शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

'गुन्हा घडलाय' एकाच वेळी कॉलवर साडेतीन हजार पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना कळणार

By सुमित डोळे | Updated: August 5, 2023 13:37 IST

रिस्पॉन्स टाइम कमी करण्यासाठी संदेशवहन नागरी सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित

छत्रपती संभाजीनगर : शहरात एखादा गंभीर गुन्हा घडल्यानंतर स्थानिक पोलिस ते वरिष्ठ अधिकारी, इतर ठाणेप्रमुखांना कळेपर्यंत बराच वेळ उलटून जातो; परंतु आता गुन्हा घडताच त्याचे गांभीर्य पाहून तो शहरातील एकाच कॉलवर साडेतीन हजार पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना कळण्याची यंत्रणा शहर पोलिस दलात कार्यान्वित करण्यात आली आहे. तेरा वर्षांपासून राज्यातील पाच जिल्ह्यांत ही यंत्रणा यशस्वीपणे सुरू आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे, पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांच्या हस्ते या संदेशवहन जलद करणाऱ्या नागरी सुरक्षा यंत्रणेचे उद्घाटन करण्यात आले. नागरी सुरक्षा यंत्रणेचे संचालक डी.के. गोर्डे यांनी ही संकल्पना प्रत्यक्षात आणून शहर पोलिस दलाला सुपुर्द केली. भुमरे यांच्यासमोर त्यांनी जवळपास सात मिनिटे याचे प्रात्यक्षिक दिले. उपायुक्त अपर्णा गीते, सहायक आयुक्त धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रवीणा यादव, अंमलदार चंद्रकांत दंडे, सचिन कदम, अमोल देशमुख, छाया लांडगे, माधुरी खरात यांनी यासाठी परिश्रम घेतले.

काय आहे ही संकल्पना?-१८००२७०३६०० हा या यंत्रणेचा क्रमांक आहे.-शहरात कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास, गंभीर घटना घडल्यास संबंधित ठाणेप्रमुख या क्रमांकाला काॅल करतील. ठाण्यातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना एकाच वेळी हा कॉल जाऊन एकाच वेळी प्रमुख सर्वांना घटना सांगून आदेश देऊ शकतो. घटनेच्या गांभीर्यानुसार ते कॉल इतर ठाणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांनादेखील या कॉलमध्ये समाविष्ट करू शकतात.-प्राथमिक स्तरावर ही यंत्रणा केवळ पोलिस विभागापुरतीच मर्यादित असून, इतरांना यात सहभागी केलेले नाही. शहरातील साडेतीन हजार कर्मचारी, अधिकाऱ्यांचे क्रमांक यात जोडल्याचे गोर्डे यांनी सांगितले.

१३ वर्षे, दीड लाख प्रकरणे हाताळलीअहमदनगर, पुणे जिल्ह्यांसह राज्यातील चार जिल्ह्यांतील साडेपाच हजार गावांमध्ये ही यंत्रणा सुरू केली आहे. यात गावाप्रमाणे मोबाइल नंबर समाविष्ट केले आहेत. १३ वर्षांत जवळपास दीड लाख कॉल हाताळले असून, साडेचार हजार प्रकरणांत गंभीर घटना थांबवण्यात यश मिळाले आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसAurangabadऔरंगाबाद