शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
2
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
3
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
4
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
5
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
6
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
7
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
8
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
9
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
10
परीक्षेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थिनीने केली आत्महत्या; लातूरच्या शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या वसतिगृहात घेतला गळफास
11
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
12
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
13
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
14
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
15
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
16
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
17
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
18
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
19
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
20
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू

स्पर्धेच्या युगात संशोधनाशिवाय पर्याय नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 01:07 IST

जगभरातील स्पर्धेचा विचार केला तर या युगात उत्पादन आणि दर्जा वाढवायचा असेल तर संशोधनाशिवाय पर्याय नाही, असे मत यूपीटीयूचे माजी कुलगुरू डॉ. प्रेम व्रत यांनी आयसीएमआयई परिषद- २०१७ च्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जगभरातील स्पर्धेचा विचार केला तर या युगात उत्पादन आणि दर्जा वाढवायचा असेल तर संशोधनाशिवाय पर्याय नाही, असे मत यूपीटीयूचे माजी कुलगुरू डॉ. प्रेम व्रत यांनी आयसीएमआयई परिषद- २०१७ च्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले. जेएनईसी आणि आयआयआयईतर्फे (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ इंडस्ट्रीयल इंजिनिअरिंग) आयोजित दोन दिवसीय परिषदेला एमजीएम परिसरातील रुख्मिणी सभागृहात गुरुवारी सुरुवात झाली.उत्पादकता विकास आणि उत्पादनाचा दर्जा वाढविला तरच आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत आपण तग धरू शकतो. संशोधन आणि विकास या दोन मूलभूत घटकांकडे उद्योग आणि शिक्षण क्षेत्रांनी सहकार्याने प्रगती करणे गरजेचे आहे, असेही डॉ. व्रत म्हणाले.आयआयआयईचे संचालक डॉ. भास्कर भांडारकर म्हणाले, संशोधनातून देशाला प्रगतिपथावर न्यावे. संशोधन आणि विकासावर भर देण्याचे आवाहन त्यांनी केले.यावेळी एसएनडीटीच्या कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी, डॉ. आर. पी. मोहंती, एमजीएमचे सचिव अंकुशराव कदम, विश्वस्त प्राचार्य प्रताप बोराडे, आयआयआयई औरंगाबादचे सचिव डॉ. अभय कुलकर्णी, संयोजक डॉ. धनंजय डोळस आदींची उपस्थिती होती. डॉ. कुलकर्णी यांनी परिषदेच्या आयोजनाची भूमिका स्पष्ट केली. डॉ. डोळस यांनी कार्यक्रमाची रुपरेषा मांडली. औरंगाबादचे चेअरमन डॉ. सुधीर देशमुख यांनी स्वागत केले. प्रास्ताविक अस्मिता जोशी यांनी केले, तर आभार डॉ. एम. एस. कदम यांनी मानले. आयआयआयईच्या विविध पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. परिषदेसाठी अनुप गोयल, अरुण कुलकर्णी, प्रा. डॉ. एच. एच. शिंदे, डॉ. विजया मुसांडे यांनी परिश्रम घेतले.परिषदेनिमित्त ‘उत्पादकता विकास आणि त्या समोरील आव्हाने’ या संकल्पनेवर आंतरराष्ट्रीय संमेलन होत आहे. देशभरातील १५० शोधनिबंध या परिषदेसाठी निवडण्यात आले आहेत. परिषदेचा १५ सप्टेंबर रोजी समारोप होणार आहे.