शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

'गुन्हा घडलाय' एकाच वेळी कॉलवर साडेतीन हजार पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना कळणार

By सुमित डोळे | Updated: August 5, 2023 13:37 IST

रिस्पॉन्स टाइम कमी करण्यासाठी संदेशवहन नागरी सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित

छत्रपती संभाजीनगर : शहरात एखादा गंभीर गुन्हा घडल्यानंतर स्थानिक पोलिस ते वरिष्ठ अधिकारी, इतर ठाणेप्रमुखांना कळेपर्यंत बराच वेळ उलटून जातो; परंतु आता गुन्हा घडताच त्याचे गांभीर्य पाहून तो शहरातील एकाच कॉलवर साडेतीन हजार पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना कळण्याची यंत्रणा शहर पोलिस दलात कार्यान्वित करण्यात आली आहे. तेरा वर्षांपासून राज्यातील पाच जिल्ह्यांत ही यंत्रणा यशस्वीपणे सुरू आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे, पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांच्या हस्ते या संदेशवहन जलद करणाऱ्या नागरी सुरक्षा यंत्रणेचे उद्घाटन करण्यात आले. नागरी सुरक्षा यंत्रणेचे संचालक डी.के. गोर्डे यांनी ही संकल्पना प्रत्यक्षात आणून शहर पोलिस दलाला सुपुर्द केली. भुमरे यांच्यासमोर त्यांनी जवळपास सात मिनिटे याचे प्रात्यक्षिक दिले. उपायुक्त अपर्णा गीते, सहायक आयुक्त धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रवीणा यादव, अंमलदार चंद्रकांत दंडे, सचिन कदम, अमोल देशमुख, छाया लांडगे, माधुरी खरात यांनी यासाठी परिश्रम घेतले.

काय आहे ही संकल्पना?-१८००२७०३६०० हा या यंत्रणेचा क्रमांक आहे.-शहरात कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास, गंभीर घटना घडल्यास संबंधित ठाणेप्रमुख या क्रमांकाला काॅल करतील. ठाण्यातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना एकाच वेळी हा कॉल जाऊन एकाच वेळी प्रमुख सर्वांना घटना सांगून आदेश देऊ शकतो. घटनेच्या गांभीर्यानुसार ते कॉल इतर ठाणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांनादेखील या कॉलमध्ये समाविष्ट करू शकतात.-प्राथमिक स्तरावर ही यंत्रणा केवळ पोलिस विभागापुरतीच मर्यादित असून, इतरांना यात सहभागी केलेले नाही. शहरातील साडेतीन हजार कर्मचारी, अधिकाऱ्यांचे क्रमांक यात जोडल्याचे गोर्डे यांनी सांगितले.

१३ वर्षे, दीड लाख प्रकरणे हाताळलीअहमदनगर, पुणे जिल्ह्यांसह राज्यातील चार जिल्ह्यांतील साडेपाच हजार गावांमध्ये ही यंत्रणा सुरू केली आहे. यात गावाप्रमाणे मोबाइल नंबर समाविष्ट केले आहेत. १३ वर्षांत जवळपास दीड लाख कॉल हाताळले असून, साडेचार हजार प्रकरणांत गंभीर घटना थांबवण्यात यश मिळाले आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसAurangabadऔरंगाबाद