शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

‘गौताळा’ अभयारण्यातील निसर्ग सौंदर्य बहरले; पण पर्यटकांना १५ सप्टेंबरपर्यंत बंदी ! कारण काय ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2023 16:22 IST

सुरक्षा रक्षक कर्तव्य बजावत नसल्याने अनधिकृतपणे पर्यटकांची रेलचेल पहावयास मिळत आहे.

कन्नड : निसर्ग सौंदर्याची खाण असलेला ‘गौताळ्या’ने हिरवा शालू पांघरला असून येथील निसर्ग सौंदर्य चांगलेच बहरले आहे; परंतु वनविभागाने १५ सप्टेंबरपर्यंत पर्यटकांना येथे प्रवेश बंदी केल्याने निसर्गप्रेमींना हा अद्भुत नजरा पाहण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

औरंगाबाद व जळगाव जिल्ह्याच्या सीमेवर २६० चौ. किमी नैसर्गिक वृक्ष वनराईने नटलेले हे गौताळा अभयारण्य आहे. वेगवेगळ्या प्रजातींची झाडे, उंच उंच डोंगर, खोल दऱ्या, धबधबे, पशुपक्षी अशी वृक्षसंपदा आणि जीवसंपदा या अभयारण्यात आहे. हे जंगल पानगळीचे असल्याने उन्हाळ्यात अभयारण्य ओसाड पडते; मात्र पावसाळ्यात हे अभयारण्य म्हणजे निसर्गाने मुक्त हाताने केलेली सौंदर्याची उधळण वाटते. त्यामुळेच पर्यटकांचे पाय आपोआप या अभयारण्याकडे वळतात. तथापि हे निसर्ग सौंदर्य कॅमेऱ्यात कैद करण्याच्या तसेच सेल्फी काढण्याच्या मोहात दुर्घटना घडण्याची शक्यता असते. तसेच अभयारण्यात जास्त प्रमाणात पाऊस पडून नाल्यांना पूर येत असतो. अशावेळी पर्यटकांच्या जीवितास धोका पोहोचू शकतो, ही शक्यता गृहीत धरून १७ जुलै ते १५ सप्टेंबरपर्यंत हे अभयारण्य पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहे, अशी माहिती वन्यजीव अधिकारी प्रवीण पारधी यांनी दिली.

गौताळ्याची सुरक्षा वाऱ्यावरदुसरीकडे अभयारण्य पर्यटकांसाठी बंद असल्याचे सांगण्यात येत असले तरी हिवरखेडा तपासणी नाक्यावर मात्र ‘आओ जाओ घर तुम्हारा है’ अशी अवस्था असून या ठिकाणी कर्तव्यावर असलेले कर्मचारी त्यांच्या कर्तव्याच्या वेळेत दांड्या मारीत असल्याने गौताळ्याची सुरक्षा वाऱ्यावर आहे. परिणामी येथे अनधिकृतपणे पर्यटकांची रेलचेल पहावयास मिळत आहे.

पर्यटकांनी सहकार्य करावं १७ जुलै ते १५ सप्टेंबर या कालावधीत पर्यटकांना गौताळा अभयारण्यात प्रवेश दिला जाणार नाही. पर्यटकांनी यासाठी सहकार्य करावे.- प्रवीण पारधी, वन्यजीव रक्षक, कन्नड

टॅग्स :tourismपर्यटनAurangabadऔरंगाबादRainपाऊस