शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

पंचनामे झाले, प्रस्तावही गेला...दिवाळी संपली, पण शेतकऱ्यांसाठीची मदत कुठंय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 19:08 IST

पैठण तालुक्यातील बळीराजा हवालदिल

- अनिलकुमार मेहेत्रेपाचोड : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात बळीराजाचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन देणाऱ्या राज्य शासनाने, सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देण्याची केलेली घोषणा फोल ठरली आहे. तहसील प्रशासनाने बांधावर जाऊन पंचनामे पूर्ण करून शासनाकडे प्रस्ताव पाठवला असतानाही, दिवाळी संपली तरी पैठण तालुक्यातील एकाही शेतकऱ्याच्या खात्यात नुकसानभरपाईचा एक रुपयाही जमा झालेला नाही.

पैठण तालुक्यात सप्टेंबर महिन्यात सलग पंधरा दिवस मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. ज्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आणि त्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला. त्यानंतर उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, तहसीलदार ज्योती पवार, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि कृषी अधिकारी यांचा समावेश असलेल्या त्रीसदस्यीय कमिटीच्या माध्यमातून हे पंचनामे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पूर्ण करण्यात आले. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर मदतीसाठीचा सविस्तर प्रस्ताव तातडीने शासन दरबारी पाठविण्यात आला. नुकसानीच्या पाहणीनंतर शासनाने शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याची घोषणा केली होती, तसेच दिवाळीपूर्वी ही मदत थेट खात्यात जमा होईल, अशी आशा निर्माण केली होती; परंतु नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नसल्याने त्यांची आशा फोल ठरली आहे.

पुन्हा अवकाळी पावसाचा फटकाशेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत असतानाच, गेल्या तीन दिवसांपासून पुन्हा अवकाळी पाऊस तालुक्यात हजेरी लावत आहे. या अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील राहिलेल्या-साहिल्या पिकांचेही मोठे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे.

लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर मदततालुक्यातील ९६ हजार शेतकऱ्यांच्या शेतातील ८८ हजार २४४ हेक्टरवरील खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले असून, तालुका प्रशासनाने शासनाकडे १०१ कोटी रुपयांच्या निधी मागणीचा प्रस्ताव पाठविला आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीची रक्कम जमा होणार आहे.-ज्योती पवार, तहसीलदार

खात्यात एक रुपयाही आला नाहीपावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले. अधिकाऱ्यांनी बांधावर येऊन पंचनामे केल्यानंतर मदतीचा प्रस्ताव सुद्धा शासनाकडे पाठविला आहे; पण आमच्या खात्यात आजपर्यंत एक रुपयाही जमा झालेला नाही.-सुभाष गोजरे, शेतकरी, वडजी

कर्ज कसे फेडायचे?मुसळधार पावसामुळे माझ्या शेतातील कांदा पिकांचे अतोनात नुकसान झाले. तहसील प्रशासनाने तातडीने पंचनामे केले; पण अजूनही नुकसानभरपाईची रक्कम खात्यावर न आल्यामुळे आता कर्ज कसे फेडायचे, अशी चिंता पडली आहे.-अंबादास थोटे, शेतकरी, ज्ञानेश्वरवाडी

English
हिंदी सारांश
Web Title : Farmers await promised Diwali aid after crop loss assessments.

Web Summary : Despite assessments after heavy September rains ruined crops, farmers in Paithan are yet to receive promised Diwali aid. Further unseasonal rains threaten remaining crops, deepening farmer distress. The administration claims funds will arrive soon.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरRainपाऊसAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी