेच एका राजकीय पक्षाने पुलांसाठी निधी आणल्याची घोषणा केली. मागील साडेचार वर्षांमध्ये हा निधीही आला नाही. निवडणुका येताच निव्वळ आश्वासनांचा पाऊस पाडण्यात येतो. नागरिकांनाही घोषणेची अंमलबजावणी होईल, असे दरवेळी वाटते. मात्र, निवडणुका संपल्यावर हासुद्धा एक ‘जुमला’होता असे लक्षात येते.

वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्तदररोज सकाळी, दुपारी, संध्याकाळी या तिन्ही गेटमध्ये वाहतुकीची कोंडी होते. एक मोठे वाहन आले तर किमान दहा ते पंधरा मिनिटे वाहनधारकांना रांगेत उभे राहावे लागते. नागरिकांना या वाहतूक कोंडीचा प्रचंड कंटाळा आला आहे. पर्यायी रस्ता नसल्याने मागील अनेक वर्षांपासून हा त्रास सहन करावा लागत आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाfundsनिधी