शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणे औरंगाबाद शहरात तीनपट पाण्याचे स्रोत; जलतज्ज्ञांचा महापालिका आयुक्तांना अहवाल सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 16:43 IST

शहराला जेवढी गरज आज पाण्याची आहे, त्याच्या तीनपट पाणी विविध जलस्रोतातून मिळेल, असा दावा काही जलतज्ज्ञांनी केला.

ठळक मुद्देयासंदर्भात अहवालही मनपा आयुक्तांना सादर करण्यात आला यासाठी तब्बल ५०० कोटींचा खर्च असल्याचेही सांगण्यात आले आहे.

औरंगाबाद : शहरात कुठेच पाण्याचा नैसर्गिक स्रोत नसल्याने चार दशकांपूर्वी महापालिकेला कोट्यवधी रुपये खर्च करून जायकवाडीहून पाणी आणावे लागत आहे. शहराला जेवढी गरज आज पाण्याची आहे, त्याच्या तीनपट पाणी विविध जलस्रोतातून मिळेल, असा दावा सोमवारी काही जलतज्ज्ञांनी केला. यासंदर्भात अहवालही मनपा आयुक्तांना सादर करण्यात आला असून, यासाठी तब्बल ५०० कोटींचा खर्च असल्याचेही सांगण्यात आले आहे.

जलतज्ज्ञ तथा शिरपूर पॅटर्नचे जनक सुरेश खानापूरकर यांनी एक प्रकल्प अहवाल तयार केला असून, शहराला आज जेवढी गरज आहे, त्यापेक्षा तिप्पट पाणी मिळेल. कमी विजेचा वापर करून हे पाणी वापरता येईल, असा दावाही करण्यात आला आहे. खानापूरकर, प्रमोद खैरनार, संजय कापसे, डॉ. अशोक तेजनकर यांनी नैसर्गिक स्रोतांचा अभ्यास केला. हर्सूल, सावंगी, सातारा परिसर, चिकलठाणा या चार ठिकाणांहून शहराला ३०२ दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध होऊ शकते. यासाठी अंदाजे ५०० कोटी रुपये खर्च लागण्याची शक्यता आहे.

शहराचा परिसर ६४२ चौरस किलोमीटर एवढा विस्तीर्ण आहे. दरवर्षी ६७२ मिलिमीटर सरासरी पाऊस होतो. यापैकी बाष्पीभवन व इतर कारणांमुळे उपलब्ध न होणारे पाणी वगळले तरी ३०२ दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध होते. शहर परिसरातील डोंगराळ भागातील पाणी नद्या, नाल्यांद्वारे वाहून जाते. हे पाणी अडविले आणि मुरविल्यास शहराला कमी वीज वापरून पाणी उपलब्ध होऊ शकते, असा दावा अहवालात करण्यात आला आहे. सातारा, देवळाई परिसरात २० लहान मोठे तलाव आहेत. हे तलाव दोन-तीन पावसातच भरतात व पाणी वाहून जाते. त्यामुळे तलाव खोल केल्यास ४५ किलोमीटरच्या या पाणलोट क्षेत्रात ११.७ दलघमी पाणी वाढू शकते.  ३२ दशलक्ष लिटर पाण्यावर सव्वालाख नागरिकांची तहान भागेल, असे अहवालात म्हटले आहे. 

हर्सूल तलावच दरवर्षी कोरडामागील दहा वर्षांमध्ये हर्सूल तलाव तुडुंब भरलाच नाही. तलावातील गाळ काढूनही बघितला. त्याचा काहीच फायदा मनपाला झाला नाही. तलावातून मनपाला पूर्वी दररोज ५ एमएलडी पाणी मिळत होते. तलावात पाणीच येत नसल्याने मागील दोन वर्षांपासून उपसाही बंद करण्यात आला आहे.

समांतर जलवाहिनी टाकणे होईनादहा वर्षांपूर्वी केंद्र आणि राज्य शासनाने महापालिकेला जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत समांतर जलवाहिनी टाकण्यासाठी १६१ कोटी २० लाख रुपये दिले. त्यावर व्याजच १२७ कोटींचे झाले आहे. आजही मनपाच्या तिजोरीत ३७३ कोटी २६ लाख रुपये पडून आहेत. तरीही समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण करता आले नाही.

यापूर्वीही अनेक प्रयोगजलतज्ज्ञ माधवराव चितळे यांनीही यापूर्वी अनेकदा मनपाच्या विनंतीवरून शहरातील नैैसर्गिक पाण्याच्या स्रोतांचा अभ्यास केला. शहराला जेवढ्या पाण्याची गरज आहे, तेवढे पाणी मिळू शकणार नाही, असेही त्यांनी नमूद केले होते. दौलताबाद येथील मोमबत्ता तलावातील पाणी सायफन पद्धतीने पडेगाव, मिटमिटा, छावणी आदी भागातील नागरिकांना देता येऊ शकते, असाही अहवाल मनपाला सादर करण्यात आला होता. नहर-ए-अंबरीच्या पाण्याचा वापर करावा, असाही पर्याय समोर आला होता.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWaterपाणीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका