शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाचा पारा वाढला! छत्रपती संभाजीनगरात दुपारी चार तासांसाठी सिग्नल बंद राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 14:32 IST

छत्रपती संभाजीनगरातील बहुतांश सिग्नल आता १०० सेकंदांपेक्षा अधिक वेळेचे आहे.

छत्रपती संभाजीनगर : दिवसेंदिवस वाढणाऱ्या तापमानामुळे दुपारी १२ ते ४ या दरम्यान शहरातील सर्व सिग्नल बंद ठेवण्याचे आदेश वाहतूक शाखेचे उपायुक्त शिलवंत नांदेडकर यांनी काढले आहे.

शहरात गेल्या काही दिवसांत तापमानाने चाळिशी ओलांडली आहे. गेल्या आठवड्याभरात ४२.४ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान पोहोचले. यामुळे उन्हात फिरणे देखील कठीण झाले आहे. त्यात शहरातील बहुतांश सिग्नल आता १०० सेकंदांपेक्षा अधिक वेळेचे आहे. त्यामुळे सूर्य आग ओकत असताना वाहनचालकांना सिग्नल लागल्यानंतर उभे राहणे अशक्य होत होते. ही बाब लक्षात घेत उपायुक्त नांदेडकर यांनी दुपारी १२ ते ४ या वेळेत सर्व सिग्नल बंद ठेवण्याचे आदेश दिले. या दरम्यान वाहतुकीचा खोळंबा न होण्यासाठी अंमलदारांनी काळजी घेऊन हजर राहण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत.

उष्णतेपासून संरक्षणासाठी खबरदारी घ्यावी, शक्यतो दुपारी १२ ते ३ या वेळेत घराबाहेर जाणे टाळावे. तहान लागली नसली तरी भरपूर पाणी प्यावे. प्रवास करताना पाण्याची बाटली, ओआरएस, ताक, लिंबूपाणी, लस्सी, फळांचे रस सोबत ठेवावे. हलक्या रंगाचे, पातळ सुती कपडे वापरावेत. डोके झाकण्यासाठी टोपी, छत्री यांचा वापर करावा. सूर्यप्रकाशात जाताना चप्पल किंवा बूट घालणे आवश्यक आहे. उन्हात जास्त वेळ राहणे टाळा; शक्यतो हवेशीर व थंड ठिकाणी वेळ घालवा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

टॅग्स :Heat Strokeउष्माघातchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरTrafficवाहतूक कोंडी