शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

संकटांची मालिका सुरूच! छत्रपती संभाजीनगराला येणारे लाखो लिटर पाणी रस्त्यावरून शेतात

By विकास राऊत | Updated: April 12, 2024 11:20 IST

ढोरकीनजवळ मुख्य जलवाहिनी फुटल्याने पुन्हा एकदा शहरावर जलसंकट आले आहे

छत्रपती संभाजीनगर : शहराच्या पाणीपुरवठ्याचे संकट काही केल्या कमी होत नाही. जलवाहिन्या जीर्ण झाल्यामुळे वारंवार फुटत आहे. तर, कधी वीजपुरवठा खंडित होत आहे. जलवाहिन्यांना गळती लागण्यामुळेही पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. पैठण रोडवरील ढोरकीनजवळील १२०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी गुरुवारी फुटल्यामुळे शहर पाणीपुरवठा विस्कळीत झाला. शुक्रवारी सकाळपर्यंत जलवाहिनी दुरुस्त करण्यासाठी महापालिकेच्या यंत्रणा युद्धपातळीवर कामास लागली.

जायकवाडी पंपगृह वीजपुरवठा गुरुवारी सायंकाळी पाच मिनिटांसाठी खंडित झाला. वीजपुरवठा सुरळीत होताच, मुख्य जलवाहिनीमधील पाण्याचा दाब वाढल्याने जलवाहिनी फुटल्याचे सांगण्यात आले. जलवाहिनीतून मोठ्या दाबाने बाहेर आलेले लाखो लिटर पाणी रस्त्यावरून शेतात शिरले. मनपाने तातडीने पाणीपुरवठा बंद केला. परिणामी एक दिवसाने पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पुढे ढकलले आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ७०० आणि १२०० मि.मी.च्या जलवाहिन्यांची वहन क्षमता संपली आहे. त्यामुळे जलवाहिन्या वारंवार फुटून शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होतो आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी शहरातील अंतर्गत जलवाहिनी दोन ठिकाणी फुटली. त्यानंतर जायकवाडी पंपगृहाचा वीजपुरवठा खंडित झाल्याने अनेक वसाहतींना पाणीपुरवठा झाला नाही. जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी एक दिवस गेला. हे शुक्लकाष्ट संपत नाही तोवर गुरुवारी १२०० मि.मी. जलवाहिनीचे वेल्डिंग निखळून ती फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. अर्धा तास पाणी रस्त्यावरून शेतात जात होते. पाण्यामुळे रस्त्यावर सर्वत्र चिखल होऊन वाहतूकही ठप्प झाली. जलवाहिनी फुटल्याची माहिती मिळताच पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता के.एम. फालक तातडीने ढोरकीनकडे रवाना झाले.

पाणीपुरवठ्यासाठी तारेवरची कसरत...शहरातील सिडको-हडको, शिवाजीनगर व इतर भागाला १२०० मि.मी. जलवाहिनीतून पाणीपुरवठा होतो. जलवाहिनी फुटल्याने या भागातील काही टप्पे एक दिवसाने पुढे ढकलले जाणार आहेत. ७०० आणि ९०० मि.मी.च्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा करण्याचे मनपाने नियोजन केले आहे. पाणीपुरवठ्यासाठी मनपाची तारेवरची कसरत सुरू आहे.

दुरुस्तीसाठी १५ तास लागणार...जलवाहिनीचे वेल्डिंग गळून गेल्याने ती फुटल्याचा अंदाज आहे. जलवाहिनी कोरडी होण्यास सहा ते सात लागले, त्यानंतर दुरुस्ती सुरू झाली. दुरुस्तीसाठी १५ तास लागणे शक्य आहे. जुन्या शहराला ७०० च्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा होत असल्याने ९०० मि.मी.च्या जलवाहिनीतून काही भागाला पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न असल्याचे अभियंता फालक यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी