शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

'ते सतत म्हणायचे मराठा आरक्षणाशिवाय पर्याय नाही; कावळे यांच्या नातेवाइकांनी फोडला टाहो 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2023 16:53 IST

परिस्थिती बिकट होती पण त्यांना मराठा आरक्षणाचा ध्यास लागला होता

- अमेय पाठक

छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षण आंदोलनात सक्रीय असलेले सुनील कावळे यांनी मुंबईत आत्महत्या केली, हे समजताच  छत्रपती संभाजीनगरमध्ये राहणाऱ्या त्यांच्या कुटुंबाने एकच टाहो फोडला. मूळचे जालन्याचे असलेले कावळे कुटुंब उदरनिर्वाहासाठी छत्रपती संभाजीनगरात राहत. मी मुंबईला जात असून आता मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे यांच्यासोबतच राहणार आहे. आरक्षण घेऊनच परत येणार असा निर्धार त्यांनी व्यक्त केल्याचे नातेवाइकांनी सांगितले.

आंतरवाली सराटी येथील १४ ऑक्टोबर रोजी झालेल्या सभेनंतर सुनील कावळे यांना मराठा आरक्षणाचा ध्यास लागला होता. मंगळवारी कावळे यांनी कामानिमित्त मुंबईला जात आहे असे सांगितले. इतर कार्यकर्त्यांना जरांगेंना भेटणं शक्य नाही. पण 24 ऑक्टोबरला मुंबईत मराठा आंदोलनाची सभा आहे. या सभेवेळी मनोज जरांगेंसोबत सेल्फी काढणार म्हणजे काढणार, असा निर्धार सुनील कावळे यांनी केला होता, अशी माहिती सुनील कावळे यांच्या जावयाने दिली.त्यानंतर बुधवारी रात्री कावळे यांनी मुंबईतील बीकेसी येथील उड्डाणपुलावरील लोखंडी खांबला गळफास घेत जीव संपवले. याची माहिती मिळताच कावळे कुटुंबाला धक्का बसला.

जरांगेंसोबत राहण्याचा निर्धारनोकरीला असलं तर सभेला जाता येणार नाही, सुट्टी मिळणार नाही म्हणून ते नोकरी न करता स्वत: रिक्षा चालवत होते. मी आता जरांगेंसोबतच राहणार, त्यांना सोडणार नाही असं सुनील कावळे म्हणायचे, असं कुटुंबीयांनी सांगितलं. नोकरीला असलं तर सभेला जाता येणार नाही, सुट्टी मिळणार नाही म्हणून ते नोकरी न करता स्वत: रिक्षा चालवत होते. मी आता जरांगेंसोबतच राहणार, त्यांना सोडणार नाही असं सुनील कावळे म्हणायचे, असं कुटुंबीयांनी सांगितलं.

परिस्थिती बिकट होती पण त्यांना आरक्षणाचा ध्यास होतासुनील कावळे यांची परिस्थिती हालाकिची होती. त्यांच्याकडे 1 एकरपेक्षाही कमी शेती आहे.जालना जिल्ह्यातील आंबड तालुक्यातील चिकनगाव हे सुनील कावळे यांचं मूळगाव. गावाकडे कमी शेती, त्यात उदरनिर्वाहाचा प्रश्न, त्यामुळे सुनील कावळे हे जालन्यावरुन छत्रपती संभाजीनगरला आले. त्यांनी सुरुवातीला ड्रायव्हर म्हणून नोकरी केली. मुंबई-पुणे या मार्गावर त्यांनी अनेकवेळा ड्रायव्हिंग केलं. गेल्या 15 ते 17 वर्षापासून ड्रायव्हर म्हणून नोकरी करत होते. त्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरु होता. मात्र मराठा आरक्षण आंदोलनाकडे त्यांचा कल होता. नोकरीमुळे सभेला हजर राहता येत नव्हतं. त्यामुळे त्यांनी नोकरीही सोडली. मराठ्यांना आरक्षण नाही, १-१ एकर शेती क्षेत्रात काही होत नाही. त्यामुळे मराठा आरक्षणाशिवाय पर्याय नाही असं सुनील कावळे म्हणायचे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणAurangabadऔरंगाबाद