शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
3
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
4
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
5
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
6
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
7
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
8
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
9
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
10
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
11
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
12
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
13
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
14
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
15
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
16
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
17
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
18
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

"निजाम गेले, मेले, संपले"; अमित शाह यांच्या टीकेवरुन जलील संतापले, गृहमंत्र्यांना म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 08:53 IST

उद्धव ठाकरे यांना आदित्यला अन् शरद पवारांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचे आहे.

छ. संभाजीनगर/मुंबई - देशाचे गृहमंत्री अमित शाह यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये जाहीर सभा झाली. या सभेत गृहमंत्री अमित शाह यांच्या सहीनेच औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर झाल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. त्यानंतर भाषण करताना अमित शाह यांनी काँग्रेस, ठाकरे, पवार यांच्या घराणेशाहीवर जोरदार हल्लाबोल केला. तर, छ. संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांना थेट निजामाची उपमा दिली. एमआयएमला उखडून टाका, असे आवाहनही गृहमंत्र्यांनी संभाजीनगरवासीयांना केले. आता, अमित शाह यांच्या टीकेवर पलटवार करताना जलील यांनी सध्याच्या काळात निजामाचं काम कोणता पक्ष करतोय, असे म्हणत भाजपाला टोला लगावला.  

उद्धव ठाकरे यांना आदित्यला अन् शरद पवारांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचे आहे. ममता बॅनर्जी भाच्याचे, तर स्टॅलिन मुलाचे भवितव्य शोधण्यात व्यस्त आहेत. शरद पवारांना महाराष्ट्राची जनता गेल्या ५० वर्षांपासून सहन करतेय. विरोधी पक्ष ‘लोकशाही’ नव्हे तर ‘घराणेशाही’ जपण्यात ‘मस्त’ आहेत. तर, नरेंद्र मोदी विकसित भारताचे लक्ष्य साध्य करण्यात व्यस्त आहेत, असा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर येथील सभेत विरोधकांचा समाचार घेतला. यावेळी, तेथील खासदार इम्तियाज जलील आणि एमआयएमवरही बोचरी टीका केली. 

आज या सभेतून आपण संकल्प केला पाहिजे की, सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्वातंत्र्यानंतर निजामापासून मुक्ती दिली होती. आता, नव्या निजामांना पुन्हा घरी बसवून त्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम करू, असे म्हणत अमित शाह यांनी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. अमित शाह यांच्या टीकेला खा. जलील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 

देशाचे गृहमंत्री आहेत, गृहमंत्र्यांनी माझ्या मतदारसंघात येऊन असं धमकी देणारं विधान करणं त्यांना शोभतं की नाही हे मला माहिती नाही. ते माझा संबंध निजामाशी जोडत आहेत, माझा काही संबंध नाही, निजाम होते एका काळात, ते गेले, मेले,संपले आता. जे काम निजाम करत होते, देशाला तोडण्याचं काम, फोडण्याचं काम करत होते. आज दुर्दैवाने कोणता पक्ष ते काम करत आहे, अमित शाह साहेब मला बोलण्याची वेळ येऊ देऊ नका, असे म्हणत खासदार जलील यांच्या गृहमंत्र्यांवर पलटवार केला आहे. 

विकासाचा बायोडाटा पाहूनच करा मतदान 

- देशाच्या स्वाभिमानाची पायाभरणी छत्रपती शिवाजी महाराजांनी रचल्याचे सांगून, शाह यांनी शिवाजी महाराजांना प्रणाम करीत, तरुणाईला भावनिक साद घातली.- आगामी निवडणूक भाजपसाठी नव्हे, तर देशासाठी आहे. त्यामुळे तरुणाईने ताकदीने पुढे येऊन, प्रत्येकाने केलेल्या विकासाचा ‘बायोडाटा’ पाहूनच मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपाAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनImtiaz Jalilइम्तियाज जलीलElectionनिवडणूक