शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

औरंगाबादच्या कचरा निर्र्मूलनात गांभीर्य नाही -विभागीय आयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 01:22 IST

विभागीय आयुक्त तथा कचरा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ.पुरुषोत्तम भापकर यांच्या संयमाचा बांध बुधवारी फुटला. आठवडाभरात कचऱ्याच्या वर्गीकरणात आणि विल्हेवाटीत पूर्ण ताकदीने काम केले नाहीतर महापालिकेविरुद्ध शासनास अहवाल देण्याचा इशारा त्यांनी दिला.

ठळक मुद्देआठवड्याची डेडलाईन : ...तर महापालिकेच्या विरोधात शासनाला अहवाल देणार

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : विभागीय आयुक्त तथा कचरा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ.पुरुषोत्तम भापकर यांच्या संयमाचा बांध बुधवारी फुटला. आठवडाभरात कचऱ्याच्या वर्गीकरणात आणि विल्हेवाटीत पूर्ण ताकदीने काम केले नाहीतर महापालिकेविरुद्ध शासनास अहवाल देण्याचा इशारा त्यांनी दिला. मनपाची यंत्रणा गांभीर्याने काम करण्यास तयार नसल्याचा आरोप करीत त्यांनी प्रशासनातील उणिवांवर बोट ठेवले. ८३ दिवसांपासून शहरातील कचºयाच्या विल्हेवाटीची समस्या उभी आहे. ओला व सुका असा वर्गीकरण केलेला कचरा संकलन करण्यात पालिकेला १०० टक्के यश आलेले नाही. सफाई कर्मचाºयांची मोठी फौज असताना नियंत्रण म्हणून काम करणारे अधिकारी याबाबत गंभीर नाहीत. मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांना निलंबित करण्याचा इशारा दिला आहे. यंत्रणा नापास करण्यास जबाबदार वॉर्ड अधिकाºयांवर कारवाई करा. आराखडा तयार केला, ३९ जागा निश्चित केल्या. तरीही पालिका प्रशासन कार्यवाही करीत नसेल तर कोर्टाची बेअदबी होईल. जागांचा वापर करण्यास टाळाटाळ, जास्तीचा कचरा उत्सर्जित करून वर्गीकरण न करणाºयांवर काय कारवाई केली. याबाबतचा सगळा गंभीर अहवाल शासनाकडे सादर करणार असल्याचे डॉ.भापकर म्हणाले.किती कचरा निघतो शहरात९ मार्च रोजी झालेल्या बैठकीत २३० मेट्रिक टन ओला कचरा शहरात जमा होतो, असे सांगण्यात आले. त्यानंतर दर बैठकीत १०० मेट्रिक टनाने कचºयाच्या निर्मितीचा आकडा वाढत गेला. डीपीआर करणाºया संस्थेने ६५०.४३ मेट्रिक टन कचरा निघतो असे सांगितले आहे. पॉइंट ४३ मेट्रिक टन इतक्या बारकाईने खरंच कचºयाच्या निर्मितीचे संशोधन झाले आहे काय? असा प्रश्न पत्रकारांनी आयुक्तांना केला. यावर नगरपालिका प्रशासन उपसंचालक रीता मैत्रेवार यांनी पुढील काही वर्षांतील लोकसंख्या आणि कचरानिर्मितीचा त्यात अभ्यास करण्यात आल्याचे नमूद करून वेळ मारून नेली. ही सगळी आकडेमोड अर्थकारणाभोवती फिरत असल्याचा संशय येतो आहे. तीन वेळा निविदा मागवूनही मशिनरी पुरविण्यासाठी कंत्राटदार मिळत नाही. या सगळ्यामागे नेमके काय कारण आहे, यावर डॉ.भापकर म्हणाले, पालिकेकडून याबाबत निश्चित माहिती मिळालेली नाही.१४ मे रोजी आयुक्त येणार१४ मे रोजी मनपा आयुक्त निपुण विनायक रुजू होतील. त्यानंतर पूर्णपणे पालिकेच्या कामकाजाबाबत निर्णय घेणे शक्य होईल. आयुक्त नसल्यामुळे काही अडचणी येत असतील; परंतु ते रुजू झाल्यानंतर कचºयाच्या कामाचा आढावा घेऊन निर्णय घेतील, असे डॉ.भापकर म्हणाले. कचºयाच्या प्रकरणातून मनपाने तातडीने बाहेर पडले पाहिजे. शहरात पाणीपुरवठा, रस्ते, पथदिव्यांचे प्रश्न आहेत. रोज कचºयावर बैठका घेतल्यास इतर कामांसाठी कधी वेळ देणार. पावसाळ्यापूर्वीच नालेसफाई व शहरात १०० टक्के कचºयाचे वर्गीकरण होऊन प्रक्रियेला सुरुवात होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाDivisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालय