शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

शहरात दिसत नाहीत कावळे अन् गाईला खाऊ देत नाहीत; पूर्वजांच्या नावाचे पिंड कोणाला द्यावे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2024 16:51 IST

पितृपक्ष असो वा श्राद्ध या काळात कावळ्यालाच का घास खाऊ घालतात? जाणून घ्या

छत्रपती संभाजीनगर : शहरात कावळे दुर्मीळ झाल्याने पूर्वजांच्या नावाने तयार केलेले पिंड कोणाला खाऊ घालायचे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. कावळे दिसेनासे झालेत आणि ते पिंड गाईला खाऊ घालू देत नाहीत. यामुळे सर्वांची पंचाईत झाली आहे.

पितृपक्ष पंधरवड्याला बुधवारपासून सुरुवात झाली. आपल्या पूर्वजांना पितृपक्षात जेवणाचे आमंत्रण दिले जाते. पूर्वजांना संतुष्ट करण्यासाठी तांदळाच्या भाताचे पिंड तयार करण्यात येते. त्यातील वैश्व देवाचा उरलेला भात (काकबली) कावळ्याला खाण्यासाठी दिला जातो. मात्र, शहरात कावळे नसल्याने पिंड गच्चीवर ठेवले जाते. मग त्यास अन्य पक्षी खातात. दुसरे पूर्वजांच्या नावाने तयार केलेले पिंड अनेकजण गाईला खाऊ घालतात. त्यामुळे गाईचे पोट खराब होते. त्या ऐवजी ते पिंड पाण्यात टाकावे. जलचर प्राणी ते खातात.

ब्राह्मण पुरोहित संघाचे अध्यक्ष विश्वास नागापूरकर गुरूजी यांनी सांगितले की, पर्याय म्हणून पूर्वजांच्या नावाचे पिंड घराच्या अंगणात जेथे रोप लावले आहे तेथे मातीत खड्डे खोदून त्यात ठेवावे व त्यावर माती टाकावी. ते मुंग्यांसारखे सूक्ष्म जीव खाऊन टाकतील.

दीड हजार पुरोहित करतात श्राद्धपक्षआजघडीला शहरात ३००० पुरोहित आहेत. त्यातील सुमारे दीड हजार पुरोहित श्राद्धपक्षाचा विधी करतात. जेवणासाठी एक किंवा दोन ब्राह्मण सोबत नेतात. पितृपक्ष पंधरवड्यात जेवणारे फार कमी असतात. यामुळे नोकरी करणारे किंवा सेवानिवृत्त झालेल्या ब्राह्मणांना न्यावे लागते.

कावळ्यालाच घास का?पितृपक्ष असो वा श्राद्ध या काळात कावळ्यालाच का घास खाऊ घालतात? यासंदर्भात नागापूरकर गुरुजी यांनी सांगितले की, वड व पिंपळ २४ तास शुद्ध हवा देणारे वृक्ष आहेत. या दोन्ही झाडांना जे अंकुर येतात ते कावळे खातात. त्या फळांचे मिश्रण पोटात तयार होऊन जी विष्टा तयार होते त्या विष्टेपासून वड, पिंपळ वृक्ष जमिनीत तयार होतात. हे केवळ कावळाच करू शकतो. पितृपक्ष हा कावळा मादींचा प्रजनन काळ आहे. म्हणून त्या मादीस चांगले पदार्थ खाण्यास मिळावे व पुढे कावळ्यांचा वंश वाढावा म्हणून त्यांना नैवेद्य देण्यात येतो.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSocialसामाजिक