शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

कापसाला भाव नाही, अवकाळी पावसाने पिके पडली; हतबल शेतकऱ्याने जीवन संपवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2023 19:43 IST

गंगापूर तालुक्यातील वाहेगाव येथील दुर्दैवी घटना

गंगापूर: कापसाला भाव नाही, त्यात अवकाळी पावसाने गहू, कांद्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. अपेक्षित उत्पन्न मिळणार नसल्याने आता कर्ज कसे फेडायचे या चिंतेतून एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. अशोक भिकाजी सिरसाठ (४७) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ही दुर्दैवी घटना गंगापूर तालुक्यातील वाहेगावा येथे बुधवारी (८) रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या दरम्यान घडली. 

वाहेगाव येथील रहिवासी असलेले अशोक सिरसाठ हे शेती व मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. त्यांच्याकडे असलेल्या शेतीपैकी एक एक्कर गहू तर अडीच एकर क्षेत्रावर कांदा आहे. शेतीसाठी त्यांनी खाजगी कर्ज काढले होते,कापूस पिकातून व गव्हाच्या उत्पादनातून सदरील कर्ज ते चुकते करणार होते. मात्र, कापसाला भाव मिळत नसल्याने अनेक दिवसांपासून पंधरा ते वीस क्विंटल कापूस घरात पडून होता. त्यात देणेकरांनी तगादा लावला होता. त्यामुळे अशोक सिरसाठ हे चिंतेत होते. कापसाचे अपेक्षित पैसे आले नाही तर कर्ज कसे चुकते करायचे याचा प्रश्न त्यांना भेडसावत होता. 

दरम्यान, रविवार व सोमवारी अवकाळी पावसाने शेतातील गव्हू व कांद्याचे पीक देखील आडवे पडले. यामुळे अशोक शिरसाठ पूर्णपणे खचले होते. कोणाशीही बोलत नव्हते. पत्नी व मुलाने त्यांची समजूत काढली होती. मात्र, बुधवारी (दि. ८) रात्री ते घरातून निघून गेले. कुटुंबीयांनी रात्रभर त्यांचा शोध घेतला मात्र ते कोठेही सापडले नाही. दुसऱ्या दिवशी गुरुवारी (दि. ९) सकाळी साडेसात वाजता त्यांच्या चुलत्याच्या शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत अशोक शिरसाठ यांचा मृतदेह आढळून आला. मृत शेतकऱ्याचा मुलगा जयदीप याने गंगापूर पोलिसांत याबाबत माहिती दिली. त्यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादfarmer suicideशेतकरी आत्महत्या