शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
6
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
7
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
8
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
9
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
10
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
11
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
12
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
13
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
14
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
15
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
16
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
17
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
18
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
19
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा

स्पर्धेच्या युगात संशोधनाशिवाय पर्याय नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 01:07 IST

जगभरातील स्पर्धेचा विचार केला तर या युगात उत्पादन आणि दर्जा वाढवायचा असेल तर संशोधनाशिवाय पर्याय नाही, असे मत यूपीटीयूचे माजी कुलगुरू डॉ. प्रेम व्रत यांनी आयसीएमआयई परिषद- २०१७ च्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जगभरातील स्पर्धेचा विचार केला तर या युगात उत्पादन आणि दर्जा वाढवायचा असेल तर संशोधनाशिवाय पर्याय नाही, असे मत यूपीटीयूचे माजी कुलगुरू डॉ. प्रेम व्रत यांनी आयसीएमआयई परिषद- २०१७ च्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले. जेएनईसी आणि आयआयआयईतर्फे (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ इंडस्ट्रीयल इंजिनिअरिंग) आयोजित दोन दिवसीय परिषदेला एमजीएम परिसरातील रुख्मिणी सभागृहात गुरुवारी सुरुवात झाली.उत्पादकता विकास आणि उत्पादनाचा दर्जा वाढविला तरच आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत आपण तग धरू शकतो. संशोधन आणि विकास या दोन मूलभूत घटकांकडे उद्योग आणि शिक्षण क्षेत्रांनी सहकार्याने प्रगती करणे गरजेचे आहे, असेही डॉ. व्रत म्हणाले.आयआयआयईचे संचालक डॉ. भास्कर भांडारकर म्हणाले, संशोधनातून देशाला प्रगतिपथावर न्यावे. संशोधन आणि विकासावर भर देण्याचे आवाहन त्यांनी केले.यावेळी एसएनडीटीच्या कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी, डॉ. आर. पी. मोहंती, एमजीएमचे सचिव अंकुशराव कदम, विश्वस्त प्राचार्य प्रताप बोराडे, आयआयआयई औरंगाबादचे सचिव डॉ. अभय कुलकर्णी, संयोजक डॉ. धनंजय डोळस आदींची उपस्थिती होती. डॉ. कुलकर्णी यांनी परिषदेच्या आयोजनाची भूमिका स्पष्ट केली. डॉ. डोळस यांनी कार्यक्रमाची रुपरेषा मांडली. औरंगाबादचे चेअरमन डॉ. सुधीर देशमुख यांनी स्वागत केले. प्रास्ताविक अस्मिता जोशी यांनी केले, तर आभार डॉ. एम. एस. कदम यांनी मानले. आयआयआयईच्या विविध पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. परिषदेसाठी अनुप गोयल, अरुण कुलकर्णी, प्रा. डॉ. एच. एच. शिंदे, डॉ. विजया मुसांडे यांनी परिश्रम घेतले.परिषदेनिमित्त ‘उत्पादकता विकास आणि त्या समोरील आव्हाने’ या संकल्पनेवर आंतरराष्ट्रीय संमेलन होत आहे. देशभरातील १५० शोधनिबंध या परिषदेसाठी निवडण्यात आले आहेत. परिषदेचा १५ सप्टेंबर रोजी समारोप होणार आहे.