आरक्षणात राजकारण नाही..!
By Admin | Updated: July 4, 2016 00:12 IST2016-07-04T00:02:14+5:302016-07-04T00:12:39+5:30
जालना : धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी भाजपा कटिबद्ध आहे. आरक्षण देताना त्यात राजकारण होणार नाही, आरक्षण कोर्टात रद्द होणार नाही,

आरक्षणात राजकारण नाही..!
जालना : धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी भाजपा कटिबद्ध आहे. आरक्षण देताना त्यात राजकारण होणार नाही, आरक्षण कोर्टात रद्द होणार नाही, याची काळजी घेऊनच समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यात येईल, अशी ग्वाही भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी रविवारी येथे दिली.
धनगर समाज संघर्ष समितीचे राज्याध्याक्ष खा. डॉ. विकास महात्मे यांची राज्यसभेवर निवड झाल्याने त्यांचा तसेच समाजातील गुणवंतांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.
व्यासपीठावर पालकमंत्री बबनराव लोणीकर, आ. अर्जुन खोतकर, आ. नारायण कुचे, सुनिताताई महात्मे, निर्मलाताई दानवे, शोभाताई मतकर, माजी आ. विलास खरात, अरविंद चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर, कृ ऊबा उपसभापती भास्कर दानवे, धनगर समाज संघर्ष समितीचे राज्यसचिव मोरेश्वर झिले, प्रदेशाध्यक्ष बापूसाहेब शिंदे, विदर्भ विभागप्रमुख अरूण माहोरे आदी उपस्थिती होते.
खा. दानवे म्हणाले, पद्मश्री विकास महात्मे यांचे समाजासाठीे घेतलेले कष्ट, काम करण्याची जिद्द, त्याच्या पाठीशी असलेली समाजाची एकजूट हे सर्व पाहून त्यांना राज्यसभेत समाजाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी भाजपाने दिली. धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न गंभीर आहे. हे आरक्षण आजच भाजपा सरकार देवू शकते. मात्र, ते दिल्यास आरक्षण ५० टक्क्यांवर जाईल. शिवाय न्यायालयात हा ते टिकणार नाही. म्हणून आरक्षणात कुठलेही राजकारण ठेवले जाणार नाही. ते न्यायालयात टिकले पाहिजे, या बाजूने अभ्यास करूनच धनगर समाजाला आरक्षण दिले जाईल असे सांगून खा. दानवे म्हणाले, भाजपा हा जातीयवादी पक्ष असल्याच्या बावड्या उठवून पक्षाला बदनाम करण्यात येत आहे. मात्र, जे भाजपाला जातीयवादी म्हणतात त्यांनीच भाजपाच्या पक्तींत आपले हात धूवून घेतलेले आहेत.
आ. अर्जुन खोतकर म्हणाले की, पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांच्या रूपाने समाजाला नेतृत्व मिळाले आहे. धनगर समाजाचे शिक्षणाचे प्रमाण वाढले पाहिजे. यासाठी समाजाने जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी उपस्थित समाजबांधवांना यावेळी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धनगर समाज संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष सुभाष देडगे, सरचिटणीस अॅड. सुरेश देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष कपिल दहेकर, भास्कर माथले, दत्ता खोमणे, सुंदर मुळे, ज्ञानेश्वर कडेवार, विठ्ठल सातपुते, ज्ञानदेव मापारे, सुनील कानडे, मच्छिंद्र होळकर, विजय मतकर, शंकर सपकाळ, राजेंद्र साखरे, परमेश्वर सोमवारे, भगवान पाटोळे, सुरेश दिवटे अंबादास हातकडके, सुरेश दिवटे यांच्यासह संघर्ष समितीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक दहेकर यांनी केले, तर आभार अॅड. सुरेश देशमुख यांनी
मानले. कार्यक्रमास समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. (प्रतिनिधी)
भाजपा सरकारमुळे धनगर समाजाला ६५ वर्षांनंतर राज्यसभेत जाण्याची प्रथमच संधी मिळाली. याचा आनंद असतानाच दुसरीकडे दु:खही आहे. आतापर्यंत संधी का मिळाली नाही. याचे चिंतन समाजाने करावे. समाजाच्या एकजुटीमुळेच ही संधी मिळाली आहे. त्यासाठी भाजपा नेते नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांचा सिंहाचा वाटा आहे.
४त्यांच्यामुळेच आपण राज्यसभेवर गेलो असून, समाजाचा पहिला खासदार म्हणून मान मिळाला आहे. तेव्हा जोपर्यंत समाजाला आरक्षण मिळणार नाही. तोपर्यंत जाहीर सत्कार समारंभात सत्कार स्वीकारणार नसल्याचे खा. विकास महात्मे यांनी सांगत आपण आरक्षण घेणारच आहोत. त्यासाठी समाज बाधवांनी एकाजुटीने राहिले पाहिजे, असे आवाहनही डॉ. विकास महात्मे यांनी केले.