शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
2
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
3
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
4
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
5
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
6
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
7
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
8
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
9
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  
10
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
11
Smartphone Tips : बिघडण्याआधी तुमचा स्मार्टफोन देतो 'हे' संकेत! तुम्ही दुर्लक्ष तर करत नाही ना?
12
रासायनिक खतांचे दर नऊ वर्षांत ७५ टक्क्यांनी वाढले; शेतकऱ्यांचे मरण, उसाचा दर केवळ २२ टक्केच वाढला
13
गंभीर आजारांवर केवळ रेग्युलर प्लॅन पुरेसा नाही; 'क्रिटिकल इलनेस' कव्हरचे गणित समजून घ्या
14
IND vs AUS : क्रांतीनं झाकली हरमनप्रीतची मोठी चूक! स्टार्क बायकोला चीअर करायला आला, पण...
15
अमेरिकेचा भारताला दिलासा! चाबहार पोर्टवरील निर्बंधातून डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली सूट
16
लेकाच्या सिनेमात काम करणार का? शाहरुख खान म्हणाला, "त्याला परवडलं तर आणि..."
17
नारनौलमध्ये थरकाप उडवणारा अपघात, तरुणाचा मृतदेह तब्बल ११ किमीपर्यंत फरफटत गेला; दृष्य पाहून स्थानिकही सुन्न
18
Healthy Tea: चहा सोडायचाय? 'हा' घ्या उत्तम पर्याय; एकदा पावडर तयार करा, तीन महीने वापरा!
19
३ महिन्यांत ५० किलो वजन घटवा आणि थेट पोर्शे कार घेऊन घरी जा! जिमनं दिलं 'गोल्डन' चॅलेंज
20
कौतुकास्पद! आईची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुलाने 290 शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे कर्ज फेडले

...तर माझ्या मृत्यूला ठाकरे सरकार जबाबदार असेल; संतप्त एसटी कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा इशारा, व्हिडिओ व्हायरल

By सुमेध उघडे | Updated: February 23, 2021 17:54 IST

ST employee's suicide warning to State Government पांचाळ किरण अनिरुद्ध असे या कर्मचाऱ्याचे नाव असून ते औरंगाबाद येथील सिडको बस स्थानकामध्ये वाहक म्हणून कार्यरत आहेत.

ठळक मुद्देजानेवारी महिन्यात मुंबई नियुक्तीदरम्यान त्यांना कोरोना झाला कोरोना उपचारानंतर जॉईन झाल्यास त्यांना पुन्हा मुंबईला नियुक्ती देण्यात आली

औरंगाबाद : मुंबई येथे नियुक्तीदरम्यान कोरोना झाल्यानंतर एका एसटी कर्मचाऱ्यास रुजू झाल्यानंतर लागलीच पुन्हा एकदा मुंबई येथे नियुक्ती देण्यात आली आहे. या प्रकाराने संतप्त झालेल्या या कर्मचाऱ्याने थेट आत्महत्येची धमकी दिली आहे. हा कर्मचारी शहरातील सिडको बसस्थानकात वाहक म्हणून कार्यरत आहे. त्याने एका व्हिडिओच्या माध्यमातून, माझी कोरोनामधून बरे झाल्यानंतर पुन्हा मुंबईत जाण्याची मानसिकता नाही . वरिष्ठ माझे ऐकत नाहीत. याची दखल घेतली नाही तर मी आत्मदहन करेल, माझ्या मृत्यूला शिवसेना आणि हे सरकार जबाबदार असेल असे म्हटले आहे.  हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. 

पांचाळ किरण अनिरुद्ध असे या कर्मचाऱ्याचे नाव असून ते औरंगाबाद येथील सिडको बस स्थानकामध्ये वाहक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी व्हिडिओमध्ये सांगितल्यानुसार, जानेवारी महिन्यात ते मुंबई येथे नियुक्तीवर होते. त्यानंतर परत आल्यास त्यांना कोरोनाचे निदान झाले. उपचारानंतर ते १७ फेब्रुवारीस परत नोकरीवर जॉईन झाले. यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना पुन्हा मुंबई येथे नियुक्ती देण्यात आल्याचे कार्यालयाने सांगितले. मात्र, कोरोना आजारपणामधून बरे झाल्यानंतर लागलीच पुन्हा मुंबई येथे काम करण्याची मानसिकता नसल्याने त्यांनी आपली नियुक्ती रद्द करावी अशी विनंती वरिष्ठांना केली. परंतु, वरिष्ठांनी त्यांना मुंबईला जावेच लागेल असे सांगितले. यामुळे संतापलेल्या पांचाळ यांनी व्हिडिओद्वारे माझा मृत्यू झाला तर याला शिवसेना आणि सरकार जबाबदार असेल. माझी नियुक्ती रद्द झाली नाही तर मी आत्मदहन करेल असा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे. 

मृत्यूला ठाकरे सरकार जबाबदार असेल किरण पांचाळे यांच्या व्हायरल व्हिडिओ ते मी शिवसेनेच्या विचारांशी प्रभावित आहे. माझे वडील शिवसेनेचे काम करतात. मात्र, माझी मानसिकता नसताना मला पुन्हा मुंबईला नियुक्ती करण्यात येत आहे. ती रद्द करावी यासाठी माझी कोणीच मदत करत नाही असे म्हटले आहे. 'मला विश्वास आहे माझ्या ठाकरे सरकारवर ते मला न्याय देतील. मी खैरनार साहेब यांना दहा वेळा विनंती केली की, मला जायचे नाही. याची जर दखल घेतली नाही तर याला शिवसेना आणि आपले जे सरकार आहे ते जबाबदार राहील' असे ही म्हटले आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेstate transportएसटीAurangabadऔरंगाबाद