शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

नेतृत्व बदलण्याचा प्रश्नच येत नाही; फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 14:40 IST

रावसाहेब दानवे यांचा पुनरूच्चार

ठळक मुद्दे बाळासाहेब ठाकरे असते तर ही वेळच आली नसतीसत्ता समीकरणाच्या सर्व प्रश्नांना बगल दिली. 

औरंगाबाद : राज्यात भाजपचेच सरकार सत्तेवर येणार आणि माजी मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस हेच पुन्हा मुख्यमंत्री होणार, असा पुनरुच्चार  केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना पुन्हा केला. फडणवीस यांचे नेतृत्व बदलण्याचा प्रश्नच येत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.     

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज असते, तर महायुतीबाबत ‘ही वेळ’ आलीच नसती, असे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगून  राज्यात भाजपचेच सरकार येणार, हे ठामपणे सांगितले. सत्तेचे समीकरण कसे जुळणार, शिवसेना सोबत येणार काय, भाजपच्या संपर्कात इतर पक्षांचे आमदार आहेत काय? याबाबत थेट उत्तर देणे त्यांनी टाळले. मंगळवार किंवा बुधवारपर्यंत चित्र स्पष्ट होणार असल्याचे सूचक वक्तव्य करून त्यांनी सत्ता समीकरणाच्या सर्व प्रश्नांना बगल दिली. 

केंद्रीय राज्यमंत्री दानवे म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांनी शिवसेना- भाजप युतीची मोट बांधली. युतीमध्ये ज्यांचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र ठाकरे आणि महाजन यांनीच निश्चित केलेले आहे. त्याच सूत्राआधारे १९९५ मध्ये राज्यात शिवसेना- भाजप युतीचे सरकार आले होते. शिवसेनेकडे जास्त आमदार असल्याने मनोहर जोशी व नारायण राणे हे मुख्यमंत्री झाले. त्या सूत्राचा २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतदेखील विचार होऊन मुख्यमंत्रीपद भाजपला मिळणे अपेक्षित होते. मात्र, निवडणूक निकाल लागले त्याच दिवशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमच्या समोर सर्व पर्याय खुले असल्याचे वक्तव्य करून मुख्यमंत्रीपदाचा आग्रह धरला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि ठाकरे या दोघांमध्ये मातोश्रीवर जे बोलणे झाले होते, ते पत्रपरिषद घेऊन सांगितले होते. सत्तेचे समान वाटप होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते; परंतु त्यावेळी मुख्यमंत्रीपद वाटपाबाबतही समान वाटपाचा विचार झालेला नव्हता; परंतु ठाकरे यांच्या भूमिकेमुळेच राज्यात अस्थिरता निर्माण झाली. 

बाळासाहेब ठाकरे आज हयात असते, तर ही वेळच आली नसती. महाजनादेश यात्रेमुळे महायुतीला जनादेश मिळाला. त्याचा आदर दोन्ही पक्षांनी करावा, असे आवाहन दानवे यांनी केले. फडणवीस यांच्या ५ वर्षांच्या कार्यकाळात राज्यात भरपूर विकासकामे झाली. दोन वेळा दुष्काळ पडला. मराठा, धनगर समाज व शेतकऱ्यांचे आंदोलनही झाले; परंतु फडणवीस यांनी ती परिस्थिती संयमाने हाताळली. मुख्यमंत्री म्हणून फडणवीस हे यशस्वी ठरले. त्यामुळे त्यांचे नेतृत्व बदलण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात पुन्हा आमचेच सरकार येणार असल्याचा पुनरुच्चार दानवे यांनी केला. यावेळी मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड, नगरसेवक प्रमोद राठोड यांची उपस्थिती होती. केंद्रीय पथकाच्या पाहणीनंतर शेतकऱ्यांना मदत 

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तत्पूर्वी, राज्यपालांनी शेतकऱ्यांना प्राथमिक स्वरूपाची आर्थिक मदत जाहीर केली. नुकसानीच्या तुलनेत ही मदत तुटपुंजी असली तरी शेतकऱ्यांना दिलासा देणारी आहे. राज्याचा एकूण नुकसानीचा आकडा निश्चित झाल्यानंतर केंद्रीय पथक पाहणीसाठी येईल. पथकाच्या पाहणीनंतर केंद्राची शेतकऱ्यांना मदत मिळेल, तसेच राज्यपालांनी विमा कंपन्या आणि जिल्हाधिकाऱ्यांना पंचनाम्यांचे चावडी वाचन करण्याचे आदेश दिले आहेत. जेवढे नुकसान झाले, तेवढी भरपाई देण्याची तरतूद नसते, असेही दानवे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाChief Ministerमुख्यमंत्रीMaharashtraमहाराष्ट्र