शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

'गुन्हा घडलाय' एकाच वेळी कॉलवर साडेतीन हजार पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना कळणार

By सुमित डोळे | Updated: August 5, 2023 13:37 IST

रिस्पॉन्स टाइम कमी करण्यासाठी संदेशवहन नागरी सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित

छत्रपती संभाजीनगर : शहरात एखादा गंभीर गुन्हा घडल्यानंतर स्थानिक पोलिस ते वरिष्ठ अधिकारी, इतर ठाणेप्रमुखांना कळेपर्यंत बराच वेळ उलटून जातो; परंतु आता गुन्हा घडताच त्याचे गांभीर्य पाहून तो शहरातील एकाच कॉलवर साडेतीन हजार पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना कळण्याची यंत्रणा शहर पोलिस दलात कार्यान्वित करण्यात आली आहे. तेरा वर्षांपासून राज्यातील पाच जिल्ह्यांत ही यंत्रणा यशस्वीपणे सुरू आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे, पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांच्या हस्ते या संदेशवहन जलद करणाऱ्या नागरी सुरक्षा यंत्रणेचे उद्घाटन करण्यात आले. नागरी सुरक्षा यंत्रणेचे संचालक डी.के. गोर्डे यांनी ही संकल्पना प्रत्यक्षात आणून शहर पोलिस दलाला सुपुर्द केली. भुमरे यांच्यासमोर त्यांनी जवळपास सात मिनिटे याचे प्रात्यक्षिक दिले. उपायुक्त अपर्णा गीते, सहायक आयुक्त धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रवीणा यादव, अंमलदार चंद्रकांत दंडे, सचिन कदम, अमोल देशमुख, छाया लांडगे, माधुरी खरात यांनी यासाठी परिश्रम घेतले.

काय आहे ही संकल्पना?-१८००२७०३६०० हा या यंत्रणेचा क्रमांक आहे.-शहरात कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास, गंभीर घटना घडल्यास संबंधित ठाणेप्रमुख या क्रमांकाला काॅल करतील. ठाण्यातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना एकाच वेळी हा कॉल जाऊन एकाच वेळी प्रमुख सर्वांना घटना सांगून आदेश देऊ शकतो. घटनेच्या गांभीर्यानुसार ते कॉल इतर ठाणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांनादेखील या कॉलमध्ये समाविष्ट करू शकतात.-प्राथमिक स्तरावर ही यंत्रणा केवळ पोलिस विभागापुरतीच मर्यादित असून, इतरांना यात सहभागी केलेले नाही. शहरातील साडेतीन हजार कर्मचारी, अधिकाऱ्यांचे क्रमांक यात जोडल्याचे गोर्डे यांनी सांगितले.

१३ वर्षे, दीड लाख प्रकरणे हाताळलीअहमदनगर, पुणे जिल्ह्यांसह राज्यातील चार जिल्ह्यांतील साडेपाच हजार गावांमध्ये ही यंत्रणा सुरू केली आहे. यात गावाप्रमाणे मोबाइल नंबर समाविष्ट केले आहेत. १३ वर्षांत जवळपास दीड लाख कॉल हाताळले असून, साडेचार हजार प्रकरणांत गंभीर घटना थांबवण्यात यश मिळाले आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसAurangabadऔरंगाबाद