शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

सिल्लोड-भोकरदन रस्त्यावर भीषण अपघातात ३ ठार, २ गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 11:00 IST

लग्नपत्रिका वाटप करून भोकरदनहून शिवना गावाकडे परतणाऱ्या एका मोटारसायकलला समोरून येणा-या मोटारसायकलने समोरासमोर धडक दिली. या अपघातानंतर एका मोटारसायकलला समोरून येणा-या अज्ञात वाहनाने चिरडले.

सिल्लोड/भोकरदन : लग्नपत्रिका वाटप करून भोकरदनहून शिवना गावाकडे परतणाऱ्या एका मोटारसायकलला समोरून येणा-या मोटारसायकलने समोरासमोर धडक दिली. या अपघातानंतर एका मोटारसायकलला समोरून येणा-या अज्ञात वाहनाने चिरडले. या विचित्र अपघातात एका मोटारसायकलवरील तीन जण ठार झाले. यात नवरदेवाचाही समावेश आहे. भोकरदन-सिल्लोड रस्त्यावरील मालखेडा पाटीजवळ गुरुवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला.

जितेंद्र रतन जगताप (२२), राहुल सदाशिव जगताप (२३), नवरदेव राहुल एकनाथ जगताप (२२, तिघेही रा. शिवना, ता. सिल्लोड) अशी मृतांची नावे आहेत, तर दुस-या मोटारसायकलवरील शुभम बाबूराव तळेकर, प्रज्ज्वल फुसे (दोघे रा. भोकरदन) हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर भोकरदन येथे उपचार सुरू आहेत. तसेच तिन्ही मृतदेह सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी हलविण्यात आले आहेत. भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

शिवना येथील हे तिघेही तरुण इब्राहिमपूर येथून जितेंद्र याच्या बहिणीकडे लग्नाची मूळपत्रिका देऊन सिल्लोडकडे दुचाकीने (क्रमांक एम.एच.२० ईएन ०४६६) येत होते. राहुल याचे १ एप्रिल रोजी लग्न ठरले होते, तर भोकरदन येथील शुभम तळेकर व प्रज्ज्वल फुसे हे सिल्लोडहून शुभमच्या बहिणीच्या लग्नाच्या पत्रिका वाटून परतत होते.

मदतीऐवजी बघे चित्रीकरणात व्यस्तदोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाल्यानंतर या सर्वांना दोन तास उपचार मिळाले नाहीत. राहुल सदाशिव जगताप व जितेंद्र जगताप हे जागीच ठार झाले, तर राहुल एकनाथ जगताप हा गंभीर जखमी झाल्याने त्याला औरंगाबाद येथे उपचारासाठी नेत असताना फुलंब्रीजवळ त्याची प्राणज्योत मालवली. रस्त्यावर बघ्यांची मोठी गर्दी झाली असली तरी रस्त्यावर तडफडत पडणाºयांच्या मदतीसाठी कुणीही पुढे आले नाहीत. जो तो घटनास्थळाचे फोटोसेशन करण्यात मग्न असल्याचे विदारक चित्र दिसले. यानंतर अपघाताची माहिती मिळताच शिवसेनेचे महेश पुरोहित, भगवान बैनाडे, सरदार राजपूत, अजय थारेवाल, सिद्धार्थ जाधव यांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने मदतकार्य केले.

राहुलचे १ एप्रिलला होते लग्नराहुल एकनाथ जगताप हा मित्रांना मोटारसायकलवर सोबत घेऊन स्वत:च्या लग्नपत्रिका वाटप करीत होता. १ एप्रिल रोजी त्याचे बुलडाणा जिल्ह्यातील जामठी येथील तरुणीशी लग्न होणार होते. बहिणीला पत्रिका देऊन परतत असताना काळाने त्याच्यावर झडप घातली. त्याच्या पश्चात ३ बहिणी, दोन भाऊ, आई-वडील असा परिवार आहे.

शिवना गावावर शोककळाया दुर्घटनेमुळे शिवना गावावर शोककळा पसरली आहे. नातेवाईक लग्नाची तयारी करीत होते. सुखी संसाराची स्वप्ने पाहणारा राहुल १ एप्रिल रोजी विवाह बंधनात अडकणार होता. त्याआधीच त्याचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शुक्रवारी या तिघांवर शिवना येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अनेक राजकीत नेते, मान्यवरांनी जगताप कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना धीर दिला.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूtwo wheelerटू व्हीलरAurangabadऔरंगाबादJalanaजालना