शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

औरंगाबादेत एसटी महामंडळातील चालक-वाहक पदासाठी हजारो अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 17:13 IST

भरतीच्या पुढील प्रक्रियेसाठी महामंडळातर्फे उमेदवारांना ई-मेल करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देऔरंगाबादेत एसटी महामंडळात २४० जागा उमेदवारांना मंडळाच्या ई-मेलची प्रतीक्षा

औरंगाबाद :  एस.टी. महामंडळाने भरती प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात चालक-वाहक पदासाठी आॅनलाईन पद्धतीने अर्ज मागविले. १५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती. हजारो बेरोजगार उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज दाखल केले. राज्यातील १५ जिल्ह्यांसाठी राबविण्यात येत असलेली ही भरती प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने होत आहे. भरतीच्या पुढील प्रक्रियेसाठी महामंडळातर्फे उमेदवारांना ई-मेल करण्यात येणार आहे.

राज्यातील दुष्काळग्रस्त १५ जिल्ह्यांमधील युवक-युवतींसाठी ४ हजार २४२ पदांची भरती करण्यात येत आहे. भरती औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी, उस्मानाबाद, अमरावती, अकोला, बुलडाणा, यवतमाळ, धुळे, जळगाव, नाशिक, पुणे या पंधरा जिल्ह्यांत राबविण्यात येत आहे. ११ जिल्ह्यांत ४ हजार २४२ पदांच्या जागा आहेत. बीड,लातूर, उस्मानाबाद आणि नांदेड या जिल्ह्यांत चालक तथा वाहक पदांच्या रिक्त जागा नाहीत.

दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील युवकांना काम देण्यासाठी पात्र उमेदवारांची निवड करून रिक्त जागांवर इतर जिल्ह्यांत नियुक्ती देण्यात येईल. एकाच दिवशी चालक तथा वाहक पदाच्या परीक्षा संबंधित जिल्ह्यात घेतल्या जातील. या भरतीमध्ये इतर आरक्षणाबरोबर मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचा निर्णयही एस.टी महामंडळाने घेतला आहे.

अर्ज भरण्यासाठी तारेवरची कसरतएस.टी. महामंडळाने आॅनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करण्याचे निर्देश दिले होते. इच्छुक उमेदवारांनी विविध कागदपत्रे अपलोड करणे, बँकेचा धनादेश लावणे आदी कामे आॅनलाईन पद्धतीने केली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी बरीच कसरत करावी लागली. औरंगाबाद जिल्ह्यातील २४० जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. 

स्मार्ट सिटी प्रकल्पात घेणारमराठा आरक्षणाचे निकष भरतीसाठी लावण्यात आले आहेत. आरक्षणासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल आहेत. भरती प्रक्रियेतील पात्र उमेदवारांना एस.टी.महामंडळात सामावून घेता आले नाही, तर औरंगाबाद शहरात राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट सिटी योजनेतील बस सेवेत १५ हजार रुपयांच्या कंत्राटी पद्धतीवर घेण्यात येणार आहे.

शुल्कात सवलत दुष्काळग्रस्त भागातील अर्ज करणाऱ्या मागासवर्गीय तसेच दुष्काळग्रस्त उमेदवारांना परीक्षा शुल्कात ५० टक्के सवलत देण्यात आली. उमेदवारांची नंतर १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरण्याची अंतिम तारीख होती. शेवटच्या दिवसापर्यंत अर्ज किती आले याचा आकडा मुंबई कार्यालयाला माहीत असल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :state transportएसटीEmployeeकर्मचारीAurangabadऔरंगाबाद