लातुरात धुमाकूळ घालणाऱ्या साखळी चोरास अटक
By Admin | Updated: February 8, 2016 00:18 IST2016-02-08T00:02:08+5:302016-02-08T00:18:35+5:30
लातूर : भरदिवसा महिलांच्या गळ््यातील दागिने हिसकावून पोबारा करणाऱ्या एका सराईत चोरट्यास एमआयडीसी पोलिसांनी परभणी शहरातून अटक केली आहे.

लातुरात धुमाकूळ घालणाऱ्या साखळी चोरास अटक
मनीष दळवी -- असुर्डे
केल्याने होत आहे रे ।
आधी केलेचि पाहिजे ।।
या उक्तीप्रमाणे केल्याने सर्व काही होऊ शकते, परंतु त्याला प्रयत्नांची साधना आवश्यक आहे. याचे वास्तव रुप दाखवू पाहात आहे. नायशी येथील वाघेश्वरी स्वयंसहायता शेतकरी गट १८ सुशिक्षित तरूण एकत्रित येऊन सिमला मिरचीसारखे सेन्सिटिव्ह उत्पन्न घेऊ पाहात आहे. अडीच एकर क्षेत्रात १५०० इंद्रा जातीची सिमला मिरचीची रोपे लागवड करण्यात आली आहेत. संपूर्ण जागा १८ सुशिक्षित तरुणांपैकीच आहे. यासाठी संपूर्ण प्रोजेक्टला ५ लाखांची गरज होती. रोपे, लागवड, पाण्याची पाईपलाईन, ठिबक सिंचन, शेड नेट, मलचिंग पेपर, नांगरणी, फवारणी, खते, कीटकनाशके, नांगरणी व लागवड यासाठी मुंबईकर ग्रामस्थांचे मोठे योगदान आहे. ठिबक सिंचनाद्वारे कमी पाण्यात प्रत्येक रोपाला १ लीटर पाणी मिळत आहे. पाण्याचे बाष्पीभवन होऊ नये, यासाठी मलचिंग पेपर टाकण्यात आला आहे. कोकणात शेतीची अपुरी साधने आहेत. तरीही यावर मात करून या गटातील प्रत्येक सभासदाने अतोनात मेहनत घेतली. एक महिना दिवस - रात्र या शेती प्रकल्पात राबत होते.
यामध्ये मोठे योगदान आहे ते गावचे सरपंच किशोर घाग यांचे!़ त्यांच्याच पुढाकाराने गणपती सणामध्ये मुंबईकर चाकरमान्यांची बैठक घेतली़ त्यामध्ये त्यांना सहकार्य करण्याची विनंती केली़ रस्ते, विहिरी, पाखाड्या बांधून गावचा खऱ्या अर्थाने विकास होणार नाही, तर गावातील सुशिक्षित बेकारांच्या हाताला काम दिले पाहिजे, त्यांना स्वयंपूर्ण बनवले पाहिजे. गावात २२०० एकर जमीन आहे, पैकी ५० एकर फक्त लागवडीखाली आहे. त्यासाठी सामूहिक शेती हे उत्कृष्ट साधन आहे.़ लागवड खर्चासाठी आपणाकडून सहकार्य मिळाले, तर तरुण सुशिक्षित बेरोजगारांना नक्कीच दिशा दाखवता येईल, तसेच चार पैसे कमावण्याचा चांगला मार्ग मिळेल. यासाठी मुंबईकर चाकरमान्यांनी स्वतंत्र बैठक घेऊन प्रत्येकाच्या ऐपतीप्रमाणे या प्रकल्पासाठी, गावातील होतकरू मुलांसाठी ५ लाख रुपये उपलब्ध करून दिले.
या प्रकल्पाची माहिती मिळताच आर. एच. सरतापे उपविभागीय कृषी अधिकारी, चिपळूण यांनी भेट दिली. त्यांच्यासमवेत एस. एम. ढोबळे, ए. व्ही. शेनदसे, एच. जी. भिंगार्डे, एच. डी. सरगरे या कृषी अधिकाऱ्यांनी प्रकल्पाला भेट दिली व मार्गदर्शन केले. हा प्रकल्प पाहता नक्कीच यशस्वी होईल. त्यासाठी आमच्याकडून सर्वतोपरी सहकार्य मिळेल, असा शब्दही दिला. कोकणातील एक चांगला प्रकल्प म्हणून लोक याकडे नक्कीच पाहतील. यामध्ये येऊ पाहणाऱ्यांना हा शेतीप्रकल्प पथदीप ठरेल़, असे सांगून शेतीप्रकल्पासंबंधी काही सूचनाही केल्या. यामध्ये कोकणातील जमिनीमध्ये झिंक व बोरॉन याचे प्रमाण कमी असते, त्यामुळे मातीचे परीक्षण करून घ्या. तसेच मातीचा जो सरींचा बेड तयार केला आहे, त्याची रुंदी एक मीटर असावी. फुलकिडे, पांढरीमाशी, नागाळी, मावा ही कीटके या उत्पादनासाठी घातक आहेत. तसेच मर रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे वेगवेगळी फवारणी व वापरली जाणारी कीटकनाशके यांचा तक्ता तयार करा. तसेच बायरसारख्या कंपनीची कीटकनाशके वापरा़, या गोष्टींबाबत त्यांनी मोलाचा सल्ला दिला. श्री वाघेश्वरी शेतकरी स्वयंसहाय्यता गट, नायशीच्या नामफलकाचे अनावरण पंचायत समितीचे सदस्य चंद्रकांत जाधव व उपविभागीय कृषी अधिकारी, चिपळूण यांच्या हस्ते करण्यात आले.
विक्री नाशिकला
उत्पादन झालेली मिरची आॅनलाईन विकण्यासाठी नाशिक येथे रजिस्ट्रेशन करण्यात आले आहे. तसेच अन्य व्यापाऱ्यांच्याही संपर्कात असल्याचे किशोर घाग यांनी सांगितले.
आदर्श कामगिरी
कोकणातील बेरोजगार तरूणांना हा प्रकल्प आदर्श ठरणार आहे. कोकणात अजूनही पडिक जमिनीचे प्रमाण बरेच आहे. मुंबईकरांना सोबत घेत या पडिक जमिनी विकसित झाल्या तर कोकणची गरिबी संपेल.
१५ लाखांचे उत्पन्न मिळेल
पैशांचा प्रश्न सुटताच या तरुणांनी करिष्मा करुन दाखवला़ अहोरात्र मेहनत घेऊन १५०० रोपांची लागवड, ठिबक सिंचनाची व्यवस्था, नेटशेड उभारणे, नांगरणी, सरी पाडणे ही सर्व कामे केली़ २२ नोव्हेंबरला याचे बी रुजविले गेले़ २५ डिसेंबरला याची लागवड करण्यात आली. आज महिन्यातनंतर बऱ्याच रोपांना फुले आली आहेत. काही रोपांना मिरची धरली आहे़ अजून १५ दिवसांतनंतर चांगलेच पीक येईल. ९ महिन्यांच्या या पिकामध्ये साधारणत: १५० टन उत्पन्न मिळू शकते व १५ लाख रुपये मिळू शकतात, असे प्रकल्पाचे प्रमुख व सरपंच किशोर घाग यांनी सांगितले़