शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

तीन ऐतिहासिक पुलांना ‘बायपास’ची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 19:22 IST

दहा वर्षांपासून निव्वळ घोषणांचा पाऊस, तिन्ही पुलांवरून वाहतूक सुरूच

औरंगाबाद : खाम नदीच्या पायथ्याशी असलेल्या मकाईगेट, महेमूदगेट, बारापुल्लागेट येथील पुलांचे आयुष्य संपले आहे. स्ट्रक्चरल आॅडिटनंतर हे तिन्ही पूल धोकादायक असल्याचा निर्वाळा देण्यात आला आहे. यानंतरही मागील दहा वर्षांपासून तिन्ही पुलांवरून वाहतूक सुरू आहे.

राज्य शासनाने पुलांच्या डागडुजीसाठी आणि गेट सुरक्षित करून बायपास रस्ता तयार करण्याची घोषणा केली. मात्र, आजपर्यंत औरंगाबादपर्यंतनिधीच पोहोचला नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छावणी, नंदनवन कॉलनी, बेगमपुरा, मकबरा परिसरातील विविध वसाहतींना ये-जाकरण्यासाठी मकाईगेट, महेमूदगेट, बारापुल्लागेटचा वापर करावा लागतो. या भागात ये-जा करण्यासाठी दुसरा पर्यायी रस्ताच नाही.

छावणीतून ये-जा करणे कोणालाही सोयीचे नाही. दहा वर्षांपूर्वी राज्य शासनाने तिन्ही पुलांच्या डागडुजीसाठी आणि बायपास रस्ता तयार करण्यासाठी १७ कोटींच्या निधीची घोषणा केली होती. हा निधी महापालिकेपर्यंत पोहोचलाच नाही. अलीकडेच एका राजकीय पक्षाने पुलांसाठी निधी आणल्याची घोषणा केली. मागील साडेचार वर्षांमध्ये हा निधीही आला नाही. निवडणुका येताच निव्वळ आश्वासनांचा पाऊस पाडण्यात येतो. नागरिकांनाही घोषणेची अंमलबजावणी होईल, असे दरवेळी वाटते. मात्र, निवडणुका संपल्यावर हासुद्धा एक ‘जुमला’होता असे लक्षात येते.

वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्तदररोज सकाळी, दुपारी, संध्याकाळी या तिन्ही गेटमध्ये वाहतुकीची कोंडी होते. एक मोठे वाहन आले तर किमान दहा ते पंधरा मिनिटे वाहनधारकांना रांगेत उभे राहावे लागते. नागरिकांना या वाहतूक कोंडीचा प्रचंड कंटाळा आला आहे. पर्यायी रस्ता नसल्याने मागील अनेक वर्षांपासून हा त्रास सहन करावा लागत आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाfundsनिधी