शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

नेतृत्व बदलण्याचा प्रश्नच येत नाही; फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 14:40 IST

रावसाहेब दानवे यांचा पुनरूच्चार

ठळक मुद्दे बाळासाहेब ठाकरे असते तर ही वेळच आली नसतीसत्ता समीकरणाच्या सर्व प्रश्नांना बगल दिली. 

औरंगाबाद : राज्यात भाजपचेच सरकार सत्तेवर येणार आणि माजी मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस हेच पुन्हा मुख्यमंत्री होणार, असा पुनरुच्चार  केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना पुन्हा केला. फडणवीस यांचे नेतृत्व बदलण्याचा प्रश्नच येत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.     

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज असते, तर महायुतीबाबत ‘ही वेळ’ आलीच नसती, असे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगून  राज्यात भाजपचेच सरकार येणार, हे ठामपणे सांगितले. सत्तेचे समीकरण कसे जुळणार, शिवसेना सोबत येणार काय, भाजपच्या संपर्कात इतर पक्षांचे आमदार आहेत काय? याबाबत थेट उत्तर देणे त्यांनी टाळले. मंगळवार किंवा बुधवारपर्यंत चित्र स्पष्ट होणार असल्याचे सूचक वक्तव्य करून त्यांनी सत्ता समीकरणाच्या सर्व प्रश्नांना बगल दिली. 

केंद्रीय राज्यमंत्री दानवे म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांनी शिवसेना- भाजप युतीची मोट बांधली. युतीमध्ये ज्यांचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र ठाकरे आणि महाजन यांनीच निश्चित केलेले आहे. त्याच सूत्राआधारे १९९५ मध्ये राज्यात शिवसेना- भाजप युतीचे सरकार आले होते. शिवसेनेकडे जास्त आमदार असल्याने मनोहर जोशी व नारायण राणे हे मुख्यमंत्री झाले. त्या सूत्राचा २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतदेखील विचार होऊन मुख्यमंत्रीपद भाजपला मिळणे अपेक्षित होते. मात्र, निवडणूक निकाल लागले त्याच दिवशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमच्या समोर सर्व पर्याय खुले असल्याचे वक्तव्य करून मुख्यमंत्रीपदाचा आग्रह धरला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि ठाकरे या दोघांमध्ये मातोश्रीवर जे बोलणे झाले होते, ते पत्रपरिषद घेऊन सांगितले होते. सत्तेचे समान वाटप होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते; परंतु त्यावेळी मुख्यमंत्रीपद वाटपाबाबतही समान वाटपाचा विचार झालेला नव्हता; परंतु ठाकरे यांच्या भूमिकेमुळेच राज्यात अस्थिरता निर्माण झाली. 

बाळासाहेब ठाकरे आज हयात असते, तर ही वेळच आली नसती. महाजनादेश यात्रेमुळे महायुतीला जनादेश मिळाला. त्याचा आदर दोन्ही पक्षांनी करावा, असे आवाहन दानवे यांनी केले. फडणवीस यांच्या ५ वर्षांच्या कार्यकाळात राज्यात भरपूर विकासकामे झाली. दोन वेळा दुष्काळ पडला. मराठा, धनगर समाज व शेतकऱ्यांचे आंदोलनही झाले; परंतु फडणवीस यांनी ती परिस्थिती संयमाने हाताळली. मुख्यमंत्री म्हणून फडणवीस हे यशस्वी ठरले. त्यामुळे त्यांचे नेतृत्व बदलण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात पुन्हा आमचेच सरकार येणार असल्याचा पुनरुच्चार दानवे यांनी केला. यावेळी मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड, नगरसेवक प्रमोद राठोड यांची उपस्थिती होती. केंद्रीय पथकाच्या पाहणीनंतर शेतकऱ्यांना मदत 

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तत्पूर्वी, राज्यपालांनी शेतकऱ्यांना प्राथमिक स्वरूपाची आर्थिक मदत जाहीर केली. नुकसानीच्या तुलनेत ही मदत तुटपुंजी असली तरी शेतकऱ्यांना दिलासा देणारी आहे. राज्याचा एकूण नुकसानीचा आकडा निश्चित झाल्यानंतर केंद्रीय पथक पाहणीसाठी येईल. पथकाच्या पाहणीनंतर केंद्राची शेतकऱ्यांना मदत मिळेल, तसेच राज्यपालांनी विमा कंपन्या आणि जिल्हाधिकाऱ्यांना पंचनाम्यांचे चावडी वाचन करण्याचे आदेश दिले आहेत. जेवढे नुकसान झाले, तेवढी भरपाई देण्याची तरतूद नसते, असेही दानवे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाChief Ministerमुख्यमंत्रीMaharashtraमहाराष्ट्र