शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

आरक्षणावरून विरोधी पक्ष मराठा समाजाची दिशाभूल करत आहे, रावसाहेब दानवेंचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 16:20 IST

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुती १८० जागा जिंकणार, असा दावा देखील रावसाहेब दानवे यांनी केला

फुलंब्री ( छत्रपती संभाजीनगर) : मराठा आरक्षण विषयी मनोज जरांगे पाटील यांच्या मागणी संदर्भात विरोधी पक्षांनी आपली भूमिका स्पष्ठ करावी. त्यांनी समाजाची दिशाभूल करू नये, अशी टीका माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी आज केली. तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुती १८० जागा जिंकणार असा दावा देखील दानवे यांनी केला. ते फुलंब्री येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.      फुलंब्री येथे शनिवारी सभापती अनुराधा चव्हाण यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी रावसाहेब दानवे आले होते. त्यापूर्वी त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. विरोधी पक्षातील नेते मराठा समाजाची दिशाभूल करीत असल्याचा आरोप करीत दानवे यांनी केला. तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला आपला पाठींबा आहे का हे विरोधी पक्षांनी मिडिया समोर येऊन सांगावे. शरद पवार,उद्धव ठाकरे ,नाना पाटोळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. आम्ही आरक्षण देण्यासाठी तयार आहोत, पण हे आरक्षण दुसऱ्यावर अन्याय करून द्यावे अशी आमची भूमिका नाही, असे दानवे यांनी स्पष्ट केले.

देवेंद्र फडणवीस हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार अशी चर्चा आहे, असा प्रश्न विचारला असता पक्ष काहीही करू शकते असे उत्तर दानवे यांनी दिले. तर मराठा चेहरा म्हणून तुम्हाला मुख्यमंत्री पदाची जबाबदारी पक्ष देऊ शकतो का ? असी विचारणा केली असता त्यांनी मुख्यमंत्रीपद रिकामे नाही, असे सांगून दानवे यांनी अधिक बोलणे टाळले. दरम्यान, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुती १८० जागा जिंकणार असा विश्वास रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला. तसेच पक्षाने जर सरपंच पदाची निवडणूक लढविण्याचे आदेश दिले तर ती निवडणूक लढवेन. पक्षाचा आदेश अंतिम राहील. असेही दानवे यांनी सांगितले. मात्र, मी विधानसभा निवडणूक लढणार नाही, हे मी या अगोदर स्पष्ट केले आहे, अशी भूमिकाही दानवे यांनी स्पष्ट केली. 

यावेळी जिल्हाध्यक्ष सुहास सिरसाट, सभापती अनुराधा चव्हाण, विजय औताडे, शिवाजीराव पाथ्रीकर, मंगलबाई वाहेगावकर, ऐश्वर्या गाडेकर, योगेश मिसाळ, जितेंद्र जैस्वाल यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थिती होते.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेBJPभाजपाAurangabadऔरंगाबाद