शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

'ते सतत म्हणायचे मराठा आरक्षणाशिवाय पर्याय नाही; कावळे यांच्या नातेवाइकांनी फोडला टाहो 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2023 16:53 IST

परिस्थिती बिकट होती पण त्यांना मराठा आरक्षणाचा ध्यास लागला होता

- अमेय पाठक

छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षण आंदोलनात सक्रीय असलेले सुनील कावळे यांनी मुंबईत आत्महत्या केली, हे समजताच  छत्रपती संभाजीनगरमध्ये राहणाऱ्या त्यांच्या कुटुंबाने एकच टाहो फोडला. मूळचे जालन्याचे असलेले कावळे कुटुंब उदरनिर्वाहासाठी छत्रपती संभाजीनगरात राहत. मी मुंबईला जात असून आता मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे यांच्यासोबतच राहणार आहे. आरक्षण घेऊनच परत येणार असा निर्धार त्यांनी व्यक्त केल्याचे नातेवाइकांनी सांगितले.

आंतरवाली सराटी येथील १४ ऑक्टोबर रोजी झालेल्या सभेनंतर सुनील कावळे यांना मराठा आरक्षणाचा ध्यास लागला होता. मंगळवारी कावळे यांनी कामानिमित्त मुंबईला जात आहे असे सांगितले. इतर कार्यकर्त्यांना जरांगेंना भेटणं शक्य नाही. पण 24 ऑक्टोबरला मुंबईत मराठा आंदोलनाची सभा आहे. या सभेवेळी मनोज जरांगेंसोबत सेल्फी काढणार म्हणजे काढणार, असा निर्धार सुनील कावळे यांनी केला होता, अशी माहिती सुनील कावळे यांच्या जावयाने दिली.त्यानंतर बुधवारी रात्री कावळे यांनी मुंबईतील बीकेसी येथील उड्डाणपुलावरील लोखंडी खांबला गळफास घेत जीव संपवले. याची माहिती मिळताच कावळे कुटुंबाला धक्का बसला.

जरांगेंसोबत राहण्याचा निर्धारनोकरीला असलं तर सभेला जाता येणार नाही, सुट्टी मिळणार नाही म्हणून ते नोकरी न करता स्वत: रिक्षा चालवत होते. मी आता जरांगेंसोबतच राहणार, त्यांना सोडणार नाही असं सुनील कावळे म्हणायचे, असं कुटुंबीयांनी सांगितलं. नोकरीला असलं तर सभेला जाता येणार नाही, सुट्टी मिळणार नाही म्हणून ते नोकरी न करता स्वत: रिक्षा चालवत होते. मी आता जरांगेंसोबतच राहणार, त्यांना सोडणार नाही असं सुनील कावळे म्हणायचे, असं कुटुंबीयांनी सांगितलं.

परिस्थिती बिकट होती पण त्यांना आरक्षणाचा ध्यास होतासुनील कावळे यांची परिस्थिती हालाकिची होती. त्यांच्याकडे 1 एकरपेक्षाही कमी शेती आहे.जालना जिल्ह्यातील आंबड तालुक्यातील चिकनगाव हे सुनील कावळे यांचं मूळगाव. गावाकडे कमी शेती, त्यात उदरनिर्वाहाचा प्रश्न, त्यामुळे सुनील कावळे हे जालन्यावरुन छत्रपती संभाजीनगरला आले. त्यांनी सुरुवातीला ड्रायव्हर म्हणून नोकरी केली. मुंबई-पुणे या मार्गावर त्यांनी अनेकवेळा ड्रायव्हिंग केलं. गेल्या 15 ते 17 वर्षापासून ड्रायव्हर म्हणून नोकरी करत होते. त्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरु होता. मात्र मराठा आरक्षण आंदोलनाकडे त्यांचा कल होता. नोकरीमुळे सभेला हजर राहता येत नव्हतं. त्यामुळे त्यांनी नोकरीही सोडली. मराठ्यांना आरक्षण नाही, १-१ एकर शेती क्षेत्रात काही होत नाही. त्यामुळे मराठा आरक्षणाशिवाय पर्याय नाही असं सुनील कावळे म्हणायचे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणAurangabadऔरंगाबाद