शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

'पद्मपाणी बुध्दाच्या हातात लेखणीची मशाल'; १९ व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह आहे खास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 18:23 IST

१९ वे विद्रोही साहित्य संमेलन भारतीय संविधानाला समर्पित आहे.

छत्रपती संभाजीनगर: विद्रोही साहित्य संमेलनाच्या बोधचिन्ह हे भारतीय बहु सांस्कृतिक बहुविविधतेचे प्रतिबिंब आहे. यातून बुध्दाची करूणा आणि परिघाबाहेर ढकलल्यांच्या वेदनेचा विद्रोह प्रतित होतो, असे प्रतिपादन विचारवंत डॉ. मुस्तजिब खान यांनी केले. सुभेदारी विश्रामगृहात डॉ. खान याच्या हस्ते नुकतेच १९ व्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे प्रकाशन करण्यात आले. 

शहरातील आमखास मैदानावर २१ ते २३ फेब्रुवारीदरम्यान १९ व्या अ.भा. विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या बोधचिन्हाचे प्रकाशन अभ्यासक विचारवंत प्रा. मुस्तजिब खान यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, चित्रकार राजानंद सुरडकर यांनी रेखाटलेल्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हातून सांस्कृतिक क्रांती घडवली आहे. अजिंठ्याच्या पद्मपाणी बुध्दाच्या हातात पिंपळ पाना ऐवजी लेखणीची मशाल दिली आहे. सोबतच या शहराची ठळक ऐतिहासिक ओळख असलेल्या बीबी का मकबऱ्याची मिनारही दर्शवला आहे. संविधानाची मोडतोड सुरु आहे. या जळत्या वास्तवालाही या बोधचिन्हातून दर्शवले आहे, असेही ते म्हणाले.

या वेळी प्रास्ताविक विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे राज्य कार्यकारी संघटक किशोर ढमाले यांनी केले. ते म्हणाले की, या बोधचिन्हातून विद्रोहाचा वारसा अधिक प्रखरपणे पुढे आणला आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सूर्यकांता गंगाधरजी गाडे, संजय जाधव, संमेलन स्वागताध्यक्ष सतिष चकोर, चित्रकार राजानंद सुरडकर, मुख्य निमंत्रक अॕड.धनंजय बोरडे, अनिलकुमार बस्ते, के.ई.हरिदास, प्रा.भारत सिरसाठ, धोंडोपंत मानवतकर, कार्याध्यक्ष खालिद अहमद, सुधाकर निसर्ग, भीमराव गाडेकर, सविता अभ्यंकर, राष्ट्रपाल वानखेडे, अनिल वानखेडे, वजिर शेख, कवि सुनील उबाळे आदिंसह संमेलनाच्या संयोजन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.आभार अनंत भवरे यांनी मानले.

संमेलन भारतीय संविधानाला समर्पित१९ वे विद्रोही साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह  प्रसिद्ध चित्रकार राजानंद सुरडकर यांनी रेखाटले आहे. हे संमेलन भारतीय संविधानाला समर्पित आहे. संविधानाने प्रत्येक माणसाला समान लेखून समता, न्याय, बंधूता, मैत्री, वैज्ञानिक दृष्टिकोन ही मूल्यं दिली आहेत. संमेलन बोधचिन्हात भारतीय संविधानाच्या पार्श्वभूमीवर जगाला स्तब्ध करून टाकणाऱ्या अजिंठा लेणीतील पद्मपाणी बुध्दाचा अनुकंपेचा हात आहे. या हातात कालानुरूप 'स्वयं दिप हो' या वचनाला अधोरेखित करणारी लेखणीची मशाल दाखवली आहे.  ही लेखणीची मशाल एकाच वेळी 'स्वयंदीप' होण्यासाठी व प्रज्ञेने सर्वंकष अंधार जाळण्याची प्रेरणा आहे. गुलामीच्या  तुटलेल्या श्रृंखला,  बिबि का मकबऱ्याचा एक मिनार दर्शवला आहे. राजानंद सुरडकर यांनी आजपर्यंत विविध साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह केले आहेत. विविध नियत कालिकात रेखाटने केलेली आहेत. विविध शहरांत चित्र प्रदर्शन केलेली आहेत. विद्रोही सांस्कृतिक चळवळीशी बांधिलकी असलेले आहेत. 

टॅग्स :marathiमराठीliteratureसाहित्यchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर