शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर आमदारकीचा राजीनामा देईन, ब्लॅकमेल करणं अंबादास दानवेंचा धंदा; महेंद्र दळवी चांगलेच भडकले
2
ऐन अधिवेशनात 'कॅश बॉम्ब'! पैशांच्या गड्ड्यांसह आमदाराचा व्हिडिओ आला समोर; राजकीय वर्तुळात खळबळ
3
आधीच कंगाल झालेल्या पाकिस्तानला IMFने पुन्हा दिले अब्जावंधीचे कर्ज! अटी-नियमही केले आणखी कडक 
4
Stock Market Today: शेअर बाजारात पुन्हा मोठी घसरण, निफ्टी १०० तर सेन्सेक्स ३०० अंकानी घसरला; 'हे' शेअर्स आपटले
5
शिंदे-फडणवीसांची बंद दाराआड बैठक, महापालिका निवडणुकीबद्दल मोठा निर्णय; नेत्यांच्या फोडाफोडीवरही चर्चा
6
IndiGo Flight Crisis: इंडिगो एअरलाइन्सच्या जखमेवर मीठ, सरकार उचलणार कठोर पाऊल!
7
सरकारी नोकरी लागताच तो प्रेम विसरला, प्रेयसीला दगा दिला; चिडलेल्या तरुणीने चांगलाच इंगा दाखवला!
8
विमान उड्डाणे रद्द! Indigo नं सरकारला दिलं उत्तर; प्रमुख ५ कारणांचा खुलासा, का आली ही वेळ?
9
Virat Kohli Deal: विराट कोहली चर्चेत... आपला ब्रँड विकून 'या' ठिकाणी करणार ४० कोटींची गुंतवणूक; कोणती आहे ही डील?
10
नाइट लाइफचे धिंडवडे; गोव्यातील क्लबला लागलेल्या आगीच्या घटनेचे देशात पडसाद उमटले
11
तुम्हाला शुगर किती? रक्त न काढताच कळेल, शास्त्रज्ञांनी विकसित केले ग्लुकोज सेन्सर
12
"तू माझी नाहीस, तर कुणाची होऊ देणार नाही"; गर्लफ्रेंडचं लग्न मोडण्यासाठी बॉयफ्रेंडनं केलं असं काही की…
13
लपाछपीचा खेळ आठ वर्षीय मुलाच्या बेतला जिवावर; चार दिवसांनंतर पाण्याच्या टाकीत आढळला मृतदेह
14
राज्याच्या इतिहासात दुसऱ्या विक्रमी पुरवणी मागण्या; ७५,२८६ कोटींची तरतूद; वित्तीय शिस्त बिघडल्याचा विरोधकांचा आरोप
15
आजचे राशीभविष्य, ०९ डिसेंबर २०२५:आर्थिक कामात अडथळे दूर होऊन मार्ग मोकळा सापडेल
16
भारतीय तांदळावर दुप्पट टॅरिफ लावण्याचे संकेत; अमेरिकन शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर ट्रम्प संतापले
17
भाजपची गुगली; वडेट्टीवार यांना विधानसभेत तर परब यांना परिषदेत विरोधी पक्षनेतेपद!
18
सोनं झळकलं! वर्षभरात दिले ६७% रिटर्न्स, २०२६ मध्ये १० ग्रॅमचा भाव दीड लाखाच्या पुढे जाण्याचा अंदाज
19
रोजगार नव्हता… आमची लेकरं गोव्याला गेली, आता त्यांचा मृतदेहच परत येतोय; आसाममधील तीन तरुणांचा मृत्यू; कुटुंबीयांचा आक्रोश
20
क्लबमालक लुथरा बंधू थायलंडला पळाले, पोलिसांचा इंटरपोलशी संपर्क; न्यायदंडाधिकाऱ्यांकडून चौकशी, संशयिताला अटक
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत एसटी महामंडळातील चालक-वाहक पदासाठी हजारो अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 17:13 IST

भरतीच्या पुढील प्रक्रियेसाठी महामंडळातर्फे उमेदवारांना ई-मेल करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देऔरंगाबादेत एसटी महामंडळात २४० जागा उमेदवारांना मंडळाच्या ई-मेलची प्रतीक्षा

औरंगाबाद :  एस.टी. महामंडळाने भरती प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात चालक-वाहक पदासाठी आॅनलाईन पद्धतीने अर्ज मागविले. १५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती. हजारो बेरोजगार उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज दाखल केले. राज्यातील १५ जिल्ह्यांसाठी राबविण्यात येत असलेली ही भरती प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने होत आहे. भरतीच्या पुढील प्रक्रियेसाठी महामंडळातर्फे उमेदवारांना ई-मेल करण्यात येणार आहे.

राज्यातील दुष्काळग्रस्त १५ जिल्ह्यांमधील युवक-युवतींसाठी ४ हजार २४२ पदांची भरती करण्यात येत आहे. भरती औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी, उस्मानाबाद, अमरावती, अकोला, बुलडाणा, यवतमाळ, धुळे, जळगाव, नाशिक, पुणे या पंधरा जिल्ह्यांत राबविण्यात येत आहे. ११ जिल्ह्यांत ४ हजार २४२ पदांच्या जागा आहेत. बीड,लातूर, उस्मानाबाद आणि नांदेड या जिल्ह्यांत चालक तथा वाहक पदांच्या रिक्त जागा नाहीत.

दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील युवकांना काम देण्यासाठी पात्र उमेदवारांची निवड करून रिक्त जागांवर इतर जिल्ह्यांत नियुक्ती देण्यात येईल. एकाच दिवशी चालक तथा वाहक पदाच्या परीक्षा संबंधित जिल्ह्यात घेतल्या जातील. या भरतीमध्ये इतर आरक्षणाबरोबर मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचा निर्णयही एस.टी महामंडळाने घेतला आहे.

अर्ज भरण्यासाठी तारेवरची कसरतएस.टी. महामंडळाने आॅनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करण्याचे निर्देश दिले होते. इच्छुक उमेदवारांनी विविध कागदपत्रे अपलोड करणे, बँकेचा धनादेश लावणे आदी कामे आॅनलाईन पद्धतीने केली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी बरीच कसरत करावी लागली. औरंगाबाद जिल्ह्यातील २४० जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. 

स्मार्ट सिटी प्रकल्पात घेणारमराठा आरक्षणाचे निकष भरतीसाठी लावण्यात आले आहेत. आरक्षणासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल आहेत. भरती प्रक्रियेतील पात्र उमेदवारांना एस.टी.महामंडळात सामावून घेता आले नाही, तर औरंगाबाद शहरात राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट सिटी योजनेतील बस सेवेत १५ हजार रुपयांच्या कंत्राटी पद्धतीवर घेण्यात येणार आहे.

शुल्कात सवलत दुष्काळग्रस्त भागातील अर्ज करणाऱ्या मागासवर्गीय तसेच दुष्काळग्रस्त उमेदवारांना परीक्षा शुल्कात ५० टक्के सवलत देण्यात आली. उमेदवारांची नंतर १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरण्याची अंतिम तारीख होती. शेवटच्या दिवसापर्यंत अर्ज किती आले याचा आकडा मुंबई कार्यालयाला माहीत असल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :state transportएसटीEmployeeकर्मचारीAurangabadऔरंगाबाद