शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

तीन दिवसांआड पाणी; प्रयोग फेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 01:29 IST

भाजपच्या आंदोलनानंतर महापालिका प्रशासनाने शुक्रवार, ११ मेपासून तीन दिवसांआड पाणी देण्याचा प्रयोग सुरू केला. या प्रयोगाचाही पूर्णपणे फज्जा उडाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : भाजपच्या आंदोलनानंतर महापालिका प्रशासनाने शुक्रवार, ११ मेपासून तीन दिवसांआड पाणी देण्याचा प्रयोग सुरू केला. या प्रयोगाचाही पूर्णपणे फज्जा उडाला आहे. मनपा प्रशासनाकडे कोणतेच नियोजन नसल्याने मागील तीन दिवसांमध्ये नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. महापालिकेने निश्चित केलेल्या नवीन वेळापत्रकानुसार एकाही वॉर्डाला पाणी मिळाले नाही. महापौर नंदकुमार घोडेले यांनी सोमवारी सकाळी ९.३० वाजता पाणी प्रश्नावर तातडीची बैठक आयोजित केली आहे.भाजप नगरसेवकांनी पाण्यासाठी महापालिकेत ९ मे रोजी रात्री झोपा आंदोलन केले. त्यानंतर प्रभारी आयुक्त उदय चौधरी यांनी संपूर्ण शहराला तीन दिवसांआड पाणी देण्याचा निर्णय घेतला. पाणीपुरवठा विभागानेही ११३ वॉर्डांच्या पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक तयार केले. प्रत्येक पाण्याच्या टाकीवर हे वेळापत्रक चिकटवण्यात आले. शुक्रवार, ११ मेपासून या निर्णयाची अंमलबजावणीही सुरू झाली. रविवार, १३ मे रोजी तीन दिवस संपले तरी शहरातील पाणीपुरवठा विस्कळीतच होता. दंगलग्रस्त राजाबाजार परिसरालाही तब्बल १४ तास उशिराने पाणी देण्यात आले. सिडको एन-५, एन-७, शहागंज, ज्युबिलीपार्क, दिल्लीगेट, पुंडलिकनगर आदी पाण्याच्या टाक्यांवर टप्पे विस्कळीत झाले आहेत. मनपा तीन दिवसांआड पाणी देणार म्हटल्यावर अनेक वॉर्डांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत होता. महापालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे हा प्रयोगही फसला. मागील तीन दिवसांमध्ये पाण्याच्या तक्रारी पूर्वीच्या तुलनेत दुप्पट झाल्या. भाजप नगरसेवकांच्या समाधानासाठी मनपा प्रशासनाने तीन दिवसांआड पाणी देण्याचा प्रयोग राबविला असला, तरी तो अपयशी ठरला आहे. शहरात दररोज १३५ एमएलडी पाणी येते. तीन दिवसांत ४०५ एमएलडी पाणी मनपाला मिळते. शहराची गरज २२२ एमएलडी पाण्याची आहे. दुप्पट पाणी असूनही मनपा शहराची तहान भागवू शकत नाही. पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी महापौरांनी सोमवारी पुन्हा बैठक आयोजित केली आहे.

टॅग्स :WaterपाणीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका