शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांच्या डोळ्यादेखत मुलगा काशीद समुद्रात बुडाला; सहलीतील दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 12:46 IST

तीन जणांना वाचविण्यात यश : औरंगाबादच्या कन्नड येथील सहल, रायगड जिल्ह्यातील काशिद समुद्रातील दुर्घटना

कन्नड/अलिबाग : कन्नड शहरातील साने गुरुजी शाळेतून गेलेल्या सहलीतील पाचजण रायगड जिल्ह्यातील काशिद समुद्रात बुडाले. त्यातील तीन जणांना वाचविण्यात यश आले; मात्र दोन जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान घडली. प्रणव सजन कदम (वय १५) व रोहन बेडवाल (वय १५) अशी मयत मुलांची नावे आहेत.

शहरातील साने गुरुजी शाळेतील इयत्ता दहावीत शिकणाऱ्या ४१ मुली व ३९ मुलांचा समावेश असलेली सहल कन्नड आगाराच्या दोन बसने शुक्रवारी (दि. ६) रात्री ८ वाजता मोरगाव, जेजुरी, लोणावळा, खंडाळा, प्रतापगड, रायगड, मुरुड जंजीरा, काशिद, पाली या मार्गासाठी गेली होती. मुरुड जंजिरा पर्यटनस्थळ पाहून ही सहल सोमवारी दुपारी काशिद येथे आली. यावेळी विद्यार्थी खेळण्यासाठी समुद्राच्या पाण्यात उतरले. अचानक आलेल्या लाटेत प्रणव सजन कदम, रोहन बेडवाल, कृष्णा विजय पाटील (वय १५), तुषार हरिभाऊ वाघ (वय १५) व रोहन दिलीप महाजन (वय १५) हे पाच विद्यार्थी पाण्यात बुडाले. हे लक्षात येताच एकच गोंधळ उडाला.

यावेळी मुख्याध्यापक धैर्यशील केरे व जीव रक्षकांनी धाव घेऊन यातील तीन जणांना बाहेर काढले. मात्र, प्रणव कदम व रोहन बेडवाल हे पाण्यात दूरवर जाऊन दिसेनासे झाले. थोड्याच वेळात प्रणवचा मृतदेह सापडला, तर तासाभराच्या शोधानंतर रोहन बेडवाल याचा मृतदेह सापडला. नाका तोंडात पाणी गेल्याने जखमी झालेल्या कृष्णा पाटील, तुषार वाघ व रोहन महाजन यांच्यावर अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. ही घटना पाहून सायली मनोज राठोड (वय १५) या विद्यार्थिनीला धक्का बसल्याने तिलाही रुग्णालयात दाखल करावे लागले. या घटनेमुळे सहलीतील मुले-मुली भेदरले होते. तर शिक्षकही तणावाखाली होते. काशिदवरून पालीच्या गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर सहल परत फिरणार होती. तत्पूर्वीच ही दुर्घटना घडल्याने शोककळा पसरली. घटनेची माहिती मिळताच सहलीला गेलेल्या विद्यार्थ्यांचे पालक चिंतातुर झाले होते. प्रत्येकजण आपला मुलगा सुरक्षित आहे का याची चौकशी करीत होते.

मयत प्रणवचे वडीलही होते सोबतसमुद्रात बुडून मयत झालेल्या प्रणव कदमचे वडील सजन कदम हे साने गुरुजी शाळेत शिपाई आहेत. प्रणव हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता. या विद्यार्थ्यांबरोबर ते सुद्धा या सहलीबरोबर गेलेले होते. डोळ्यादेखत मुलगा बुडाल्याने त्यांच्या दु:खाला पारावार राहिला नाही. प्रणवच्या पश्चात आई-वडील, बहीण असा परिवार आहे, तर मयत रोहन बेडवाल याचे वडील शेतकरी असून, त्याच्या पश्चात आई-वडील आणि भाऊ आहे.

विद्यार्थ्यांना नाश्ताही दिला नव्हतामुरुड येथून काशीद समुद्रावर विद्यार्थ्यांना शिक्षकांनी पर्यटनास आणले. मात्र, या विद्यार्थ्यांना नाश्ताही दिला नव्हता, अशी माहितीही समोर आली आहे. घटना घडल्यानंतर विद्यार्थ्यांना रुग्णालयात आणले असता, विद्यार्थी भुकेले असल्याने त्यांना अस्वस्थ वाटत होते.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDeathमृत्यूalibaugअलिबाग