शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

‘गौताळा’ अभयारण्यातील निसर्ग सौंदर्य बहरले; पण पर्यटकांना १५ सप्टेंबरपर्यंत बंदी ! कारण काय ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2023 16:22 IST

सुरक्षा रक्षक कर्तव्य बजावत नसल्याने अनधिकृतपणे पर्यटकांची रेलचेल पहावयास मिळत आहे.

कन्नड : निसर्ग सौंदर्याची खाण असलेला ‘गौताळ्या’ने हिरवा शालू पांघरला असून येथील निसर्ग सौंदर्य चांगलेच बहरले आहे; परंतु वनविभागाने १५ सप्टेंबरपर्यंत पर्यटकांना येथे प्रवेश बंदी केल्याने निसर्गप्रेमींना हा अद्भुत नजरा पाहण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

औरंगाबाद व जळगाव जिल्ह्याच्या सीमेवर २६० चौ. किमी नैसर्गिक वृक्ष वनराईने नटलेले हे गौताळा अभयारण्य आहे. वेगवेगळ्या प्रजातींची झाडे, उंच उंच डोंगर, खोल दऱ्या, धबधबे, पशुपक्षी अशी वृक्षसंपदा आणि जीवसंपदा या अभयारण्यात आहे. हे जंगल पानगळीचे असल्याने उन्हाळ्यात अभयारण्य ओसाड पडते; मात्र पावसाळ्यात हे अभयारण्य म्हणजे निसर्गाने मुक्त हाताने केलेली सौंदर्याची उधळण वाटते. त्यामुळेच पर्यटकांचे पाय आपोआप या अभयारण्याकडे वळतात. तथापि हे निसर्ग सौंदर्य कॅमेऱ्यात कैद करण्याच्या तसेच सेल्फी काढण्याच्या मोहात दुर्घटना घडण्याची शक्यता असते. तसेच अभयारण्यात जास्त प्रमाणात पाऊस पडून नाल्यांना पूर येत असतो. अशावेळी पर्यटकांच्या जीवितास धोका पोहोचू शकतो, ही शक्यता गृहीत धरून १७ जुलै ते १५ सप्टेंबरपर्यंत हे अभयारण्य पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहे, अशी माहिती वन्यजीव अधिकारी प्रवीण पारधी यांनी दिली.

गौताळ्याची सुरक्षा वाऱ्यावरदुसरीकडे अभयारण्य पर्यटकांसाठी बंद असल्याचे सांगण्यात येत असले तरी हिवरखेडा तपासणी नाक्यावर मात्र ‘आओ जाओ घर तुम्हारा है’ अशी अवस्था असून या ठिकाणी कर्तव्यावर असलेले कर्मचारी त्यांच्या कर्तव्याच्या वेळेत दांड्या मारीत असल्याने गौताळ्याची सुरक्षा वाऱ्यावर आहे. परिणामी येथे अनधिकृतपणे पर्यटकांची रेलचेल पहावयास मिळत आहे.

पर्यटकांनी सहकार्य करावं १७ जुलै ते १५ सप्टेंबर या कालावधीत पर्यटकांना गौताळा अभयारण्यात प्रवेश दिला जाणार नाही. पर्यटकांनी यासाठी सहकार्य करावे.- प्रवीण पारधी, वन्यजीव रक्षक, कन्नड

टॅग्स :tourismपर्यटनAurangabadऔरंगाबादRainपाऊस