शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

उन्हाचा पारा वाढला! छत्रपती संभाजीनगरात दुपारी चार तासांसाठी सिग्नल बंद राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 14:32 IST

छत्रपती संभाजीनगरातील बहुतांश सिग्नल आता १०० सेकंदांपेक्षा अधिक वेळेचे आहे.

छत्रपती संभाजीनगर : दिवसेंदिवस वाढणाऱ्या तापमानामुळे दुपारी १२ ते ४ या दरम्यान शहरातील सर्व सिग्नल बंद ठेवण्याचे आदेश वाहतूक शाखेचे उपायुक्त शिलवंत नांदेडकर यांनी काढले आहे.

शहरात गेल्या काही दिवसांत तापमानाने चाळिशी ओलांडली आहे. गेल्या आठवड्याभरात ४२.४ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान पोहोचले. यामुळे उन्हात फिरणे देखील कठीण झाले आहे. त्यात शहरातील बहुतांश सिग्नल आता १०० सेकंदांपेक्षा अधिक वेळेचे आहे. त्यामुळे सूर्य आग ओकत असताना वाहनचालकांना सिग्नल लागल्यानंतर उभे राहणे अशक्य होत होते. ही बाब लक्षात घेत उपायुक्त नांदेडकर यांनी दुपारी १२ ते ४ या वेळेत सर्व सिग्नल बंद ठेवण्याचे आदेश दिले. या दरम्यान वाहतुकीचा खोळंबा न होण्यासाठी अंमलदारांनी काळजी घेऊन हजर राहण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत.

उष्णतेपासून संरक्षणासाठी खबरदारी घ्यावी, शक्यतो दुपारी १२ ते ३ या वेळेत घराबाहेर जाणे टाळावे. तहान लागली नसली तरी भरपूर पाणी प्यावे. प्रवास करताना पाण्याची बाटली, ओआरएस, ताक, लिंबूपाणी, लस्सी, फळांचे रस सोबत ठेवावे. हलक्या रंगाचे, पातळ सुती कपडे वापरावेत. डोके झाकण्यासाठी टोपी, छत्री यांचा वापर करावा. सूर्यप्रकाशात जाताना चप्पल किंवा बूट घालणे आवश्यक आहे. उन्हात जास्त वेळ राहणे टाळा; शक्यतो हवेशीर व थंड ठिकाणी वेळ घालवा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

टॅग्स :Heat Strokeउष्माघातchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरTrafficवाहतूक कोंडी