शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

वडिलांच्या डोळ्यादेखत मुलगा काशीद समुद्रात बुडाला; सहलीतील दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 12:46 IST

तीन जणांना वाचविण्यात यश : औरंगाबादच्या कन्नड येथील सहल, रायगड जिल्ह्यातील काशिद समुद्रातील दुर्घटना

कन्नड/अलिबाग : कन्नड शहरातील साने गुरुजी शाळेतून गेलेल्या सहलीतील पाचजण रायगड जिल्ह्यातील काशिद समुद्रात बुडाले. त्यातील तीन जणांना वाचविण्यात यश आले; मात्र दोन जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान घडली. प्रणव सजन कदम (वय १५) व रोहन बेडवाल (वय १५) अशी मयत मुलांची नावे आहेत.

शहरातील साने गुरुजी शाळेतील इयत्ता दहावीत शिकणाऱ्या ४१ मुली व ३९ मुलांचा समावेश असलेली सहल कन्नड आगाराच्या दोन बसने शुक्रवारी (दि. ६) रात्री ८ वाजता मोरगाव, जेजुरी, लोणावळा, खंडाळा, प्रतापगड, रायगड, मुरुड जंजीरा, काशिद, पाली या मार्गासाठी गेली होती. मुरुड जंजिरा पर्यटनस्थळ पाहून ही सहल सोमवारी दुपारी काशिद येथे आली. यावेळी विद्यार्थी खेळण्यासाठी समुद्राच्या पाण्यात उतरले. अचानक आलेल्या लाटेत प्रणव सजन कदम, रोहन बेडवाल, कृष्णा विजय पाटील (वय १५), तुषार हरिभाऊ वाघ (वय १५) व रोहन दिलीप महाजन (वय १५) हे पाच विद्यार्थी पाण्यात बुडाले. हे लक्षात येताच एकच गोंधळ उडाला.

यावेळी मुख्याध्यापक धैर्यशील केरे व जीव रक्षकांनी धाव घेऊन यातील तीन जणांना बाहेर काढले. मात्र, प्रणव कदम व रोहन बेडवाल हे पाण्यात दूरवर जाऊन दिसेनासे झाले. थोड्याच वेळात प्रणवचा मृतदेह सापडला, तर तासाभराच्या शोधानंतर रोहन बेडवाल याचा मृतदेह सापडला. नाका तोंडात पाणी गेल्याने जखमी झालेल्या कृष्णा पाटील, तुषार वाघ व रोहन महाजन यांच्यावर अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. ही घटना पाहून सायली मनोज राठोड (वय १५) या विद्यार्थिनीला धक्का बसल्याने तिलाही रुग्णालयात दाखल करावे लागले. या घटनेमुळे सहलीतील मुले-मुली भेदरले होते. तर शिक्षकही तणावाखाली होते. काशिदवरून पालीच्या गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर सहल परत फिरणार होती. तत्पूर्वीच ही दुर्घटना घडल्याने शोककळा पसरली. घटनेची माहिती मिळताच सहलीला गेलेल्या विद्यार्थ्यांचे पालक चिंतातुर झाले होते. प्रत्येकजण आपला मुलगा सुरक्षित आहे का याची चौकशी करीत होते.

मयत प्रणवचे वडीलही होते सोबतसमुद्रात बुडून मयत झालेल्या प्रणव कदमचे वडील सजन कदम हे साने गुरुजी शाळेत शिपाई आहेत. प्रणव हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता. या विद्यार्थ्यांबरोबर ते सुद्धा या सहलीबरोबर गेलेले होते. डोळ्यादेखत मुलगा बुडाल्याने त्यांच्या दु:खाला पारावार राहिला नाही. प्रणवच्या पश्चात आई-वडील, बहीण असा परिवार आहे, तर मयत रोहन बेडवाल याचे वडील शेतकरी असून, त्याच्या पश्चात आई-वडील आणि भाऊ आहे.

विद्यार्थ्यांना नाश्ताही दिला नव्हतामुरुड येथून काशीद समुद्रावर विद्यार्थ्यांना शिक्षकांनी पर्यटनास आणले. मात्र, या विद्यार्थ्यांना नाश्ताही दिला नव्हता, अशी माहितीही समोर आली आहे. घटना घडल्यानंतर विद्यार्थ्यांना रुग्णालयात आणले असता, विद्यार्थी भुकेले असल्याने त्यांना अस्वस्थ वाटत होते.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDeathमृत्यूalibaugअलिबाग