शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

कापसाला भाव नाही, अवकाळी पावसाने पिके पडली; हतबल शेतकऱ्याने जीवन संपवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2023 19:43 IST

गंगापूर तालुक्यातील वाहेगाव येथील दुर्दैवी घटना

गंगापूर: कापसाला भाव नाही, त्यात अवकाळी पावसाने गहू, कांद्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. अपेक्षित उत्पन्न मिळणार नसल्याने आता कर्ज कसे फेडायचे या चिंतेतून एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. अशोक भिकाजी सिरसाठ (४७) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ही दुर्दैवी घटना गंगापूर तालुक्यातील वाहेगावा येथे बुधवारी (८) रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या दरम्यान घडली. 

वाहेगाव येथील रहिवासी असलेले अशोक सिरसाठ हे शेती व मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. त्यांच्याकडे असलेल्या शेतीपैकी एक एक्कर गहू तर अडीच एकर क्षेत्रावर कांदा आहे. शेतीसाठी त्यांनी खाजगी कर्ज काढले होते,कापूस पिकातून व गव्हाच्या उत्पादनातून सदरील कर्ज ते चुकते करणार होते. मात्र, कापसाला भाव मिळत नसल्याने अनेक दिवसांपासून पंधरा ते वीस क्विंटल कापूस घरात पडून होता. त्यात देणेकरांनी तगादा लावला होता. त्यामुळे अशोक सिरसाठ हे चिंतेत होते. कापसाचे अपेक्षित पैसे आले नाही तर कर्ज कसे चुकते करायचे याचा प्रश्न त्यांना भेडसावत होता. 

दरम्यान, रविवार व सोमवारी अवकाळी पावसाने शेतातील गव्हू व कांद्याचे पीक देखील आडवे पडले. यामुळे अशोक शिरसाठ पूर्णपणे खचले होते. कोणाशीही बोलत नव्हते. पत्नी व मुलाने त्यांची समजूत काढली होती. मात्र, बुधवारी (दि. ८) रात्री ते घरातून निघून गेले. कुटुंबीयांनी रात्रभर त्यांचा शोध घेतला मात्र ते कोठेही सापडले नाही. दुसऱ्या दिवशी गुरुवारी (दि. ९) सकाळी साडेसात वाजता त्यांच्या चुलत्याच्या शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत अशोक शिरसाठ यांचा मृतदेह आढळून आला. मृत शेतकऱ्याचा मुलगा जयदीप याने गंगापूर पोलिसांत याबाबत माहिती दिली. त्यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादfarmer suicideशेतकरी आत्महत्या