शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
4
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
5
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
6
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
7
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
8
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
9
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
10
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
11
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
12
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
13
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
14
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
15
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
16
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
17
Man-Animal Conflict: "आमचं सरकार तुमच्या प्रत्येक दुःखात सोबत", मुख्यमंत्री योगींचे पीडितांना आश्वासन
18
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
19
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
20
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो

हर्सूलमधील रस्ता ६० मीटर रुंद होणार, रुंदीकरणाविरोधातील याचिका खंडपीठाकडून निकाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 14:07 IST

कारवाई मंजूर विकास आराखड्यानुसार जागा मोकळी करण्याची

छत्रपती संभाजीनगर : हर्सूल येथील रस्ता ६० मीटर रुंद करण्यासंदर्भात महापालिकेच्या वतीने करण्यात आलेली घोषणा आणि बाधित करणाऱ्या मालमत्ता हटविण्यासंदर्भातील आवाहनाविरुद्ध दाखल याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. मनीष पितळे आणि न्या. वाय जी. खोब्रागडे यांनी महापालिकेचे या संदर्भातील म्हणणे स्वीकारून मंगळवारी निकाली काढल्या.

मनपाची कारवाई मालमत्ता ताब्यात घेण्याची नसून मंजूर विकास आराखड्यानुसार ६० मीटर जागा मोकळी करण्याची आहे. त्यामुळे मोबदल्याचा विषयच येत नाही. भविष्यात रस्ता तयार करताना काही मालमत्तांची आवश्यकता भासल्यास मनपा रीतसर भूसंपादन प्रक्रिया करील, असे म्हणणे ॲड. संभाजी टोपे यांनी मांडले.

काय होती याचिका ?संदीप भगुरे आणि इतर १५ लोकांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटल्यानुसार, एनएचएआयने धुळे-सोलापूर रस्ता रुंदीकरण करताना येथे भूसंपादन केलेले आहे. त्या वेळी सक्षम प्राधिकाऱ्यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केलेली होती. असे असताना मनपाने ६० मीटर रस्त्याची घोषणा करून यात येणाऱ्या मालमत्ता काढून घेण्याची घोषणा केली. आमच्याकडे शासनाचे मालमत्तापत्रक आहे. जी २० परिषदेवेळी रस्ता रुंदीकरणानंतर मोबदला मिळाला होता. आता अतिक्रमण काढण्यासाठीची सूचना दिल्याने आमच्या मालमत्ता बाधित होत आहेत. मनपाने कायदेशीर भूसंपादन करून मोबदला द्यावा, मगच कारवाई करावी, अशी विनंती याचिकेत होती.

मनपातर्फे युक्तिवादमहापालिकेच्या वतीने ॲड. टोपे म्हणाले की, अजिंठ्यासारख्या जागतिक दर्जाच्या पर्यटनस्थळाला जाण्यासाठी तसेच मराठवाडा आणि खान्देशाला जोडणारा हाच रस्ता आहे. तो मोठा करणे अत्यंत आवश्यक आहे. १९८२ मध्ये महापालिका अस्तित्वात आल्यानंतरच्या पहिल्या मंजूर विकास आराखड्यात तसेच २००२ च्या आणि आता मंजूर केलेल्या विकास आराखड्यातही हा रस्ता ६० मीटरचाच आहे. याच्या रचनेतही (अलाईनमेंट) बदल केलेला नाही.

बांधकाम परवाना असलेल्या एकाने मावेजाची विनंती केली. मनपा अधिनियम २६३ नुसार बांधकाम झाल्यानंतर एक महिन्यात भोगवटा प्रमाणपत्र घेणे आवश्यक असते. ही जबाबदारी बांधकाम करणाऱ्याची असते. ते घेतले नसल्याने कारवाईस कोणताही प्रतिबंध नाही. यावर ताब्यावेळी प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश खंडपीठाने दिले.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरEnchroachmentअतिक्रमण