शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अवकाळी पावसाने नुकसानीसोबत फायदाही झाला; मराठवाड्यात रब्बीचा पेरा दुप्पटीने वाढला

By बापू सोळुंके | Updated: December 14, 2023 13:22 IST

आता कमी पावसावर येणारा हरभरा, शाळू ज्वारी, गहू, करडई इ. पिकांची पेरणी सुरू आहे.

छत्रपती संभाजीनगर : अत्यल्प पावसामुळे मागील हप्त्यापर्यंत छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या तीन जिल्ह्यांत रब्बी पिकांच्या पेरणीचे प्रमाण सरासरी २२ ते २५ टक्केच होते; मात्र मागील पंधरा दिवसांत मराठवाड्यात ठिकठिकाणी पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांनी रब्बी ज्वारी, हरभऱ्यासह अन्य पिकांच्या पेरणीला सुरुवात केल्याने पंधरा दिवसांत रब्बीचा पेरा दुप्पट झाल्याचे दिसून येते.

मराठवाड्यात पावसाळ्यात अत्यल्प पाऊस पडला. परिणामी, मराठवाड्यातील ६९ तालुक्यांतील ४२७ मंडळांतील खरीप हंगामातील पिके वाळून गेली होती. शासनानेही या तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची अग्रीम मदत देण्याची घोषणा केली होती. कमी पावसामुळे मराठवाड्यातील खरीप हंगामातील पिकांचे उत्पादन ५० टक्क्यांहून खाली आले आहे. पावसाळ्यात प्रार्थना करूनही पाऊस पडत नव्हता. आता मागील पंधरा दिवसांत मराठवाड्यातील अनेक कृषी मंडळांत मुसळधार अवकाळी पाऊस पडला. सोबत गारपीटही झाल्याने शेतीमालाचे नुकसान झाले; पण नुकसान झाले, तसा त्याचा काही प्रमाणात फायदाही झाल्याचे दिसून येते. जमिनीतील ओलावा वाढल्याचे लक्षात येताच शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांची पेरणी सुरू केली.

पंधरा दिवसांपूर्वी मराठवाड्यातील केवळ २२ टक्के क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली होती; मात्र आता कमी पावसावर येणारा हरभरा, शाळू ज्वारी, गहू, करडई इ. पिकांची पेरणी सुरू आहे. कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ९७ हजार हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली. ही सरासरी रब्बी हंगामातील पीकपेऱ्यांच्या ५० टक्के आहे. जालना जिल्ह्यात १ लाख ६,८९७ हेक्टरवर पेरणी झाली. जिल्ह्यातील सर्वसाधारण रब्बी क्षेत्राच्या ४९ टक्के आहे. बीड जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख ८६ हजार ५८६ हेक्टरवर पेरणी झाली. सरासरी क्षेत्राच्या ८६ टक्के क्षेत्रावर पेरणी झाल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते.

या पिकांना शेतकऱ्यांचे प्राधान्यगहू- ४९९०८ हेक्टररब्बी ज्वारी- २११४८० हेक्टरहरभरा- १७९९३१ हेक्टरमका- १७२७ हेक्टरइतर कडधान्ये- २५९१ हेक्टरजवस, करडई, तीळ इ. गळीत धान्ये- १६८२ हेक्टर

टॅग्स :AurangabadऔरंगाबादFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रMarathwadaमराठवाडा