शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
3
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
4
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
5
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
6
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
7
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
8
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
9
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
10
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
11
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
12
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
13
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
14
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
15
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
16
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
17
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
18
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
19
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

‘गौताळा’ अभयारण्यातील निसर्ग सौंदर्य बहरले; पण पर्यटकांना १५ सप्टेंबरपर्यंत बंदी ! कारण काय ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2023 16:22 IST

सुरक्षा रक्षक कर्तव्य बजावत नसल्याने अनधिकृतपणे पर्यटकांची रेलचेल पहावयास मिळत आहे.

कन्नड : निसर्ग सौंदर्याची खाण असलेला ‘गौताळ्या’ने हिरवा शालू पांघरला असून येथील निसर्ग सौंदर्य चांगलेच बहरले आहे; परंतु वनविभागाने १५ सप्टेंबरपर्यंत पर्यटकांना येथे प्रवेश बंदी केल्याने निसर्गप्रेमींना हा अद्भुत नजरा पाहण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

औरंगाबाद व जळगाव जिल्ह्याच्या सीमेवर २६० चौ. किमी नैसर्गिक वृक्ष वनराईने नटलेले हे गौताळा अभयारण्य आहे. वेगवेगळ्या प्रजातींची झाडे, उंच उंच डोंगर, खोल दऱ्या, धबधबे, पशुपक्षी अशी वृक्षसंपदा आणि जीवसंपदा या अभयारण्यात आहे. हे जंगल पानगळीचे असल्याने उन्हाळ्यात अभयारण्य ओसाड पडते; मात्र पावसाळ्यात हे अभयारण्य म्हणजे निसर्गाने मुक्त हाताने केलेली सौंदर्याची उधळण वाटते. त्यामुळेच पर्यटकांचे पाय आपोआप या अभयारण्याकडे वळतात. तथापि हे निसर्ग सौंदर्य कॅमेऱ्यात कैद करण्याच्या तसेच सेल्फी काढण्याच्या मोहात दुर्घटना घडण्याची शक्यता असते. तसेच अभयारण्यात जास्त प्रमाणात पाऊस पडून नाल्यांना पूर येत असतो. अशावेळी पर्यटकांच्या जीवितास धोका पोहोचू शकतो, ही शक्यता गृहीत धरून १७ जुलै ते १५ सप्टेंबरपर्यंत हे अभयारण्य पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहे, अशी माहिती वन्यजीव अधिकारी प्रवीण पारधी यांनी दिली.

गौताळ्याची सुरक्षा वाऱ्यावरदुसरीकडे अभयारण्य पर्यटकांसाठी बंद असल्याचे सांगण्यात येत असले तरी हिवरखेडा तपासणी नाक्यावर मात्र ‘आओ जाओ घर तुम्हारा है’ अशी अवस्था असून या ठिकाणी कर्तव्यावर असलेले कर्मचारी त्यांच्या कर्तव्याच्या वेळेत दांड्या मारीत असल्याने गौताळ्याची सुरक्षा वाऱ्यावर आहे. परिणामी येथे अनधिकृतपणे पर्यटकांची रेलचेल पहावयास मिळत आहे.

पर्यटकांनी सहकार्य करावं १७ जुलै ते १५ सप्टेंबर या कालावधीत पर्यटकांना गौताळा अभयारण्यात प्रवेश दिला जाणार नाही. पर्यटकांनी यासाठी सहकार्य करावे.- प्रवीण पारधी, वन्यजीव रक्षक, कन्नड

टॅग्स :tourismपर्यटनAurangabadऔरंगाबादRainपाऊस