शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
3
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
4
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
5
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
6
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
7
खुशखबर! थिएटरनंतर आता OTTवर दाखल होतोय 'धुरंधर', जाणून घ्या कुठे आणि कधी पाहता येणार?
8
PM मोदी जॉर्डन-ओमान दौऱ्यावर, तर जयशंकर इजराइलमध्ये; भारताचा जगाला स्पष्ट संदेश..!
9
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुरखा हटवल्याने महिला डॉक्टर धक्क्यात; सरकारी नोकरी नाकारून सोडले राज्य
10
काव्या मारननं पारखलं सोनं! अनसोल्ड खेळाडूवर लावली बोली, त्यानं ४८ चेंडूत कुटल्या ७६ धावा
11
Post Office ची जबरदस्त स्कीम... घरबसल्या दर महिन्याला होईल २० हजार रुपयांची कमाई, कोणती आहे योजना, पाहा डिटेल्स
12
बुकिंग सुरू होताच 'या' कारवर तुटून पडले लोक, 24 तासांत 70000 यूनिट बूक; खिशात हवेत फक्त ₹21000
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
14
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
15
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
16
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
17
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
18
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
19
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
Daily Top 2Weekly Top 5

पंचनामे झाले, प्रस्तावही गेला...दिवाळी संपली, पण शेतकऱ्यांसाठीची मदत कुठंय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 19:08 IST

पैठण तालुक्यातील बळीराजा हवालदिल

- अनिलकुमार मेहेत्रेपाचोड : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात बळीराजाचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन देणाऱ्या राज्य शासनाने, सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देण्याची केलेली घोषणा फोल ठरली आहे. तहसील प्रशासनाने बांधावर जाऊन पंचनामे पूर्ण करून शासनाकडे प्रस्ताव पाठवला असतानाही, दिवाळी संपली तरी पैठण तालुक्यातील एकाही शेतकऱ्याच्या खात्यात नुकसानभरपाईचा एक रुपयाही जमा झालेला नाही.

पैठण तालुक्यात सप्टेंबर महिन्यात सलग पंधरा दिवस मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. ज्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आणि त्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला. त्यानंतर उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, तहसीलदार ज्योती पवार, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि कृषी अधिकारी यांचा समावेश असलेल्या त्रीसदस्यीय कमिटीच्या माध्यमातून हे पंचनामे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पूर्ण करण्यात आले. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर मदतीसाठीचा सविस्तर प्रस्ताव तातडीने शासन दरबारी पाठविण्यात आला. नुकसानीच्या पाहणीनंतर शासनाने शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याची घोषणा केली होती, तसेच दिवाळीपूर्वी ही मदत थेट खात्यात जमा होईल, अशी आशा निर्माण केली होती; परंतु नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नसल्याने त्यांची आशा फोल ठरली आहे.

पुन्हा अवकाळी पावसाचा फटकाशेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत असतानाच, गेल्या तीन दिवसांपासून पुन्हा अवकाळी पाऊस तालुक्यात हजेरी लावत आहे. या अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील राहिलेल्या-साहिल्या पिकांचेही मोठे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे.

लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर मदततालुक्यातील ९६ हजार शेतकऱ्यांच्या शेतातील ८८ हजार २४४ हेक्टरवरील खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले असून, तालुका प्रशासनाने शासनाकडे १०१ कोटी रुपयांच्या निधी मागणीचा प्रस्ताव पाठविला आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीची रक्कम जमा होणार आहे.-ज्योती पवार, तहसीलदार

खात्यात एक रुपयाही आला नाहीपावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले. अधिकाऱ्यांनी बांधावर येऊन पंचनामे केल्यानंतर मदतीचा प्रस्ताव सुद्धा शासनाकडे पाठविला आहे; पण आमच्या खात्यात आजपर्यंत एक रुपयाही जमा झालेला नाही.-सुभाष गोजरे, शेतकरी, वडजी

कर्ज कसे फेडायचे?मुसळधार पावसामुळे माझ्या शेतातील कांदा पिकांचे अतोनात नुकसान झाले. तहसील प्रशासनाने तातडीने पंचनामे केले; पण अजूनही नुकसानभरपाईची रक्कम खात्यावर न आल्यामुळे आता कर्ज कसे फेडायचे, अशी चिंता पडली आहे.-अंबादास थोटे, शेतकरी, ज्ञानेश्वरवाडी

English
हिंदी सारांश
Web Title : Farmers await promised Diwali aid after crop loss assessments.

Web Summary : Despite assessments after heavy September rains ruined crops, farmers in Paithan are yet to receive promised Diwali aid. Further unseasonal rains threaten remaining crops, deepening farmer distress. The administration claims funds will arrive soon.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरRainपाऊसAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी