शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

शहरातील बड्या हॉटेल्सच्या नळ कनेक्शनची होणार तपासणी; प्रभारी प्रशासक चव्हाण यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 19:34 IST

जायकवाडी धरणातून १३५ ते १४० एमएलडी इतका पाणीउपसा होतो.

औरंगाबाद : जायकवाडी ते नक्षत्रवाडी व तेथून पुढे शहरात येणाऱ्या मुख्य जलवाहिनीवरून ज्यांना नळजोडण्या दिल्या आहेत, अशा सुमारे एक ते दीड हजार नळधारकांना वॉटरमीटर बसविण्यात येणार असल्याचे प्रभारी महापालिका प्रशासक तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सोमवारी सांगितले.

महापालिकेचे नियमित प्रशासक रजेवर गेल्यामुळे चव्हाण यांच्याकडे पदभार आहे. त्यांनी पाणीपुरवठ्यातील अडचणी, उपाययोजना, टँकरने होणारा पाणीपुरवठा, विहिरींचे अधिग्रहण याबाबत आढावा बैठक घेतली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले, मुख्य जलवाहिनीवरून १० ते १२ तास पाणीपुरवठा सुरू असतो. या जलवाहिनीवरून ज्यांनी नळ घेतलेले आहेत, त्यांना मीटर बसविण्यात येईल. जेवढे पाणी वापरतील, तेवढे पैसे त्यांना द्यावे लागतील. तसेच मोठ्या हॉटेलधारकांच्या नळ कनेक्शनची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. सध्या ५ दिवसांआड पाणीपुरवठा होतो आहे, त्यात बदल करण्याबाबत रविवारी चर्चा केली. शहराची पाण्याची गरज २०० एमएलडीच्या पुढे आहे.

मुख्य जलवाहिनीतून ढोरकीन, इसारवाडी, धनगाव या गावांना पाणीपुरवठा होतो. या जोडण्यांना मीटर लावण्यात आले आहेत. या गावांना दोन दिवसांआड पाणीपुरवठा सुरू आहे. फारोळा शुद्धीकरण केंद्रातून कृष्णपूरला ४० हजार लीटर पाणी दर दोन दिवसांआड पुरविण्यात येते. त्यावर नियंत्रण करण्याचे आदेश देण्यात आल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

सध्या शहराला मिळणारे पाणी असेजायकवाडी धरणातून १३५ ते १४० एमएलडी इतका पाणीउपसा होतो.फारोळा येथून शुद्ध होऊन १२५ एमएलडी पाणी सिडको व शहरासाठी जाते.८५ टँकरद्वारे ४०० खेपा करून ३ एमएलडी पाणीपुरवठा होतो.एन-१ येथील एमआयडीसी पंपगृहातून सुमारे २.२५ एमएलडी पाणी मिळते.मगरबी कम्पाउंड जहाँगीर कॉलनीतील २ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.हर्सूल तलावातून ७.५ एमएलडी, नहरीतून ०.७ एमएमडी पाणी मिळते.शहरासाठी सर्व मिळून १३६.१५ एमएलडी पाणी आणले जाते.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी