शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

प्रेमविवाह केलेल्या युवकाची आत्महत्या; सासर-माहेरपासून दुरावलेल्या तिचे काय होणार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 13:00 IST

वाढत्या कर्जाने तणावाखाली असलेला तरुण पत्नीला आपण सोबत आत्महत्या करू, असे नेहमी म्हणायचा.

औरंगाबाद : प्रेमविवाह केलेल्या युवकाने आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याची घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे प्रेमकहाणीचा दु:खद अंत झाला. ही घटना संजयनगर भागात घडली. या प्रकरणी जिन्सी ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

शुभम केशवराव घुगे (२६, रा. लिंबाळा, ता. जिंतूर, जि. परभणी ह.मु. संजयनगर गल्ली नंबर ३) असे मृत युवकाचे नाव आहे. शुभम पुण्यात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असतानाच त्याचे अभियांत्रिकीचा डिप्लोमा करीत असलेल्या एका मुलीसोबत प्रेमसंबंध जुळले. दोघांचे धर्म वेगळे असल्यामुळे दोन्ही कुटुंबांचा विरोध होता. मुलीला १८ वर्षे पूर्ण होण्यास दोन महिने कमी असल्यामुळे त्याच्या विरोधात पुण्यातील एका ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. मात्र, मुलीला १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्याने औरंगाबादेत २०१७ साली आर्य समाज पद्धतीने विवाह केला. त्यास एका मोठ्या ज्वेलरीच्या दुकानात नोकरीही लागली होती. 

कोरोनाच्या काळात ही नोकरी गेली. तीन वर्षांपासून तो संजयनगरमध्ये राहत होता. गावाकडे येऊ देत नसल्यामुळे मित्रांकडून उसने पैसे घेऊन कसेतरी दोघे दिवस काढत होते. यातून त्याला प्रचंड निराशा आली होती. रविवारी दुपारी पत्नी झोपेत असताना त्याने घरातच गळफास घेतला. पत्नी उठल्यानंतर शुभमने गळफास घेतल्याचे तिला दिसले. पोलिसांना कळविण्यात आले. घाटीत नेल्यानंतर डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. अधिक तपास हवालदार ध्रुवराज गोर्डे करीत आहेत.

तिचे काय होणार?वाढत्या कर्जाने शुभम तणावाखाली होता. पत्नी शुभांगीला तो आपण सोबत आत्महत्या करू, असे नेहमी म्हणायचा. मात्र पत्नी त्याला धीर देत होती. हे दिवस निघून जातील, असे ती त्याला वारंवार सांगायची. मात्र शुभमनेच आत्महत्या करीत धीर सोडला. आता शुभांगीचा पतीच राहिला नसल्यामुळे तिला सासर आणि माहेरचे नातेवाईक स्वीकारणार का, हा प्रश्न आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूAurangabadऔरंगाबाद