शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

रेणुकादेवी शरद कारखान्याची सूत्रे पुन्हा संदीपान भुमरेंच्या हातात; १४ संचालक बिनविरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2023 19:22 IST

रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारखाना निवडणूक; मविआच्या १० उमेदवारांचे अर्ज ठरले अवैध

पैठण: उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्याच्या  निर्णयास आव्हान देणारा अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळल्याने रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारखाना निवडणुकीत पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या गटाचे १४ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी मुकेश बारहाते यांनी याबाबत बुधवारी अधिकृत घोषणा केली आहे.

रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी भरलेले महाविकास आघाडी गटाचे १० उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी मुकेश बारहाते यांनी अवैध ठरविले होते. या निर्णया विरोधात साखर आयुक्तांकडे या दहा उमेदवारांनी दाद मागितली तेथेही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय योग्य ठरविण्यात आला. यामुळे न्यायालयात हे प्रकरण दाखल करण्यात आले. निवडणूक प्रक्रिया पुढे सरकल्याने न्यायालय यात हस्तक्षेप करू शकत नाही असे मत मांडून उमेदवारांचा अर्ज उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावला. यामुळे १४ संचालकांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला होता.

दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नितीन तांबे, ब्रम्हदेव नरके व भिमराव वाकडे (टाकळी अंबड गट). अक्षय डुकरे, दिलीप बोडखे व अफसर शेख ( विहामांडवा गट). सुभाष गोजरे, अमोल थोरे, नंदू पठाडे ( चौंढाळा गट). सुभाष चावरे, भरत तवार व विलास भुमरे ( कडेठाण गट). सहकारी संस्था मतदार संघातून राजूनाना भुमरे व अनुसूचित जाती जमाती मतदार संघातून कल्याण धायकर हे १४ उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे घोषित केले. दरम्यान हे सर्व उमेदवार पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या गटाचे आहेत. १४ संचालक बिनविरोध झाल्याने आता सात संचालकाच्या निवडीसाठी निवडणूक होणार आहे. दहा उमेदवार अवैध ठरल्यानंतरही निवडणूक ताकतीने लढू असे महाविकास आघाडीचे दत्ता गोर्डे यांनी सांगितले. रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारखान्याच्या सात संचालकाच्या निवडीसाठी दि २५ जून रोजी मतदान घेण्यात येणार असून १४ उमेदवार रिंगणात आहेत.

टॅग्स :Sandipan Bhumreसंदीपान भुमरेAurangabadऔरंगाबादSugar factoryसाखर कारखाने