शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

१२ वीच्या परीक्षेत कॉपी रोखण्यासाठी हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 12:59 IST

औरंगाबाद ग्रामीण पोलिसांचा पुढाकार;

ठळक मुद्देउपद्रवी केंद्रावर असेल पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे स्थायी पथकइयत्ता बारावी बोर्ड परीक्षांना १८ फेब्रुवारीपासून तर दहावी परीक्षेला ३ मार्चपासून सुरुवात होत आहे.

औरंगाबाद : इयत्ता बारावीच्या परीक्षेतील कॉपी रोखण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. परीक्षा केंद्रात घुसून परीक्षार्थींना कॉपी पुरविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा पोलिसांकडून नोंदविला जाणार आहे. एवढेच नव्हे तर उपद्रवींना धडा शिकविण्यासाठी परीक्षा केंद्रांवर पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या स्थायी पथकासह सुमारे एक हजार पोलीस तैनात केले जाणार आहेत. 

इयत्ता बारावी बोर्ड परीक्षांना १८ फेब्रुवारीपासून तर दहावी परीक्षेला ३ मार्चपासून सुरुवात होत आहे. या दोन्ही परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. कॉपीमुक्त परीक्षेसाठी पोलीस विभागाची मदत व्हावी, याकरिता जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि ग्रामीण पोलीस यांची संयुक्त बैठक सोमवारी दुपारी पोलीस अधीक्षक  मोक्षदा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. एम. गोंदावले, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण, अप्पर अधीक्षक गणेश गावडे, उपशिक्षणाधिकारी प्रियाराणी पाटील आणि अन्य पोलीस अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

या बैठकीविषयी माहिती देताना पोलीस अधीक्षक म्हणाल्या की, ग्रामीण भागातील उपद्रवी परीक्षा केंद्रांची माहिती आम्हाला शिक्षण विभागाकडून मिळाली आहे. या परीक्षा केंद्रांवर कॉपी पुरविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जाईल. या कारवाईला विरोध करणाऱ्यांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंदविला जाईल. उपद्रवी परीक्षा केंद्रांवर एक पोलीस अधिकारी आणि चार कर्मचाऱ्यांचे स्थायी पथक असेल. ग्रामीण भागातील सर्वच परीक्षा केंद्रांवर सुमारे एक हजार पोलीस तैनात असतील. यातील काही गस्तीवर राहतील. तसेच अप्पर अधीक्षक, उपअधीक्षक हे अचानक विविध परीक्षा केंद्रांना भेटी देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

परीक्षेच्या कालावधीत महावितरणची दक्षताबारावीच्या परीक्षेला मंगळवारपासून प्रारंभ होत आहे. त्यानंतर दहावीचीही परीक्षा सुरू होणार आहे. या परीक्षेच्या कालावधीत वीजपुरवठा खंडित होणार नाही, यासाठी महावितरणकडून दक्षता घेण्यात येत आहे. यासंदर्भात अधिकारी-कर्मचाऱ्यांना सूचना करण्यात आल्याचे प्रभारी सहव्यवस्थापकीय संचालक सुरेश गणेशकर यांनी सांगितले.वीज बिलाच्या थकबाकीमुळे महावितरणकडून वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाते. मार्च महिन्याच्या अखेरीपर्यंत थकीत वीज बिल वसुलीची मोहीम तीव्र केली जाते. याचा परिणाम परीक्षेच्या कालावधीत होण्याची शक्यता असते. तरीही महावितरणकडून आवश्यक ती खबरदारी घेऊन विजेअभावी विद्यार्थ्यांच्या अभ्यासात व्यत्यय येणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. नागरिकांनी थकीत बिल भरून सहकार्य करावे, असेही आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

संस्थाचालक , पर्यवेक्षकांवरही असेल नजरगतवर्षी काही परीक्षा केंद्रांवर सामूहिक कॉपीचे प्रकार घडले होते. शिक्षक, संस्थाचालक यांच्या मदतीने सामूहिक कॉपीचे प्रकार होतात. असे प्रकार रोखण्यासाठी परीक्षा केंद्र ज्या संस्थेत आहे, त्या शिक्षणसंस्थेच्या संचालक, प्राचार्य, शिक्षक आणि पर्यवेक्षक यांच्यावरही पोलिसांची नजर असेल.

टॅग्स :examपरीक्षाPoliceपोलिसAurangabadऔरंगाबादStudentविद्यार्थी