शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

भावी जवानांचे हाल, अग्निवीर भरतीसाठी आलेले तरुण उपाशी; 10 रुपयांची पाणीबॉटल 30 रुपयाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2022 14:58 IST

अग्नीवीर भरतीसाठी औरंगाबाद शहरामध्ये आलेल्या तरुणांचे अतोनात हाल सुरू असल्याचा प्रकार समोर आलेला आहे.

औरंगाबाद - केंद्रीय संरक्षण दलाने नुकत्याच जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेअंर्गत सैन्य भरती लवकरच सुरु होत आहे. औरंगाबादमध्ये अग्निपथ (Agnipath) योजनेअंतर्गत अग्नीवीरांचीही भरती केली जात आहे. त्यानुसार, 13 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत पात्र तरुणांची निवड केली जाईल. या भरतीत औरंगाबाद, बुलडाणा, हिंगोली, जालना, नांदेड, परभणी आणि जळगाव या जिल्ह्यांतील तरुण सहभागी होण्यासाठी औरंगाबाद येथे पोहोचले आहेत. मात्र, येथे आलेल्या उमेदवारांची, भावी जवानांची मोठी ससेहेलपाट होताना दिसत आहे. ना खायला अन्न, ना प्यायला पाणी, झोपायलाही आसरा नाही. त्यामुळे, या भरतीच्या विद्यार्थ्यांन मोठा त्रास सहन करावा लागत आहे. 

अग्नीवीर भरतीसाठी औरंगाबाद शहरामध्ये आलेल्या तरुणांचे अतोनात हाल सुरू असल्याचा प्रकार समोर आलेला आहे. शहरातल्या विद्यापीठाच्या मैदानावर अग्निवीरांची भरती सुरू आहे. त्यासाठी संपूर्ण मराठवाड्यातून तरुणांची अलोट गर्दी लोटली आहे. मात्र, या तरुणांना ना राहण्याची, ना खाण्याची, ना पिण्याच्या पाण्याची सोय आहे. याउलट मुलांना 10 रुपयांची पाण्याची बॉटल 30 रुपयाला घ्यावी लागल्याने युवकांनी संताप व्यक्त केला आहे. त्यामुळेच, रस्त्यावरती मिळेल तिथे हे तरुण झोपलेले आपल्याला पाहायला मिळतात. भावी जवानांचे सुरू असलेले हाल आता सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. 

भविष्यात देश ज्यांच्या हातात सुरक्षित राहणार आहे, अशा तरुणांना रात्रभर रोडवर झोपून, न पाणी पिता आणि न काही खाता राहावे लागत आहे. विशेष म्हणजे काही युवकांना रात्री एक ते दीड वाजेच्या दरम्यान भरती प्रक्रियेला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे, युवकांकडून तीव्र संतापही व्यक्त होत आहे. तर, प्रशासनाच्या ढिसाळ आणि नियोजनशुन्य कारभारावर प्रश्नचिन्ह उभा राहिले आहे.

टॅग्स :Agneepath Schemeअग्निपथ योजनाAurangabadऔरंगाबादIndian Armyभारतीय जवान