शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

मराठवाड्यात अजूनही ३८ चारा छावण्या सुरू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 18:41 IST

मराठवाड्याला जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.

ठळक मुद्देसुरु छावण्यात २५ हजार जनावरे संपूर्ण भागात दमदार पावसाची प्रतीक्षा

औरंगाबाद : जुलै महिन्याचे १० दिवस संपले असून, मराठवाड्यात अजूनही ३८ चारा छावण्या सुरू आहेत. त्या छावण्यांमध्ये २५ हजार जनावरे आहेत. विभागाला जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. आजवर विभागात झालेल्या कमी-अधिक पावसामुळे छावण्यांतील जनावरे शेतकरी घेऊन जात आहेत. उर्वरित छावण्या बंद करण्यात आल्या आहेत.

मे अखेरपर्यंत विभागातील छावण्यांमध्ये पाच लाखांच्या आसपास जनावरे छावण्यांमध्ये होती. त्यात झपाट्याने घट होत गेली असून, २९ जून रोजी चारा छावण्यांमध्ये ६९ हजार जनावरे होती. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विभागात काही ठिकाणी पाऊस झाला. त्यामुळे छावण्यांतील जनावरांची संख्या घटली. सद्य:स्थितीमध्ये औरंगाबाद, परभणी, बीड आणि लातूर जिल्ह्यांतील ३८ चारा छावण्यांमध्ये २३ हजार ४७६ लहान, तर १ हजार ८१५ मोठे असे एकूण २५ हजार २९१ जनावरे आहेत. 

यंदा मान्सूनचे आगमन उशिरा झाले. पूर्व मान्सूनच्या हजेरीने काही विभागात काही ठिकाणची चाऱ्याची व्यवस्था झाली. जूनच्या मध्यानंतर बीड, औरंगाबाद व जालना जिल्ह्यांत झालेल्या पावसानंतर बहुतांश छावण्या बंद झाल्या. १५ दिवसांपासून हलक्या पावसाच्या सरी सुरू आहेत. त्यावरच शेतकरी पेरण्यांची कामे उरकत असून, छावण्यांमधील जनावरांच्या संख्येत त्यामुळे घट झाली. जालना जिल्ह्यातील सर्व चारा छावण्या बंद करण्यात आल्या आहेत. येत्या काळात जोरदार पाऊस झाल्यास विभागातील सर्व चारा छावण्या बंद होण्याची शक्यता आहे. जानेवारी २०१९ पासून चाराटंचाई सुरू होती. मार्च महिन्यापासून चाराटंचाई मोठ्या प्रमाणात जाणवू लागली. त्यामुळे चारा छावण्यांची संख्या वाढली. विभागात औरंगाबाद, जालना, बीड, परभणी आणि उस्मानाबादपैकी सर्वाधिक चाराटंचाई बीड जिल्ह्यामध्ये होती. 

टॅग्स :RainपाऊसMarathwadaमराठवाडाdroughtदुष्काळ