शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

...म्हणे औरंगाबाद शहरात तीनपट पाण्याचे स्रोत; जलतज्ज्ञांचा महापालिका आयुक्तांना अहवाल सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 16:43 IST

शहराला जेवढी गरज आज पाण्याची आहे, त्याच्या तीनपट पाणी विविध जलस्रोतातून मिळेल, असा दावा काही जलतज्ज्ञांनी केला.

ठळक मुद्देयासंदर्भात अहवालही मनपा आयुक्तांना सादर करण्यात आला यासाठी तब्बल ५०० कोटींचा खर्च असल्याचेही सांगण्यात आले आहे.

औरंगाबाद : शहरात कुठेच पाण्याचा नैसर्गिक स्रोत नसल्याने चार दशकांपूर्वी महापालिकेला कोट्यवधी रुपये खर्च करून जायकवाडीहून पाणी आणावे लागत आहे. शहराला जेवढी गरज आज पाण्याची आहे, त्याच्या तीनपट पाणी विविध जलस्रोतातून मिळेल, असा दावा सोमवारी काही जलतज्ज्ञांनी केला. यासंदर्भात अहवालही मनपा आयुक्तांना सादर करण्यात आला असून, यासाठी तब्बल ५०० कोटींचा खर्च असल्याचेही सांगण्यात आले आहे.

जलतज्ज्ञ तथा शिरपूर पॅटर्नचे जनक सुरेश खानापूरकर यांनी एक प्रकल्प अहवाल तयार केला असून, शहराला आज जेवढी गरज आहे, त्यापेक्षा तिप्पट पाणी मिळेल. कमी विजेचा वापर करून हे पाणी वापरता येईल, असा दावाही करण्यात आला आहे. खानापूरकर, प्रमोद खैरनार, संजय कापसे, डॉ. अशोक तेजनकर यांनी नैसर्गिक स्रोतांचा अभ्यास केला. हर्सूल, सावंगी, सातारा परिसर, चिकलठाणा या चार ठिकाणांहून शहराला ३०२ दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध होऊ शकते. यासाठी अंदाजे ५०० कोटी रुपये खर्च लागण्याची शक्यता आहे.

शहराचा परिसर ६४२ चौरस किलोमीटर एवढा विस्तीर्ण आहे. दरवर्षी ६७२ मिलिमीटर सरासरी पाऊस होतो. यापैकी बाष्पीभवन व इतर कारणांमुळे उपलब्ध न होणारे पाणी वगळले तरी ३०२ दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध होते. शहर परिसरातील डोंगराळ भागातील पाणी नद्या, नाल्यांद्वारे वाहून जाते. हे पाणी अडविले आणि मुरविल्यास शहराला कमी वीज वापरून पाणी उपलब्ध होऊ शकते, असा दावा अहवालात करण्यात आला आहे. सातारा, देवळाई परिसरात २० लहान मोठे तलाव आहेत. हे तलाव दोन-तीन पावसातच भरतात व पाणी वाहून जाते. त्यामुळे तलाव खोल केल्यास ४५ किलोमीटरच्या या पाणलोट क्षेत्रात ११.७ दलघमी पाणी वाढू शकते.  ३२ दशलक्ष लिटर पाण्यावर सव्वालाख नागरिकांची तहान भागेल, असे अहवालात म्हटले आहे. 

हर्सूल तलावच दरवर्षी कोरडामागील दहा वर्षांमध्ये हर्सूल तलाव तुडुंब भरलाच नाही. तलावातील गाळ काढूनही बघितला. त्याचा काहीच फायदा मनपाला झाला नाही. तलावातून मनपाला पूर्वी दररोज ५ एमएलडी पाणी मिळत होते. तलावात पाणीच येत नसल्याने मागील दोन वर्षांपासून उपसाही बंद करण्यात आला आहे.

समांतर जलवाहिनी टाकणे होईनादहा वर्षांपूर्वी केंद्र आणि राज्य शासनाने महापालिकेला जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत समांतर जलवाहिनी टाकण्यासाठी १६१ कोटी २० लाख रुपये दिले. त्यावर व्याजच १२७ कोटींचे झाले आहे. आजही मनपाच्या तिजोरीत ३७३ कोटी २६ लाख रुपये पडून आहेत. तरीही समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण करता आले नाही.

यापूर्वीही अनेक प्रयोगजलतज्ज्ञ माधवराव चितळे यांनीही यापूर्वी अनेकदा मनपाच्या विनंतीवरून शहरातील नैैसर्गिक पाण्याच्या स्रोतांचा अभ्यास केला. शहराला जेवढ्या पाण्याची गरज आहे, तेवढे पाणी मिळू शकणार नाही, असेही त्यांनी नमूद केले होते. दौलताबाद येथील मोमबत्ता तलावातील पाणी सायफन पद्धतीने पडेगाव, मिटमिटा, छावणी आदी भागातील नागरिकांना देता येऊ शकते, असाही अहवाल मनपाला सादर करण्यात आला होता. नहर-ए-अंबरीच्या पाण्याचा वापर करावा, असाही पर्याय समोर आला होता.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWaterपाणीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका