शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

...तर माझ्या मृत्यूला ठाकरे सरकार जबाबदार असेल; संतप्त एसटी कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा इशारा, व्हिडिओ व्हायरल

By सुमेध उघडे | Updated: February 23, 2021 17:54 IST

ST employee's suicide warning to State Government पांचाळ किरण अनिरुद्ध असे या कर्मचाऱ्याचे नाव असून ते औरंगाबाद येथील सिडको बस स्थानकामध्ये वाहक म्हणून कार्यरत आहेत.

ठळक मुद्देजानेवारी महिन्यात मुंबई नियुक्तीदरम्यान त्यांना कोरोना झाला कोरोना उपचारानंतर जॉईन झाल्यास त्यांना पुन्हा मुंबईला नियुक्ती देण्यात आली

औरंगाबाद : मुंबई येथे नियुक्तीदरम्यान कोरोना झाल्यानंतर एका एसटी कर्मचाऱ्यास रुजू झाल्यानंतर लागलीच पुन्हा एकदा मुंबई येथे नियुक्ती देण्यात आली आहे. या प्रकाराने संतप्त झालेल्या या कर्मचाऱ्याने थेट आत्महत्येची धमकी दिली आहे. हा कर्मचारी शहरातील सिडको बसस्थानकात वाहक म्हणून कार्यरत आहे. त्याने एका व्हिडिओच्या माध्यमातून, माझी कोरोनामधून बरे झाल्यानंतर पुन्हा मुंबईत जाण्याची मानसिकता नाही . वरिष्ठ माझे ऐकत नाहीत. याची दखल घेतली नाही तर मी आत्मदहन करेल, माझ्या मृत्यूला शिवसेना आणि हे सरकार जबाबदार असेल असे म्हटले आहे.  हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. 

पांचाळ किरण अनिरुद्ध असे या कर्मचाऱ्याचे नाव असून ते औरंगाबाद येथील सिडको बस स्थानकामध्ये वाहक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी व्हिडिओमध्ये सांगितल्यानुसार, जानेवारी महिन्यात ते मुंबई येथे नियुक्तीवर होते. त्यानंतर परत आल्यास त्यांना कोरोनाचे निदान झाले. उपचारानंतर ते १७ फेब्रुवारीस परत नोकरीवर जॉईन झाले. यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना पुन्हा मुंबई येथे नियुक्ती देण्यात आल्याचे कार्यालयाने सांगितले. मात्र, कोरोना आजारपणामधून बरे झाल्यानंतर लागलीच पुन्हा मुंबई येथे काम करण्याची मानसिकता नसल्याने त्यांनी आपली नियुक्ती रद्द करावी अशी विनंती वरिष्ठांना केली. परंतु, वरिष्ठांनी त्यांना मुंबईला जावेच लागेल असे सांगितले. यामुळे संतापलेल्या पांचाळ यांनी व्हिडिओद्वारे माझा मृत्यू झाला तर याला शिवसेना आणि सरकार जबाबदार असेल. माझी नियुक्ती रद्द झाली नाही तर मी आत्मदहन करेल असा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे. 

मृत्यूला ठाकरे सरकार जबाबदार असेल किरण पांचाळे यांच्या व्हायरल व्हिडिओ ते मी शिवसेनेच्या विचारांशी प्रभावित आहे. माझे वडील शिवसेनेचे काम करतात. मात्र, माझी मानसिकता नसताना मला पुन्हा मुंबईला नियुक्ती करण्यात येत आहे. ती रद्द करावी यासाठी माझी कोणीच मदत करत नाही असे म्हटले आहे. 'मला विश्वास आहे माझ्या ठाकरे सरकारवर ते मला न्याय देतील. मी खैरनार साहेब यांना दहा वेळा विनंती केली की, मला जायचे नाही. याची जर दखल घेतली नाही तर याला शिवसेना आणि आपले जे सरकार आहे ते जबाबदार राहील' असे ही म्हटले आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेstate transportएसटीAurangabadऔरंगाबाद