शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

स्पर्धेच्या युगात संशोधनाशिवाय पर्याय नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 01:07 IST

जगभरातील स्पर्धेचा विचार केला तर या युगात उत्पादन आणि दर्जा वाढवायचा असेल तर संशोधनाशिवाय पर्याय नाही, असे मत यूपीटीयूचे माजी कुलगुरू डॉ. प्रेम व्रत यांनी आयसीएमआयई परिषद- २०१७ च्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जगभरातील स्पर्धेचा विचार केला तर या युगात उत्पादन आणि दर्जा वाढवायचा असेल तर संशोधनाशिवाय पर्याय नाही, असे मत यूपीटीयूचे माजी कुलगुरू डॉ. प्रेम व्रत यांनी आयसीएमआयई परिषद- २०१७ च्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले. जेएनईसी आणि आयआयआयईतर्फे (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ इंडस्ट्रीयल इंजिनिअरिंग) आयोजित दोन दिवसीय परिषदेला एमजीएम परिसरातील रुख्मिणी सभागृहात गुरुवारी सुरुवात झाली.उत्पादकता विकास आणि उत्पादनाचा दर्जा वाढविला तरच आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत आपण तग धरू शकतो. संशोधन आणि विकास या दोन मूलभूत घटकांकडे उद्योग आणि शिक्षण क्षेत्रांनी सहकार्याने प्रगती करणे गरजेचे आहे, असेही डॉ. व्रत म्हणाले.आयआयआयईचे संचालक डॉ. भास्कर भांडारकर म्हणाले, संशोधनातून देशाला प्रगतिपथावर न्यावे. संशोधन आणि विकासावर भर देण्याचे आवाहन त्यांनी केले.यावेळी एसएनडीटीच्या कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी, डॉ. आर. पी. मोहंती, एमजीएमचे सचिव अंकुशराव कदम, विश्वस्त प्राचार्य प्रताप बोराडे, आयआयआयई औरंगाबादचे सचिव डॉ. अभय कुलकर्णी, संयोजक डॉ. धनंजय डोळस आदींची उपस्थिती होती. डॉ. कुलकर्णी यांनी परिषदेच्या आयोजनाची भूमिका स्पष्ट केली. डॉ. डोळस यांनी कार्यक्रमाची रुपरेषा मांडली. औरंगाबादचे चेअरमन डॉ. सुधीर देशमुख यांनी स्वागत केले. प्रास्ताविक अस्मिता जोशी यांनी केले, तर आभार डॉ. एम. एस. कदम यांनी मानले. आयआयआयईच्या विविध पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. परिषदेसाठी अनुप गोयल, अरुण कुलकर्णी, प्रा. डॉ. एच. एच. शिंदे, डॉ. विजया मुसांडे यांनी परिश्रम घेतले.परिषदेनिमित्त ‘उत्पादकता विकास आणि त्या समोरील आव्हाने’ या संकल्पनेवर आंतरराष्ट्रीय संमेलन होत आहे. देशभरातील १५० शोधनिबंध या परिषदेसाठी निवडण्यात आले आहेत. परिषदेचा १५ सप्टेंबर रोजी समारोप होणार आहे.