शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

तीन दिवस उलटले;  ९०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीची दुरुस्ती नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 17:15 IST

निखळलेल्या पाईपचे जाॅईंट व्यवस्थित करून बसविण्यासाठी एवढे दिवस लागतात का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणतर्फे टाकण्यात आलेल्या ९०० मिमी जलवाहिनीचे पाईप सोमवारी दुपारी फारोळा येथे निखळले. तीन दिवस उलटल्यानंतरही जलवाहिनीची दुरुस्ती करण्यात मजिप्राला यश आले नाही. निखळलेल्या पाईपचे जाॅईंट व्यवस्थित करून बसविण्यासाठी एवढे दिवस लागतात का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सहा ते आठ महिन्यांपूर्वीच २०० कोटी रुपये खर्च करून जायकवाडी ते फारोळ्यापर्यंत ही जलवाहिनी टाकण्यात आली. जलवाहिनीचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याचे ‘लोकमत’ने यापूर्वीच प्रकाशित केले. त्यानुसार जलवाहिनीचे पाईप जागोजागी निखळत आहेत. विशेष बाब म्हणजे जलवाहिनीतून सध्या १० ते १२ एमएलडी पाणी येत आहे. पूर्ण क्षमतेने ७५ एमएलडी उपसा सुरू झाल्यावर जलवाहिनीचे आणखी बिंग फुटणार आहे. सोमवारी दुपारी दोन वाजता फारोळा येथे जलवाहिनीचे पाच पाईप निखळले. मंगळवारी ते दुरुस्त करून चाचणी घेतली. त्यानंतर पुन्हा मोठी गळती निदर्शनास आली. बुधवारी दिवसभर मजिप्राकडून काम सुरू होते. रात्री उशिरापर्यंत त्यांना यश आले नव्हते.

गेवराई येथेही गळतीपैठण रोडवरील गेवराई गाव येथेही ९०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीला मोठे लिकेज आहे. ही गळती बंद करण्यासाठी तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी जलवाहिनी सुरू असताना आजूबाजूला सिमेंट काँक्रीट टाकले. त्यानंतरही गळती थांबली नाही. तीन दिवसांचे शटडाऊन असतानाही येथील लिकेजचे काम करण्यात आले नाही.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरMuncipal Corporationनगर पालिकाWaterपाणी