शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

भावी जवानांचे हाल, अग्निवीर भरतीसाठी आलेले तरुण उपाशी; 10 रुपयांची पाणीबॉटल 30 रुपयाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2022 14:58 IST

अग्नीवीर भरतीसाठी औरंगाबाद शहरामध्ये आलेल्या तरुणांचे अतोनात हाल सुरू असल्याचा प्रकार समोर आलेला आहे.

औरंगाबाद - केंद्रीय संरक्षण दलाने नुकत्याच जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेअंर्गत सैन्य भरती लवकरच सुरु होत आहे. औरंगाबादमध्ये अग्निपथ (Agnipath) योजनेअंतर्गत अग्नीवीरांचीही भरती केली जात आहे. त्यानुसार, 13 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत पात्र तरुणांची निवड केली जाईल. या भरतीत औरंगाबाद, बुलडाणा, हिंगोली, जालना, नांदेड, परभणी आणि जळगाव या जिल्ह्यांतील तरुण सहभागी होण्यासाठी औरंगाबाद येथे पोहोचले आहेत. मात्र, येथे आलेल्या उमेदवारांची, भावी जवानांची मोठी ससेहेलपाट होताना दिसत आहे. ना खायला अन्न, ना प्यायला पाणी, झोपायलाही आसरा नाही. त्यामुळे, या भरतीच्या विद्यार्थ्यांन मोठा त्रास सहन करावा लागत आहे. 

अग्नीवीर भरतीसाठी औरंगाबाद शहरामध्ये आलेल्या तरुणांचे अतोनात हाल सुरू असल्याचा प्रकार समोर आलेला आहे. शहरातल्या विद्यापीठाच्या मैदानावर अग्निवीरांची भरती सुरू आहे. त्यासाठी संपूर्ण मराठवाड्यातून तरुणांची अलोट गर्दी लोटली आहे. मात्र, या तरुणांना ना राहण्याची, ना खाण्याची, ना पिण्याच्या पाण्याची सोय आहे. याउलट मुलांना 10 रुपयांची पाण्याची बॉटल 30 रुपयाला घ्यावी लागल्याने युवकांनी संताप व्यक्त केला आहे. त्यामुळेच, रस्त्यावरती मिळेल तिथे हे तरुण झोपलेले आपल्याला पाहायला मिळतात. भावी जवानांचे सुरू असलेले हाल आता सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. 

भविष्यात देश ज्यांच्या हातात सुरक्षित राहणार आहे, अशा तरुणांना रात्रभर रोडवर झोपून, न पाणी पिता आणि न काही खाता राहावे लागत आहे. विशेष म्हणजे काही युवकांना रात्री एक ते दीड वाजेच्या दरम्यान भरती प्रक्रियेला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे, युवकांकडून तीव्र संतापही व्यक्त होत आहे. तर, प्रशासनाच्या ढिसाळ आणि नियोजनशुन्य कारभारावर प्रश्नचिन्ह उभा राहिले आहे.

टॅग्स :Agneepath Schemeअग्निपथ योजनाAurangabadऔरंगाबादIndian Armyभारतीय जवान