शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

यंदा 'बकरी ईद'दिवशी कुर्बानी नाही, 'आषाढी'मुळे मुस्लीम बांधवांचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2023 19:18 IST

आषाढी एकादशी हा हिंदुसाठी, विशेषत: वारकरी संप्रदायासाठी अत्यंत पवित्र दिवस मानला जातो.

छत्रपती संभाजीनगर - राज्यात २९ जून रोजी आषाढी एकादशी साजरी होत आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दिंड्या पंढरीची वारी करत मजल-दरमजल करत विठु-माऊलीच्या भेटीसाठी चालत आहेत. शासनही वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज झालं असून पंढरपुरात १० लाख वारकऱ्यांचा मेळा जमणार आहे. अवघ्या महाराष्ट्राचं दैवत असलेल्या पंढरपूरला आषाढीचं मोठं महत्त्व आहे. मात्र, यंदाच त्याचदिवशी बकरी ईद असल्याने छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज येथील मुस्लीम बांधवांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 

आषाढी एकादशी हा हिंदुसाठी, विशेषत: वारकरी संप्रदायासाठी अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. यादिवशी बहुतांश सर्वजण उपवास धरुन विठ्ठल भक्ती साजरी करतात. या दिवशी मांसाहर पूर्णपणे टाळला जातो. मात्र, यंदा आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात साजरी केली जाणार आहे. दरम्यान अशा परिस्थितीत बकरी ईदला कुर्बानी न देण्याचा महत्वपूर्ण निर्णय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज परिसरातील मुस्लिम बांधवांकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हिंदू-मुस्लीम एकतेचं उदाहरण पाहायला मिळाले आहे. तर मुस्लीम बांधवांनी घेतलेल्या या निर्णयाचे सर्वच स्तरावरून कौतुक होत आहे. 

वाळूजमधील मुस्लीम बांधवांनी हिंदू धर्माचा आदर करत आषाढी एकादशीच्या पवित्र दिनी बकरी ईद बकरा कुर्बानी न देता साजरा करण्याचा निर्णय घेतला. विशे, म्हणजे बकरी ईद हा मुस्लीम बांधवांचाही महत्त्वाचा आणि पवित्र उत्सव मानला जातो. मात्र, वाळूजमधील मुस्लीम बांधवांनी घेतलेल्या ह्या निर्णयाचे सर्वच स्तरातून कौतूक होत आहे.  

टॅग्स :Bakri Eidबकरी ईदAshadhi Ekadashiआषाढी एकादशीPandharpurपंढरपूरPandharpur Wariपंढरपूर वारी