शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
3
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
4
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
5
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
6
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
7
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
8
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
9
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
10
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
11
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
12
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
13
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
14
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
15
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
16
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
17
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
18
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
19
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
20
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 

कापसाला भाव नाही, अवकाळी पावसाने पिके पडली; हतबल शेतकऱ्याने जीवन संपवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2023 19:43 IST

गंगापूर तालुक्यातील वाहेगाव येथील दुर्दैवी घटना

गंगापूर: कापसाला भाव नाही, त्यात अवकाळी पावसाने गहू, कांद्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. अपेक्षित उत्पन्न मिळणार नसल्याने आता कर्ज कसे फेडायचे या चिंतेतून एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. अशोक भिकाजी सिरसाठ (४७) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ही दुर्दैवी घटना गंगापूर तालुक्यातील वाहेगावा येथे बुधवारी (८) रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या दरम्यान घडली. 

वाहेगाव येथील रहिवासी असलेले अशोक सिरसाठ हे शेती व मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. त्यांच्याकडे असलेल्या शेतीपैकी एक एक्कर गहू तर अडीच एकर क्षेत्रावर कांदा आहे. शेतीसाठी त्यांनी खाजगी कर्ज काढले होते,कापूस पिकातून व गव्हाच्या उत्पादनातून सदरील कर्ज ते चुकते करणार होते. मात्र, कापसाला भाव मिळत नसल्याने अनेक दिवसांपासून पंधरा ते वीस क्विंटल कापूस घरात पडून होता. त्यात देणेकरांनी तगादा लावला होता. त्यामुळे अशोक सिरसाठ हे चिंतेत होते. कापसाचे अपेक्षित पैसे आले नाही तर कर्ज कसे चुकते करायचे याचा प्रश्न त्यांना भेडसावत होता. 

दरम्यान, रविवार व सोमवारी अवकाळी पावसाने शेतातील गव्हू व कांद्याचे पीक देखील आडवे पडले. यामुळे अशोक शिरसाठ पूर्णपणे खचले होते. कोणाशीही बोलत नव्हते. पत्नी व मुलाने त्यांची समजूत काढली होती. मात्र, बुधवारी (दि. ८) रात्री ते घरातून निघून गेले. कुटुंबीयांनी रात्रभर त्यांचा शोध घेतला मात्र ते कोठेही सापडले नाही. दुसऱ्या दिवशी गुरुवारी (दि. ९) सकाळी साडेसात वाजता त्यांच्या चुलत्याच्या शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत अशोक शिरसाठ यांचा मृतदेह आढळून आला. मृत शेतकऱ्याचा मुलगा जयदीप याने गंगापूर पोलिसांत याबाबत माहिती दिली. त्यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादfarmer suicideशेतकरी आत्महत्या