शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

१२ वीच्या परीक्षेत कॉपी रोखण्यासाठी हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 12:45 PM

औरंगाबाद ग्रामीण पोलिसांचा पुढाकार;

ठळक मुद्देउपद्रवी केंद्रावर असेल पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे स्थायी पथकइयत्ता बारावी बोर्ड परीक्षांना १८ फेब्रुवारीपासून तर दहावी परीक्षेला ३ मार्चपासून सुरुवात होत आहे.

औरंगाबाद : इयत्ता बारावीच्या परीक्षेतील कॉपी रोखण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. परीक्षा केंद्रात घुसून परीक्षार्थींना कॉपी पुरविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा पोलिसांकडून नोंदविला जाणार आहे. एवढेच नव्हे तर उपद्रवींना धडा शिकविण्यासाठी परीक्षा केंद्रांवर पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या स्थायी पथकासह सुमारे एक हजार पोलीस तैनात केले जाणार आहेत. 

इयत्ता बारावी बोर्ड परीक्षांना १८ फेब्रुवारीपासून तर दहावी परीक्षेला ३ मार्चपासून सुरुवात होत आहे. या दोन्ही परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. कॉपीमुक्त परीक्षेसाठी पोलीस विभागाची मदत व्हावी, याकरिता जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि ग्रामीण पोलीस यांची संयुक्त बैठक सोमवारी दुपारी पोलीस अधीक्षक  मोक्षदा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. एम. गोंदावले, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण, अप्पर अधीक्षक गणेश गावडे, उपशिक्षणाधिकारी प्रियाराणी पाटील आणि अन्य पोलीस अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

या बैठकीविषयी माहिती देताना पोलीस अधीक्षक म्हणाल्या की, ग्रामीण भागातील उपद्रवी परीक्षा केंद्रांची माहिती आम्हाला शिक्षण विभागाकडून मिळाली आहे. या परीक्षा केंद्रांवर कॉपी पुरविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जाईल. या कारवाईला विरोध करणाऱ्यांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंदविला जाईल. उपद्रवी परीक्षा केंद्रांवर एक पोलीस अधिकारी आणि चार कर्मचाऱ्यांचे स्थायी पथक असेल. ग्रामीण भागातील सर्वच परीक्षा केंद्रांवर सुमारे एक हजार पोलीस तैनात असतील. यातील काही गस्तीवर राहतील. तसेच अप्पर अधीक्षक, उपअधीक्षक हे अचानक विविध परीक्षा केंद्रांना भेटी देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

परीक्षेच्या कालावधीत महावितरणची दक्षताबारावीच्या परीक्षेला मंगळवारपासून प्रारंभ होत आहे. त्यानंतर दहावीचीही परीक्षा सुरू होणार आहे. या परीक्षेच्या कालावधीत वीजपुरवठा खंडित होणार नाही, यासाठी महावितरणकडून दक्षता घेण्यात येत आहे. यासंदर्भात अधिकारी-कर्मचाऱ्यांना सूचना करण्यात आल्याचे प्रभारी सहव्यवस्थापकीय संचालक सुरेश गणेशकर यांनी सांगितले.वीज बिलाच्या थकबाकीमुळे महावितरणकडून वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाते. मार्च महिन्याच्या अखेरीपर्यंत थकीत वीज बिल वसुलीची मोहीम तीव्र केली जाते. याचा परिणाम परीक्षेच्या कालावधीत होण्याची शक्यता असते. तरीही महावितरणकडून आवश्यक ती खबरदारी घेऊन विजेअभावी विद्यार्थ्यांच्या अभ्यासात व्यत्यय येणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. नागरिकांनी थकीत बिल भरून सहकार्य करावे, असेही आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

संस्थाचालक , पर्यवेक्षकांवरही असेल नजरगतवर्षी काही परीक्षा केंद्रांवर सामूहिक कॉपीचे प्रकार घडले होते. शिक्षक, संस्थाचालक यांच्या मदतीने सामूहिक कॉपीचे प्रकार होतात. असे प्रकार रोखण्यासाठी परीक्षा केंद्र ज्या संस्थेत आहे, त्या शिक्षणसंस्थेच्या संचालक, प्राचार्य, शिक्षक आणि पर्यवेक्षक यांच्यावरही पोलिसांची नजर असेल.

टॅग्स :examपरीक्षाPoliceपोलिसAurangabadऔरंगाबादStudentविद्यार्थी