सातारा परिसराची तहान जारवरच

By Admin | Updated: June 2, 2014 01:34 IST2014-06-02T01:19:30+5:302014-06-02T01:34:06+5:30

साहेबराव हिवराळे , औरंगाबाद सातारा व देवळाई परिसरात पाऊण लाखाच्या वर लोकसंख्या असून, दरवर्षी टँकर आणि पाण्याच्या जारवरच नागरिकांना तहान भागवावी लागत आहे.

The thirst of the Satara area is just thirsty | सातारा परिसराची तहान जारवरच

सातारा परिसराची तहान जारवरच

साहेबराव हिवराळे , औरंगाबाद सातारा व देवळाई परिसरात पाऊण लाखाच्या वर लोकसंख्या असून, दरवर्षी टँकर आणि पाण्याच्या जारवरच नागरिकांना तहान भागवावी लागत आहे. सातारा परिसरासाठी गेल्या तीन महिन्यांपासून १५ टँकरची मागणी ग्रामपंचायतीने जिल्हा प्रशासनाकडे केली होती. प्रत्यक्षात केवळ ६ टँकर मिळाले. गेल्यावर्षी फेब्रुवारीतच पाण्याची तीव्रटंचाई निर्माण झाली होती. तेव्हा टँकरच्या फेर्‍यांमध्येही वाढ करण्यात आली होती. यंदा फेब्रुवारीपासून अर्ज करूनही प्रशासनाकडून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याची नाराजी शासन दरबारी पोहोचली होती. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने ६ टँकर आज सातारा परिसरात पाठवले. पाणीपातळी खोल गेल्यामुळे खाजगी टँकर आणि जारच्या पाण्यावरच तहान भागवावी लागत आहे. या भागात वर्षभर खाजगी पाण्याचा धंदा जोरात सुरू आहे. सातार्‍यात जारचे पाणी वापरणे प्रतिष्ठेचे ठरत आहे. जास्तीच्या टँकरसाठी पाठपुरावा जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयात १५ टँकरसाठी रीतसर मागणी केली असून, कायमस्वरूपी पाणीपुरवठ्याच्या योजनेसाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. सध्या ६ टँकरने पाणी दिले जात असून, जास्तीच्या टँकरसाठी वरिष्ठांकडे मागणी केली आहे, असे सरपंच अलका शिरसाट व ग्रामसेवक भास्कर साळवे यांनी सांगितले. किती दिवस करणार खर्च सातारा परिसरात बोअरच्या पाण्याने तळ गाठला असून, खाजगी टँकरचे पाणी वापरावे लागत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी मात्र खर्च सुरूच आहे. पिण्याच्या पाण्याची सोय करण्याकडे कुणीही लक्ष देत नाही. आंदोलन करण्याची वेळ आली आहे.असे सविता कुलकर्णी यांनी सांगितले. तहान भागत नाही देवीदास नरवडे म्हणाले की, जारच्या पाण्याने तहान भागत नाही. आम्हा सामान्यांना पाणीटंचाईचा फटका बसतो. मनपाप्रमाणे शुद्ध पाणीपुरवठा करून नागरिकांची तहान भागवावी लागते. टँकरच्या अपूर्ण फेर्‍या परिसराचा विस्तार बघता आठवड्यातून एकदा टँकर येते. टँकरची संख्या वाढविण्यासाठी सतत पाठपुरावा करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. किती दिवस टँकरवर अवलंबून राहावे लागणार आहे, असे हरिभाऊ राठोड यांनी सांगितले. बाटलीच्या पाण्यावर जास्त खर्च अनेकदा तक्रार करूनही शुद्ध पाणीपुरवठ्याकडे कुणीही लक्ष दिलेले नाही. अजून किती दिवस बाटलीतील पाण्यासाठी खर्च करावे लागणार? असा प्रश्न संतोष पारखे यांनी उपस्थित केला. सामान्य व्यक्तीचा खर्च वाढला दीपक पाडळकर म्हणाले की, पाणीपुरवठ्याची सोय नसल्यामुळे व जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने नाइलाजाने बाटलीबंद पाणी वापरावे लागत आहे. त्यामुळे सामान्य व्यक्तीचा खर्च प्रचंड वाढला आहे. टँकरचे पाणी मिळत नाही. कामगारांना सायकलवर पाणी वाहून न्यावे लागते.

Web Title: The thirst of the Satara area is just thirsty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.