शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

औरंगाबादच्या कचरा निर्र्मूलनात गांभीर्य नाही -विभागीय आयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 01:22 IST

विभागीय आयुक्त तथा कचरा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ.पुरुषोत्तम भापकर यांच्या संयमाचा बांध बुधवारी फुटला. आठवडाभरात कचऱ्याच्या वर्गीकरणात आणि विल्हेवाटीत पूर्ण ताकदीने काम केले नाहीतर महापालिकेविरुद्ध शासनास अहवाल देण्याचा इशारा त्यांनी दिला.

ठळक मुद्देआठवड्याची डेडलाईन : ...तर महापालिकेच्या विरोधात शासनाला अहवाल देणार

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : विभागीय आयुक्त तथा कचरा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ.पुरुषोत्तम भापकर यांच्या संयमाचा बांध बुधवारी फुटला. आठवडाभरात कचऱ्याच्या वर्गीकरणात आणि विल्हेवाटीत पूर्ण ताकदीने काम केले नाहीतर महापालिकेविरुद्ध शासनास अहवाल देण्याचा इशारा त्यांनी दिला. मनपाची यंत्रणा गांभीर्याने काम करण्यास तयार नसल्याचा आरोप करीत त्यांनी प्रशासनातील उणिवांवर बोट ठेवले. ८३ दिवसांपासून शहरातील कचºयाच्या विल्हेवाटीची समस्या उभी आहे. ओला व सुका असा वर्गीकरण केलेला कचरा संकलन करण्यात पालिकेला १०० टक्के यश आलेले नाही. सफाई कर्मचाºयांची मोठी फौज असताना नियंत्रण म्हणून काम करणारे अधिकारी याबाबत गंभीर नाहीत. मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांना निलंबित करण्याचा इशारा दिला आहे. यंत्रणा नापास करण्यास जबाबदार वॉर्ड अधिकाºयांवर कारवाई करा. आराखडा तयार केला, ३९ जागा निश्चित केल्या. तरीही पालिका प्रशासन कार्यवाही करीत नसेल तर कोर्टाची बेअदबी होईल. जागांचा वापर करण्यास टाळाटाळ, जास्तीचा कचरा उत्सर्जित करून वर्गीकरण न करणाºयांवर काय कारवाई केली. याबाबतचा सगळा गंभीर अहवाल शासनाकडे सादर करणार असल्याचे डॉ.भापकर म्हणाले.किती कचरा निघतो शहरात९ मार्च रोजी झालेल्या बैठकीत २३० मेट्रिक टन ओला कचरा शहरात जमा होतो, असे सांगण्यात आले. त्यानंतर दर बैठकीत १०० मेट्रिक टनाने कचºयाच्या निर्मितीचा आकडा वाढत गेला. डीपीआर करणाºया संस्थेने ६५०.४३ मेट्रिक टन कचरा निघतो असे सांगितले आहे. पॉइंट ४३ मेट्रिक टन इतक्या बारकाईने खरंच कचºयाच्या निर्मितीचे संशोधन झाले आहे काय? असा प्रश्न पत्रकारांनी आयुक्तांना केला. यावर नगरपालिका प्रशासन उपसंचालक रीता मैत्रेवार यांनी पुढील काही वर्षांतील लोकसंख्या आणि कचरानिर्मितीचा त्यात अभ्यास करण्यात आल्याचे नमूद करून वेळ मारून नेली. ही सगळी आकडेमोड अर्थकारणाभोवती फिरत असल्याचा संशय येतो आहे. तीन वेळा निविदा मागवूनही मशिनरी पुरविण्यासाठी कंत्राटदार मिळत नाही. या सगळ्यामागे नेमके काय कारण आहे, यावर डॉ.भापकर म्हणाले, पालिकेकडून याबाबत निश्चित माहिती मिळालेली नाही.१४ मे रोजी आयुक्त येणार१४ मे रोजी मनपा आयुक्त निपुण विनायक रुजू होतील. त्यानंतर पूर्णपणे पालिकेच्या कामकाजाबाबत निर्णय घेणे शक्य होईल. आयुक्त नसल्यामुळे काही अडचणी येत असतील; परंतु ते रुजू झाल्यानंतर कचºयाच्या कामाचा आढावा घेऊन निर्णय घेतील, असे डॉ.भापकर म्हणाले. कचºयाच्या प्रकरणातून मनपाने तातडीने बाहेर पडले पाहिजे. शहरात पाणीपुरवठा, रस्ते, पथदिव्यांचे प्रश्न आहेत. रोज कचºयावर बैठका घेतल्यास इतर कामांसाठी कधी वेळ देणार. पावसाळ्यापूर्वीच नालेसफाई व शहरात १०० टक्के कचºयाचे वर्गीकरण होऊन प्रक्रियेला सुरुवात होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाDivisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालय