शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

"निजाम गेले, मेले, संपले"; अमित शाह यांच्या टीकेवरुन जलील संतापले, गृहमंत्र्यांना म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 08:53 IST

उद्धव ठाकरे यांना आदित्यला अन् शरद पवारांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचे आहे.

छ. संभाजीनगर/मुंबई - देशाचे गृहमंत्री अमित शाह यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये जाहीर सभा झाली. या सभेत गृहमंत्री अमित शाह यांच्या सहीनेच औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर झाल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. त्यानंतर भाषण करताना अमित शाह यांनी काँग्रेस, ठाकरे, पवार यांच्या घराणेशाहीवर जोरदार हल्लाबोल केला. तर, छ. संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांना थेट निजामाची उपमा दिली. एमआयएमला उखडून टाका, असे आवाहनही गृहमंत्र्यांनी संभाजीनगरवासीयांना केले. आता, अमित शाह यांच्या टीकेवर पलटवार करताना जलील यांनी सध्याच्या काळात निजामाचं काम कोणता पक्ष करतोय, असे म्हणत भाजपाला टोला लगावला.  

उद्धव ठाकरे यांना आदित्यला अन् शरद पवारांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचे आहे. ममता बॅनर्जी भाच्याचे, तर स्टॅलिन मुलाचे भवितव्य शोधण्यात व्यस्त आहेत. शरद पवारांना महाराष्ट्राची जनता गेल्या ५० वर्षांपासून सहन करतेय. विरोधी पक्ष ‘लोकशाही’ नव्हे तर ‘घराणेशाही’ जपण्यात ‘मस्त’ आहेत. तर, नरेंद्र मोदी विकसित भारताचे लक्ष्य साध्य करण्यात व्यस्त आहेत, असा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर येथील सभेत विरोधकांचा समाचार घेतला. यावेळी, तेथील खासदार इम्तियाज जलील आणि एमआयएमवरही बोचरी टीका केली. 

आज या सभेतून आपण संकल्प केला पाहिजे की, सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्वातंत्र्यानंतर निजामापासून मुक्ती दिली होती. आता, नव्या निजामांना पुन्हा घरी बसवून त्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम करू, असे म्हणत अमित शाह यांनी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. अमित शाह यांच्या टीकेला खा. जलील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 

देशाचे गृहमंत्री आहेत, गृहमंत्र्यांनी माझ्या मतदारसंघात येऊन असं धमकी देणारं विधान करणं त्यांना शोभतं की नाही हे मला माहिती नाही. ते माझा संबंध निजामाशी जोडत आहेत, माझा काही संबंध नाही, निजाम होते एका काळात, ते गेले, मेले,संपले आता. जे काम निजाम करत होते, देशाला तोडण्याचं काम, फोडण्याचं काम करत होते. आज दुर्दैवाने कोणता पक्ष ते काम करत आहे, अमित शाह साहेब मला बोलण्याची वेळ येऊ देऊ नका, असे म्हणत खासदार जलील यांच्या गृहमंत्र्यांवर पलटवार केला आहे. 

विकासाचा बायोडाटा पाहूनच करा मतदान 

- देशाच्या स्वाभिमानाची पायाभरणी छत्रपती शिवाजी महाराजांनी रचल्याचे सांगून, शाह यांनी शिवाजी महाराजांना प्रणाम करीत, तरुणाईला भावनिक साद घातली.- आगामी निवडणूक भाजपसाठी नव्हे, तर देशासाठी आहे. त्यामुळे तरुणाईने ताकदीने पुढे येऊन, प्रत्येकाने केलेल्या विकासाचा ‘बायोडाटा’ पाहूनच मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपाAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनImtiaz Jalilइम्तियाज जलीलElectionनिवडणूक