शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
2
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
3
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
4
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
5
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
6
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
7
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!
8
आठ महिन्यांत चौघांची हत्या; २० वर्षांच्या गँगस्टरचा एन्काऊंटरमध्ये खात्मा, VIDEO आला समोर
9
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल
10
खासदार प्रिया सरोज आणि क्रिकेटर रिंकू सिंह यांच्या लग्नाची तारीख टळली; समोर आलं मोठं कारण...
11
धारावीतील २४९ पैकी १६१ बांधकामे पात्र, पहिली यादी जाहीर; अपात्र लोकांना ५ जुलैपर्यंत संधी
12
इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले...
13
सोहेलसोबत पळून जाऊन केलेलं लग्न, मग २४ वर्षांनी का झाला घटस्फोट? सीमा सजदेहने सांगितलं खरं कारण
14
कसली भारी दिसत्येय 'सैराट'मधील परश्याचा मित्र 'लंगड्या'ची गर्लफ्रेंड, सौंदर्यात नायिकांनाही देते टक्कर!
15
ठाणे: आणखी २ इमारतींवर हातोडा, मुंब्रा-शीळच्या बेकायदा इमारतींमधील रहिवासी रस्त्यावर
16
मध्य पूर्वेतील तणाव, हिंडगनबर्गचे आरोप अन् धारावी प्रकल्प; गौतम अदानी स्पष्टच बोलले
17
युद्धविरामाबाबतचा संभ्रम संपला, अखेर इस्राइल-इराणमधील संघर्ष आटोपला, पण अखेरचा हल्ला करत इराण म्हणाला...  
18
इराण-इस्रायल युद्धबंदीमुळे बाजार 'रॉकेट'; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
19
कोण आहे अलीफा अहमद?; पती डॉक्टर तर स्वत: TCS मध्ये करत होती नोकरी; आता बनल्या आमदार
20
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?

औरंगाबादच्या कचरा निर्र्मूलनात गांभीर्य नाही -विभागीय आयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 01:22 IST

विभागीय आयुक्त तथा कचरा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ.पुरुषोत्तम भापकर यांच्या संयमाचा बांध बुधवारी फुटला. आठवडाभरात कचऱ्याच्या वर्गीकरणात आणि विल्हेवाटीत पूर्ण ताकदीने काम केले नाहीतर महापालिकेविरुद्ध शासनास अहवाल देण्याचा इशारा त्यांनी दिला.

ठळक मुद्देआठवड्याची डेडलाईन : ...तर महापालिकेच्या विरोधात शासनाला अहवाल देणार

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : विभागीय आयुक्त तथा कचरा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ.पुरुषोत्तम भापकर यांच्या संयमाचा बांध बुधवारी फुटला. आठवडाभरात कचऱ्याच्या वर्गीकरणात आणि विल्हेवाटीत पूर्ण ताकदीने काम केले नाहीतर महापालिकेविरुद्ध शासनास अहवाल देण्याचा इशारा त्यांनी दिला. मनपाची यंत्रणा गांभीर्याने काम करण्यास तयार नसल्याचा आरोप करीत त्यांनी प्रशासनातील उणिवांवर बोट ठेवले. ८३ दिवसांपासून शहरातील कचºयाच्या विल्हेवाटीची समस्या उभी आहे. ओला व सुका असा वर्गीकरण केलेला कचरा संकलन करण्यात पालिकेला १०० टक्के यश आलेले नाही. सफाई कर्मचाºयांची मोठी फौज असताना नियंत्रण म्हणून काम करणारे अधिकारी याबाबत गंभीर नाहीत. मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांना निलंबित करण्याचा इशारा दिला आहे. यंत्रणा नापास करण्यास जबाबदार वॉर्ड अधिकाºयांवर कारवाई करा. आराखडा तयार केला, ३९ जागा निश्चित केल्या. तरीही पालिका प्रशासन कार्यवाही करीत नसेल तर कोर्टाची बेअदबी होईल. जागांचा वापर करण्यास टाळाटाळ, जास्तीचा कचरा उत्सर्जित करून वर्गीकरण न करणाºयांवर काय कारवाई केली. याबाबतचा सगळा गंभीर अहवाल शासनाकडे सादर करणार असल्याचे डॉ.भापकर म्हणाले.किती कचरा निघतो शहरात९ मार्च रोजी झालेल्या बैठकीत २३० मेट्रिक टन ओला कचरा शहरात जमा होतो, असे सांगण्यात आले. त्यानंतर दर बैठकीत १०० मेट्रिक टनाने कचºयाच्या निर्मितीचा आकडा वाढत गेला. डीपीआर करणाºया संस्थेने ६५०.४३ मेट्रिक टन कचरा निघतो असे सांगितले आहे. पॉइंट ४३ मेट्रिक टन इतक्या बारकाईने खरंच कचºयाच्या निर्मितीचे संशोधन झाले आहे काय? असा प्रश्न पत्रकारांनी आयुक्तांना केला. यावर नगरपालिका प्रशासन उपसंचालक रीता मैत्रेवार यांनी पुढील काही वर्षांतील लोकसंख्या आणि कचरानिर्मितीचा त्यात अभ्यास करण्यात आल्याचे नमूद करून वेळ मारून नेली. ही सगळी आकडेमोड अर्थकारणाभोवती फिरत असल्याचा संशय येतो आहे. तीन वेळा निविदा मागवूनही मशिनरी पुरविण्यासाठी कंत्राटदार मिळत नाही. या सगळ्यामागे नेमके काय कारण आहे, यावर डॉ.भापकर म्हणाले, पालिकेकडून याबाबत निश्चित माहिती मिळालेली नाही.१४ मे रोजी आयुक्त येणार१४ मे रोजी मनपा आयुक्त निपुण विनायक रुजू होतील. त्यानंतर पूर्णपणे पालिकेच्या कामकाजाबाबत निर्णय घेणे शक्य होईल. आयुक्त नसल्यामुळे काही अडचणी येत असतील; परंतु ते रुजू झाल्यानंतर कचºयाच्या कामाचा आढावा घेऊन निर्णय घेतील, असे डॉ.भापकर म्हणाले. कचºयाच्या प्रकरणातून मनपाने तातडीने बाहेर पडले पाहिजे. शहरात पाणीपुरवठा, रस्ते, पथदिव्यांचे प्रश्न आहेत. रोज कचºयावर बैठका घेतल्यास इतर कामांसाठी कधी वेळ देणार. पावसाळ्यापूर्वीच नालेसफाई व शहरात १०० टक्के कचºयाचे वर्गीकरण होऊन प्रक्रियेला सुरुवात होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाDivisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालय